शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

चिंताजनक : उस्मानाबादेत दोन हजार बालके कमी वजनाची !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 19:34 IST

गतवर्षीच्या तुलनेत पाऊण टक्क्यांनी झाली वाढ

ठळक मुद्देनीति आयोगाने जाहीर केलेल्या मागास जिल्ह्यांच्या यादीत उस्मानाबादचा समावेश झाला.कमी वजनाच्या बालकांची संख्या कमी होण्याऐवजी वाढत चालली आहे.

उस्मानाबाद : नीति आयोगाने जाहीर केलेल्या मागास जिल्ह्यांच्या यादीत उस्मानाबादचा समावेश झाला. मागील वर्षभरात महिला व बालकल्याण, आरोग्य आणि शिक्षण या तीन घटकांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले. यानंतरही कमी वजनाची बालके जन्मण्याचे प्रमाण वाढल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मार्च २०१८ ते मार्च २०१९ या कालावधीत कमी वजनची  सुमारे २ हजार बालके जन्मली आहेत. गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण पाऊण टक्क्याने वाढले आहे, हे विशेष.

जिल्हा एकदोन वर्षाआड दुष्काळाचा सामना करीत आहे. या कालावधीत शेतकरी, शेतमजुरांसह सर्वसामान्यांचे अर्थकारण पूर्णत: कोलमडून पडते. अशा आर्थिक विवंचनेतूनच विशेषत: ग्रामीण भागातील अनेक कुटुंब कमी वयातच मुलीचा विवाह लावून देतात. एवढेच नाही तर हालाखीची परिस्थिती असलेल्या अनेक कुटुंबातील गरोदर मातांना संतुलित व सकस आहार मिळत नाही. गरोदार मातेला एखादा आजार जडल्यानंतर त्याचे वेळीच निदान होत नाही. आणि निदान झालेच तर आर्थिक अडचणींमुळे उपचार करता येत नाहीत. अशा एक ना अनेक कारणांमुळे कमी वजनाची मुले जन्मतात, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मार्च २०१८ पूर्वी जिल्ह्यात २४ हजार ५४८ बालके जन्मली. यापैकी तब्बल १ हजार ९३४ बालके कमी वजनाची (२ हजार ५०० ग्रॅम पेक्षा कमी वजन) होती. तेव्हा सर्वाधिक चिंतानजक स्थिती तुळजापूर आणि वाशी तालुक्यात होती. अनुक्रमे ११.८८ व १०.६० टक्के कमी वजनाच्या बाळांचे प्रमाण होते. 

दरम्यानच्या काळात केंद्र शासनाच्या नीति आयोगाने मागास जिल्ह्यांच्या यादीत उस्मानाबादचा समावेश केला. या माध्यमातून शिक्षण, आरोग्य आणि महिला व बालकल्याण विभागावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. त्यामुळे कमी वजनाची बालके जन्मण्याचे प्रमाण कमी होईल, असे अपेक्षित होते. परंतु, सध्या उलट चित्र पहावयास मिळत आहे. कमी वजनाच्या बालकांची संख्या कमी होण्याऐवजी वाढत चालली आहे. मार्च २०१९ पूर्वी २२ हजार ७९८ बालके जन्मली. यापैकी १ हजार ९६६ बालके कमी वजनाची आहेत. मार्च २०१८ च्या तुलनेत जवळपास पाऊण टक्क्याने कमी वजनाच्या बालकांची संख्या वाढली आहे. 

दृष्टिक्षेपात कमी वजनाची बालकेतालुका     संख्या    टक्केवारीभूम        ४०    ४.७६कळंब        ११५    ७.५लोहारा        १०३    ६.७०उमरगा        ३३०    ७.७६उस्मानाबाद    ८४२    ८.९.परंडा        १००    ७.४२तुळजापूर    ३७०    ११.७६वाशी        ६६    ११.४४एकूण        १९६६    ८.६२

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादfoodअन्नUsmanabad z pउस्मानाबाद जिल्हा परिषद