शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

आंदाेरा-बारातेवाडी रस्त्याचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:39 IST

कळंब - एकीकडे मंजुरी मिळत नसल्याने गावोगावच्या रस्त्याची दुरवस्था झाली असताना दुसरीकडे मात्र चक्क चालू काम मागच्या अनेक महिन्यांपासून ...

कळंब - एकीकडे मंजुरी मिळत नसल्याने गावोगावच्या रस्त्याची दुरवस्था झाली असताना दुसरीकडे मात्र चक्क चालू काम मागच्या अनेक महिन्यांपासून अर्धवट अवस्थेत बंद ठेवण्यात आल्याने आंदोरा येथील नागरिक त्रस्त झाले आहेत.

जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारीत ग्रामीण भागातील इतर जिल्हा, ग्रामीण मार्ग दर्जाचे रस्ते येतात. विशेषतः दोन गावांना परस्परांशी जोडणारे, पंचक्रोशीतील मोठ्या गावांना इतर गावांशी संलग्न करणाऱ्या रस्त्यांचा यात समावेश होतो. ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेच्या रक्तवाहिन्या समजल्या जाणाऱ्या या रस्त्यांच्या देखभालीसाठी कायम निधीची वानवा असते. यामुळे गावोगावी दुरवस्था झालेल्या रस्त्यांची संख्या मोठी आहे. यातच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून या रस्त्याच्या सुधारणेसाठी मोठा निधी मंजूर होऊ लागला. तालुक्यातील आंदोरा, बाभळगाव ते बारातेवाडी या १३.६२ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या सुधारणेसाठी २०१८ मध्ये उपरोक्त योजनेतून कोट्यवधींचा निधी मंजूर झाला. यानंतर याची निविदा प्रक्रिया पूर्ण होत उस्मानाबाद येथील एका कंत्राटदाराने याचा ठेका घेऊन कामाला मुहूर्तही लावला. मात्र, मागच्या अनेक महिन्यांपासून या रस्त्याचे आंदोरा शिवारातील काम अर्धवट अवस्थेत बंद आहे. दगड, माती, खड्डे, खडी अशा अवस्थेत ये-जा करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे याचे काम तत्काळ सुरू करावे अशी मागणी धनंजय तामाने, बालाजी तामाने, अशोक तामाने, हरिभाऊ कवडे, संजय मोरे, अनंतराव लांडगे, प्रकाश तांबारे, नरसिंग शिंदे आदींनी प्रशासनाकडे केली आहे.

चौकट...

मुदत संपून फक्त दोन वर्षे झाली...

आंदोरा, बाभळगाव ते बारातेवाडी या रस्ता कामाचा कोट्यवधी रुपयांचा ठेका घेतलेल्या कंपनीने १२ जुलै २०१८ रोजी सुरू केलेले काम १२ जुलै २०१९ रोजी असे बारा महिन्यांत पूर्ण करणे बंधनकारक होते. यास दोन वर्षांचा कालावधी लोटला तरी अद्याप काम पूर्ण झालेले नाही.

जनता त्रस्त, तरी ठेकेदारांचे लाड...

ग्राम सडकच्या रस्ता कामाची गुणवत्ता, कामाची मुदत याचे अनेक किस्से आहेत. आंदोऱ्याचे रखडलेले काम हे यापैकीच एक उदाहरण. यामुळे नागरिक त्रस्त झालेले असताना ग्रामविकास विभाग, रस्ते विकास संस्था व कार्यकारी अभियंता कार्यालय एजन्सीचे लाड कशामुळे पुरवीत आहे असा संतप्त सवाल केला जात आहे.