शहरं
Join us  
Trending Stories
1
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
2
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
3
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
4
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
5
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
6
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
7
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
8
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
9
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
10
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
11
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
12
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
13
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
14
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
15
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
16
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
17
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
18
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
19
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
20
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?

‘परिवर्तन, ग्रामविकास’ बॅनरपुरतेच, गावकीची निवडणूक भावकीच्या मुद्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:26 IST

बालाजी आडसूळ कळंब - ग्रापं निवडणुकीत कुठं ‘परिवर्तन’ तर कुठे ‘ग्रामविकास’ आघाडी मैदानात उतरली आहेे. असं असलं तरी बॅनरवरचा ...

बालाजी आडसूळ

कळंब - ग्रापं निवडणुकीत कुठं ‘परिवर्तन’ तर कुठे ‘ग्रामविकास’ आघाडी मैदानात उतरली आहेे. असं असलं तरी बॅनरवरचा हा ‘विकास’ वास्तवात मात्र ज्याच्या त्याच्या ‘वाड्यात’ घुसला असून ‘गावकी’च्या निवडणुकीत यंदाही ‘भावकी’च्या मुद्यालाच महत्व दिले जात असल्याचे दिसून येत आहे.

कळंब तालुक्यातील ५३ ग्रापंचे कारभारी येत्या १५ जानेवारीला ठरणार आहेत. यात इटकूर, येरमाळा, मंगरूळ, दहिफळ, रांजणी, नायगाव, पाडोळी, हावरगाव, शेलगाव, वडगाव, चोराखळी, कन्हेरवाडी यासारख्या महत्वाच्या ग्रापंचा समावेश आहे. यासाठी प्रशासकीय पातळीवर सर्वतोपरी तयारी अंतिम टप्यात असतानाच लढतीचे चित्र स्पष्ट झालेल्या ग्रामीण भागात ग्रापंची सत्ता काबीज करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. यात काही गावात महाविकास आघाडीचे पाऊल पडले असून भाजपाची कोंडी करण्यात आली आहे. तर काही गावात सेना, भाजपा, राष्ट्रवादी यांनी ‘स्वबळ’ अजमावले आहे. यात इटकूर, येरमाळा येथील तिरंगी लढती वगळता इतर गावात दुरंगी लढती होत आहेत.

उमेदवार, नेते विजयासाठी धडपड करत आहेत. यात सत्ताधारी ‘सत्ता’ टिकवण्यासाठी तर विरोधक ‘परिवर्तन’ करण्यासाठी विविध क्लृप्त्या वापरत आहेत. या स्थितीत बहुतांश गावात विकासाचा मुद्दा हा केवळ ‘बोलाचाच भात अन् बोलाचीच कढी’ ठरत असून प्रत्यक्षात निवडणूक नेहमीप्रमाणे ‘गावकी अन् भावकी’ अशा चक्रव्यूहात अडकली आहे.

चौकट...

मुद्दे बाजूला, विकास पुन्हा वाड्यात घुसला...

गावगाड्यात भावकी, त्यांचे वाड्याला चांगलेच महत्व. ही ‘भाऊबंदकी’ विशेषतः ग्रापं निवडणुकीत बहरात येते. अशावेळी कुठे मागचा ‘हिशोब’ चुकता करायचा असतो तर कुठे पदावर आपल्या माणसांचं ‘बस्तान’ बसवायचं असतं.यात विकासाचा मुद्दा मात्र अचानक गायब होतो. यंदाही बहुतांश गावात निवडणूक रंगात आली असताना ‘विकास’ ज्याच्या त्याच्या ‘वाड्यात’ लुप्त झाला आहे. आडनाव अन् वाड्यावर ‘एकीची मोट’ बांधली जात आहे.

या खिचडीला नाव काय द्यावे

महाविकास आघाडीचा प्रयोग इटकूर, कन्हेरवाडी गावात झाला आहे. तर बहुला, पिंपळगाव येथे सेना, बोर्डा व इटकूर येथे भाजपाचे स्वतंत्र पॅनल आहेत. एका पक्षाचे शिक्कामोर्तब असलेले पॅनल क्वचित आहेत. बहुतांश गावात समविचारांची ‘खिचडी’ शिजली आहे. यामुळे सध्या ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ असा सूर आळविला जात असला तरी मोठ्या गप्पा मारणारे अनेक ‘राव’ गावात स्वतंत्र पॅनल उभे करण्यात, उमेदवार उभे करण्यात अपयशी ठरल्याचे दिसून आले आहे.