शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइल बिघडला म्हणून काय झाले; आरोग्य बिघडायला नको!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:40 IST

उस्मानाबाद : कोरोनाच्या संचारबंदीमुळे मोबाइलचा वापर वाढला आहे. परिणामी, मोबाइलमध्ये तांत्रिक बिघाड होण्याचे प्रमाण वाढले आहे. आता निर्बंध शिथिल ...

उस्मानाबाद : कोरोनाच्या संचारबंदीमुळे मोबाइलचा वापर वाढला आहे. परिणामी, मोबाइलमध्ये तांत्रिक बिघाड होण्याचे प्रमाण वाढले आहे. आता निर्बंध शिथिल झाल्यामुळे नागरिक मोबाइल दुरुस्तीसाठी दुकानांमध्ये गर्दी करीत असल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडालेला पहावयास मिळत आहे.

राज्य सरकारने ४ एप्रिलपासून संचारबंदी लागू केली होती. त्यामुळे सर्वजण घरीच होते. घरात राहिल्यामुळे वेळ घालविण्यासाठी आबालवृध्दांसह सर्वांचा मोबाइल हाच एकमेव आधार होता. वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन शिक्षण, ऑनलाइन क्लासेस, नेट, बँकिंग यासोबतच कोरोना रुग्णांची चौकशी करण्यासाठी व्हिडिओ कॉलिंग आदींसाठी मोबाइलचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. यासोबतच लसीकरण नोंदणीसाठी सर्वच जण मोबाइलचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहेत. लॉकडाऊन कालावधीत मोबाइलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सततच्या वापराने व अन्य कारणांमुळे मोबाइलमध्ये तांत्रिक बिघाड आला आहे; परंतु, लॉकडाऊनमुळे सकाळी ७ ते ११ या वेळेत जीवनाश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली. याव्यतिरिक्त इतर सर्व दुकाने बंद होती. त्यासोबतच ऑनलाइनने मोबाइलचे सुटे पार्ट मिळणे कठीण झाले होते. त्यामुळे अनेकांचे मोबाइल बंद आहेत. आता जिल्हा प्रशासनाने निर्बंध शिथिल केले. दुकाने दुपरी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश आढले आहेत. त्यामुळे मोबाइलच्या दुकानात गर्दी दिसून येत आहे.

दीड महिना बाजारपेठ बंद

कोरोनामुळे पहिल्या लाटेत लॉकडाऊन करण्यात आले. लाट ओसरत असताना लॉकडाऊन हटविल्यानंतर काही प्रमाणात स्थिती पूर्वपदावर येत होती. मात्र, पुन्हा दुसरी लाट आल्याने सर्व बंद करण्यात आले. त्यामुळे दोन महिन्यांपासून जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व दुकाने बंद होती. त्यामुळे मोबाइल दुरुस्ती करता आली नाही. परिणामी अनेकांचे मोबाइल बंद पडले.

घर चालविणे झाले कठीण

मागच्या वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये व यंदाही आम्हाला आमचे मोबाइल दुकान बंद ठेवावे लागले. त्यामुळे आमचा व्यवसाय बुडाला. घर चालविणे कठीण झाले. मोबाइलधारकांच्याही समस्या वाढल्या. परंतु, आमचे दुकानच बंद असल्याने हातात कवडी नाही, असे मोबाइल दुरुस्ती करणाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल महत्त्वाचा; पण आरोग्य

आजघडीला मोबाइल हा आपला अविभाज्य घटक झाला आहे. परंतु, सततच्या वापरामुळे मोबाइलमध्ये बिघाड झाला आहे. आता सकाळी ११ ते ४ वाजेपर्यंत मोबाइल दुकाने सुरू राहणार आहेत. त्यामुळे मोबाइल दुरुस्तीसाठी मी दुकानात जाईल.

सिध्दार्थ शिंदे, मोबाईलधारक

मोबाइल दुरुस्त करण्यासाठी आलो होतो. मोबाइल दुरुस्तीविना घरातच पडून होता. आता प्रत्येक गोष्टीसाठी मोबाइल लागतो. पाेरांनाही मोबाइल पाहिजे. आता निर्बंध काहीअंशी शिथील झाले आहेत. त्यामुळे मोबाइल दुरुस्त करून घेणार आहे. मात्र घराबाहेर पडताना मास्क, सॅनिटायझरचा वापर करीत आहे.

अन्सार शेख, मोबाईलधारक

दीड महिन्यांनतर शटर उघडले

गरिबांपासून तर श्रीमंतांपर्यंत सर्वांचीच मोबाइल आज गरज बनली आहे. त्यामुळे अनेक जण मोबाइल दुरुस्तीसाठी किंवा नवीन मोबाइल खरेदीसाठी दुकानात येत आहेत. संचारबंदीत दुकाने बंदच होती. त्यामुळे आमचे खूप मोठे नुकसान झाले आहे.

सय्यद जहिरोद्दीन, मोबाइल व्यावसायिक

प्रतिदिन ३० हजार रुपयांची उलाढाल होत होती. दीड महिन्यापासून मोबाइल दुकाने बंद होती. दुकाने बंद असली तरी दुकान भाडे व लाइट बिल घरी बसून भरावे लागले. तसेच बँकांचे हप्ते सुरू आहे. आता दुकाने सुरू झाली आहेत. त्यामुळे काहीअंशी दिलासा मिळाला आहे. नागरिकांना मास्क तसेच सॅनिटायझर अनिवार्य केले आहे.

विजय डोके, मोबाइल व्यावसायिक

काय कारण

सततच्या वापरामुळे मोबाइलमध्ये बिघाड झाला. मोबाइल स्क्रीन गार्ड खराब झाले.

फोन आल्यास आपल्याला आवाज येत नाही किंवा फोन केल्यास आवाज येत नाही.

चार्जिंग केल्यानंतर बॅटरी लवकर उतरत आहे.

चार्जिंग सॉकेट खराब झाले.

मोबाइल पडल्याने डिस्प्ले खराब झाला.

मोबाइल टच स्क्रीन खराब झाला.