शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

सांगवी-पांगरदरवाडी पुलाच्या कामास अद्याप मुहूर्त सापडेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:29 IST

तामलवाडी - तुळजापूर तालुक्यातील सांगवी (काटी) - पांगरदरवाडी गावाला जोडणाऱ्या भूमिगत पुलाची उंची कमी आहे. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात सांगवी-माळुंब्रा ...

तामलवाडी - तुळजापूर तालुक्यातील सांगवी (काटी) - पांगरदरवाडी गावाला जोडणाऱ्या भूमिगत पुलाची उंची कमी आहे. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात सांगवी-माळुंब्रा साठवण तलाव ओव्हरफ्लो झाल्यानंतर या दोन्ही गावचा संपर्क तुटतो. दोन्ही गावचा संपर्क तुटल्यानंतर ग्रामस्थांना वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. गेल्यावर्षीच्या पावसाळ्यातही हा पूल १५ दिवस पाण्याखाली जाऊन दोन्ही गावचा संपर्क तुटला होता. याच पुलावरून सांगवी, पांगरदरवाडी या दोन गावची वाहतूक होते. गावकऱ्यांना वाहतुकीसाठी दुसरा मार्ग नसल्याने पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागतो. गतवर्षी १४ ऑक्टोबर रोजी झालेल्या अतिवृष्टीत ओढ्याचे पाणी गावात शिरले होते. त्यामुळे हा पूल १५ दिवस पाण्याखाली गेल्याने पाण्यातून वाट शोधतच गावकरी ये-जा करीत होते. शिवाय, एक जीप पुराच्या पाण्यातून पुलावरून वाहून गेली होती. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही.

गेल्या ३० वर्षांपासून या पुलाची उंची वाढवून नव्याने बांधकाम करण्याची मागणी दोन्ही गावातील ग्रामस्थांमधून संबंधित विभागाकडे केली जात आहे. मात्र, संबंधित विभागाकडून सदर मागणीला केराची टोपली दाखविली जात आहे. यावर्षीच्या उन्हाळ्यात तरी या पुलाचे काम सुरू होईल, अशी अपेक्षा दोन्ही गावातील ग्रामस्थांना होती; मात्र पावसाळ्यानंतर सहा महिने उलटले तरी पुलाच्या बांधकामाबाबत प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. पावसाळा सुरू होण्यास अवघे तीन महिने अवधी असताना पुलाच्या कामाचा श्रीगणेशा अद्यापही झालेला नाही किंवा निधीची तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. पावसाळ्यापूर्वी या पुलाचे काम सुरू करावे, अशी मागणी सांगवी, पांगरदरवाडी येथील ग्रामस्थांमधून होत आहे.

पुलाच्या कामाबाबत आ. पाटील यांना साकडे

ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीनंतर आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी सांगवी गावानजीकच्या पुलाची भेट देऊन पाहणी केली होती. त्यावेळी गावकऱ्यांनी सदर पुलाचे नव्याने बांधकाम करून उंची वाढविण्याबाबत साकडे घातले होते. त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.

२५ वर्षांत रस्त्याची दुरुस्ती नाही

सांगवी ते पांगरदरवाडी या पाच किमी रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. रोडवर डांबर उरले नाही. अडीच फूट खड्ड्यातून वाट शोधत दोन गावच्या ग्रामस्थांना प्रवास करावा लागत आहे. गेल्या २५ वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.