शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

सांगवी-पांगरदरवाडी पुलाच्या कामास अद्याप मुहूर्त सापडेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:29 IST

तामलवाडी - तुळजापूर तालुक्यातील सांगवी (काटी) - पांगरदरवाडी गावाला जोडणाऱ्या भूमिगत पुलाची उंची कमी आहे. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात सांगवी-माळुंब्रा ...

तामलवाडी - तुळजापूर तालुक्यातील सांगवी (काटी) - पांगरदरवाडी गावाला जोडणाऱ्या भूमिगत पुलाची उंची कमी आहे. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात सांगवी-माळुंब्रा साठवण तलाव ओव्हरफ्लो झाल्यानंतर या दोन्ही गावचा संपर्क तुटतो. दोन्ही गावचा संपर्क तुटल्यानंतर ग्रामस्थांना वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. गेल्यावर्षीच्या पावसाळ्यातही हा पूल १५ दिवस पाण्याखाली जाऊन दोन्ही गावचा संपर्क तुटला होता. याच पुलावरून सांगवी, पांगरदरवाडी या दोन गावची वाहतूक होते. गावकऱ्यांना वाहतुकीसाठी दुसरा मार्ग नसल्याने पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागतो. गतवर्षी १४ ऑक्टोबर रोजी झालेल्या अतिवृष्टीत ओढ्याचे पाणी गावात शिरले होते. त्यामुळे हा पूल १५ दिवस पाण्याखाली गेल्याने पाण्यातून वाट शोधतच गावकरी ये-जा करीत होते. शिवाय, एक जीप पुराच्या पाण्यातून पुलावरून वाहून गेली होती. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही.

गेल्या ३० वर्षांपासून या पुलाची उंची वाढवून नव्याने बांधकाम करण्याची मागणी दोन्ही गावातील ग्रामस्थांमधून संबंधित विभागाकडे केली जात आहे. मात्र, संबंधित विभागाकडून सदर मागणीला केराची टोपली दाखविली जात आहे. यावर्षीच्या उन्हाळ्यात तरी या पुलाचे काम सुरू होईल, अशी अपेक्षा दोन्ही गावातील ग्रामस्थांना होती; मात्र पावसाळ्यानंतर सहा महिने उलटले तरी पुलाच्या बांधकामाबाबत प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. पावसाळा सुरू होण्यास अवघे तीन महिने अवधी असताना पुलाच्या कामाचा श्रीगणेशा अद्यापही झालेला नाही किंवा निधीची तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. पावसाळ्यापूर्वी या पुलाचे काम सुरू करावे, अशी मागणी सांगवी, पांगरदरवाडी येथील ग्रामस्थांमधून होत आहे.

पुलाच्या कामाबाबत आ. पाटील यांना साकडे

ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीनंतर आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी सांगवी गावानजीकच्या पुलाची भेट देऊन पाहणी केली होती. त्यावेळी गावकऱ्यांनी सदर पुलाचे नव्याने बांधकाम करून उंची वाढविण्याबाबत साकडे घातले होते. त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.

२५ वर्षांत रस्त्याची दुरुस्ती नाही

सांगवी ते पांगरदरवाडी या पाच किमी रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. रोडवर डांबर उरले नाही. अडीच फूट खड्ड्यातून वाट शोधत दोन गावच्या ग्रामस्थांना प्रवास करावा लागत आहे. गेल्या २५ वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.