शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगारांची संख्या वाढलेली असताना २७८ 'ग्रा.पं.'मध्ये एकही काम नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:40 IST

उस्मानाबाद -कोरोनामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. असे असतानाही रोजगार हमी योजनेला गती येताना दिसत नाही. आजघडीला जिल्ह्यातील ६२२ पैकी ...

उस्मानाबाद -कोरोनामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. असे असतानाही रोजगार हमी योजनेला गती येताना दिसत नाही. आजघडीला जिल्ह्यातील ६२२ पैकी सुमारे २७० ग्रामपंचायतीत एकही काम सुरू नाही. हे चित्र लक्ष्यात घेता जिल्हा प्रशासनाने 'रोहयो' अधिक गतिमान करण्याची गरज आहे. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत अनेकांचे रोजगार गेले आहेत. त्यामुळे काहींनी मुंबई, पुणे सारखी शहरे सोडून आपले गाव जवळ केले आहे. अशा अडचणीच्या काळात रोजगार हमी योजनेला गती देण्याचे शासनाचे आदेश आहेत. असे असतानाही जिल्ह्यात ही योजना गतिमान होताना दिसत नाही. ग्रामपंचायत आणि यंत्रणा मिळून जिल्ह्यातील ६२२ पैकी २७० ग्रामपंचायतीत एकही काम सुरू नाही. उर्वरित ग्रामपंचयातीतही प्रत्येकी एक अथवा दोन कामे सुरू आहेत. त्यामुळे मजुरांच्या हाताला काम मिळणे कठीण झाले आहे. उपरोक्त चित्र पाहता, जिल्हास्तरीय यंत्रणेने कामे वाढविण्याच्या अनुषंगाने ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

रोहयोवर शुन्य पैसे खर्च केलेल्या ग्रामपंचायती

98

तालुकानिहाय आकडेवारी

उस्मानाबाद 175

तुळजापूर। 257

उमरगा। 51

लोहारा। 43

भूम। 173

परांडा। 148