शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

नवीन वर्षात वाजेल प्राथमिक शाळांची घंटा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:22 IST

उस्मानाबाद : काेराेना महामारीमुळे शाळा बंद करण्याची नामुष्की शासनावर ओढावली हाेती. काेराेनाचा संसर्ग बऱ्यापैकी ओसरल्यानंतर शासनाने नववी ते बरावीचे ...

उस्मानाबाद : काेराेना महामारीमुळे शाळा बंद करण्याची नामुष्की शासनावर ओढावली हाेती. काेराेनाचा संसर्ग बऱ्यापैकी ओसरल्यानंतर शासनाने नववी ते बरावीचे वर्ग सुरू केले आहेत. सरलेल्या वर्षात या वर्गांची उपस्थिती ४८ टक्क्यांवर पाेहाेचली आहे. आता प्रतीक्षा आहे ती, पहिली ते आठवीचे वर्ग सुरू हाेण्याची. नव्या वर्षात लस येऊन साथ आटाेक्यात आल्यानंतर प्राथमिक शाळांचीही घंटा वाजेल, असा आशावाद पालक, शिक्षक अन् प्रशासकीय यंत्रणेकडूनही व्यक्त करण्यात आला.

काेराेनाचा संसर्ग वाढल्यानंतर राज्यातील सर्वच शाळा बंद करण्यात आल्या. इतिहासात पहिल्यांदाच आठ ते नऊ महिने शाळा बंद आहेत. या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेऊ नये, म्हणून ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय पुढे आला. शासनाकडूनही त्यास प्राेत्साहन देण्यात आले. ॲपच्या माध्यमातून प्राथमिक तसेच माध्यमिक वर्गांचा अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आला. काेराेनाचा संसर्ग ओसरल्यानंतर शासनाने नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास अनुमती दिली. त्यानुसार वर्ग सुरू करण्यात आले आहेत. पहिल्या दिवशी फारशी उपस्थिती नव्हती; परंतु सध्या ८० हजार २९२ पैकी साधारपणे ४० हजार विद्यार्थी शाळेत येऊन ज्ञानर्जन करीत आहेत. ही संख्या वाढविण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. पालकांचे प्रबाेधन करण्यावर अधिक भर दिला जात आहे. नवीन वर्षात यावर आणखी भर दिला जाईल, असे माध्यमिक शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, मावळत्या वर्षात प्राथमिक शाळा सुरू करण्याच्या अनुषंगाने काहीच निर्णय झालेला नाही; परंतु नवीन वर्षात लस येऊन साथ आटाेक्यात आल्यानंतर हेही वर्ग सुरू हाेतील, असा आशावाद पालक, शिक्षक तसेच अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला.

चाैकट...

नववी ते बारावीपर्यंतच्या वर्गांतील विद्यार्थ्यांची उपस्थिती दिवसागणिक वाढत आहे. फिजिकल डिस्टन्सिंग तसेच अन्या उपायाेजनांचे तंताेतंत पालन करून वर्ग भरविले जात ओहत. सध्या विद्यार्थ्यांची उपस्थिती ५० टक्क्यांच्या आसपास असली तरी नवीन वर्षात ती १०० टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी आम्ही पावले उचलणार आहाेत. तसे नियाेजनही करण्यात आले आहे.

-गजानन सुसर, शिक्षणाधिकारी, माध्यमिक.

जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकांची गुरुवारी बैठक घेण्यात आली. यावेळी ऑनलाइन शिक्षणाचाही आढावा घेतला. नवीन वर्षात जर शासनाने चाैथी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचे निर्देश दिले तर काय करावे? ज्ञानदान कुठल्या पद्धतीचे असावे? याबाबत सीईओ डाॅ. विजयकुमार फड यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मार्गदर्शन केले.

-डाॅ. अरविंद माेहरे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक.

शाळा सुरू व्हाव्यात...

हाॅटेल्स, मंदिरे तसेच विवाह साेहळ्यांना नियमांचे पालन करण्याच्या अटीवर मंजुरी देण्यात आली आहे. सध्या ९ वी १२ वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे किमान नवीन वर्षात तरी सरकारने प्राथमिक शाळा सुरू कराव्यात, अशी मागणी प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष कल्याण बेताळे यांनी केली.

विद्यार्थ्यांचे नुकसान...

ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून फारसा फायदा हाेत नाही; परंतु विद्यार्थ्यांचे नुकसान थांबलेले नाही. मावळत्या वर्षात शासनाने नववी ते बरावीचे वर्ग सुरू केले आहेत. आता नवीन वर्षात किमान चाैथी ते आठवीपर्यंतचे तरी वर्ग सुरू करावेत, अशी मागणी महाराष्ट्र विभागीय शिक्षक संघाचे अध्यक्ष विक्रम पाटील यांनी केली.