शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
3
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
4
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
5
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
6
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
7
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
8
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
9
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
10
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
11
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
13
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
14
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
15
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
16
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
17
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
18
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
19
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
20
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा

‘राष्ट्रीय पेयजल’ची कामे पुन्हा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:29 IST

उस्मानाबाद : वाडी, वस्त्यांवरील लोकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राष्ट्रीय पेयजल योजना हाती घेण्यात आली. ...

उस्मानाबाद : वाडी, वस्त्यांवरील लोकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राष्ट्रीय पेयजल योजना हाती घेण्यात आली. या योजनेतून २०१९-२० या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील ८० गावांसाठी पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या होत्या. सध्या यापैकी ५४ योजनांद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला आहे. उर्वरित कामे मात्र लॉकडाऊनमुळे ठप्प आहेत.

जिल्ह्यातील आजही अनेक गावांत पिण्याच्या पाण्यासाठी कायमस्वरूपी योजना नाही. त्यामुळे अशा गावातील लोकांना ऐन उन्हाळ्यात हंडाभर पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागते. अनेक वेळा तर अधिग्रहण करण्यासाठी जलस्रोतही उपलब्ध नसतात. अशा वेळी ग्रामस्थांना टँकरच्या साहाय्याने पाणीपुरवठा करण्याची नामुष्की ओढवते. अशा गावांना कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम हाती घेतला. २०१९-२० या आर्थिक वर्षात टंचाईग्रस्त सुमारे ८० गावांसाठी पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या होत्या. निधी उपलब्ध होताच निविदा प्रक्रियेनंतर कामे सुरू कण्यात आली. वर्षभरात बहुतांश कामे ३० ते ४० टक्के पूर्ण झाली होती. असे असतानाच कोरोनाचे संकट ओढवले. संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे वर्षभर कामे बंद राहिली. दारम्यान, कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर पाणी योजनेची कामे पुन्हा गतिमान करण्यात आली. त्यामुळे ८० पैकी जवळपास ५४ पाणी योजनांची कामे पूर्ण होऊन पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. उर्वरित कामांना प्रशासन गती देण्याच्या तयारीत असतानाच कोरोनाची दुसरी लाट धडकली. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट अधिक तीव्र आहे. त्यामुळे शासनाने पुन्हा लॉकडाऊन लागू केला आहे. परिणामी, परराज्यातील बहुतांश मजूर आपापल्या गावी परतले आहेत. जे काही येथे आहेत त्यांनाही जिल्हाबंदीच्या आदेशामुळे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात ये- जा करणे कठीण झाले आहे. परिणामी, पाणीपुरवठा योजनांची २५ ते २६ कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे संबंधित टंचाईग्रस्त गावांना यंदाही टंचाईच्या झळा बसणार आहेत.

चौकट...

साहित्याचे दर ४० टक्क्यांनी वाढले

पाणीपुरवठा योजनांसाठी पाइप मोठ्या प्रमाणावर लागतात. मात्र, सध्या लॉकडाऊनमुळे पाइपच्या दरामध्ये सुमारे ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. म्हणजेच पूर्वी एखाद्या कंपनीचा एक पाइप १०० रुपयांना येत असेल, तर आता त्यासाठी ठेकेदारांना १४० रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे ठेकेदार अडचणीत आले आहेत.

४७ कोटींचा निधी...

राष्ट्रीय पेयजल योजनेतून जिल्ह्यासाठी सुमारे ८० योजना मंजूर करण्यात आल्या होत्या. या योजनासाठी तब्बल ४७ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

कोट...

केंद्र सरकारने जिल्ह्यास सुमारे ८० योजना मंजूर केला होत्या. यापैकी ५४ योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. संबंधित योजनांद्वारे पाणीपुरवठाही सुरू केला आहे. उर्वरित योजनांची कामे मात्र लॉकडाऊनमुळे २५ ते २६ कामे ठप्प झाली आहेत.

-देवकर, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद,उस्मानाबाद