शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
3
आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
4
"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला
5
आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार PF चे पैसे; EPFO 3.0 मध्ये आणखी काय बदलणार?
6
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
7
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
8
"गोविंदा फक्त माझा आहे, आम्हाला कोणीच...", घटस्फोटांच्या चर्चांना सुनीता अहुजाने लावलं पूर्णविराम
9
शाळेची फी भरण्यास उशीर, सहावीच्या विद्यार्थ्याला एका खोलीत नेलं आणि...; शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल
10
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
11
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
12
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
13
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
14
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
15
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
16
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
17
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
18
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
19
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
20
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा

‘परिवर्तन, ग्रामविकास’ बॅनरपुरतेच, गावकीची निवडणूक भावकीच्या मुद्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:26 IST

बालाजी आडसूळ कळंब - ग्रापं निवडणुकीत कुठं ‘परिवर्तन’ तर कुठे ‘ग्रामविकास’ आघाडी मैदानात उतरली आहेे. असं असलं तरी बॅनरवरचा ...

बालाजी आडसूळ

कळंब - ग्रापं निवडणुकीत कुठं ‘परिवर्तन’ तर कुठे ‘ग्रामविकास’ आघाडी मैदानात उतरली आहेे. असं असलं तरी बॅनरवरचा हा ‘विकास’ वास्तवात मात्र ज्याच्या त्याच्या ‘वाड्यात’ घुसला असून ‘गावकी’च्या निवडणुकीत यंदाही ‘भावकी’च्या मुद्यालाच महत्व दिले जात असल्याचे दिसून येत आहे.

कळंब तालुक्यातील ५३ ग्रापंचे कारभारी येत्या १५ जानेवारीला ठरणार आहेत. यात इटकूर, येरमाळा, मंगरूळ, दहिफळ, रांजणी, नायगाव, पाडोळी, हावरगाव, शेलगाव, वडगाव, चोराखळी, कन्हेरवाडी यासारख्या महत्वाच्या ग्रापंचा समावेश आहे. यासाठी प्रशासकीय पातळीवर सर्वतोपरी तयारी अंतिम टप्यात असतानाच लढतीचे चित्र स्पष्ट झालेल्या ग्रामीण भागात ग्रापंची सत्ता काबीज करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. यात काही गावात महाविकास आघाडीचे पाऊल पडले असून भाजपाची कोंडी करण्यात आली आहे. तर काही गावात सेना, भाजपा, राष्ट्रवादी यांनी ‘स्वबळ’ अजमावले आहे. यात इटकूर, येरमाळा येथील तिरंगी लढती वगळता इतर गावात दुरंगी लढती होत आहेत.

उमेदवार, नेते विजयासाठी धडपड करत आहेत. यात सत्ताधारी ‘सत्ता’ टिकवण्यासाठी तर विरोधक ‘परिवर्तन’ करण्यासाठी विविध क्लृप्त्या वापरत आहेत. या स्थितीत बहुतांश गावात विकासाचा मुद्दा हा केवळ ‘बोलाचाच भात अन् बोलाचीच कढी’ ठरत असून प्रत्यक्षात निवडणूक नेहमीप्रमाणे ‘गावकी अन् भावकी’ अशा चक्रव्यूहात अडकली आहे.

चौकट...

मुद्दे बाजूला, विकास पुन्हा वाड्यात घुसला...

गावगाड्यात भावकी, त्यांचे वाड्याला चांगलेच महत्व. ही ‘भाऊबंदकी’ विशेषतः ग्रापं निवडणुकीत बहरात येते. अशावेळी कुठे मागचा ‘हिशोब’ चुकता करायचा असतो तर कुठे पदावर आपल्या माणसांचं ‘बस्तान’ बसवायचं असतं.यात विकासाचा मुद्दा मात्र अचानक गायब होतो. यंदाही बहुतांश गावात निवडणूक रंगात आली असताना ‘विकास’ ज्याच्या त्याच्या ‘वाड्यात’ लुप्त झाला आहे. आडनाव अन् वाड्यावर ‘एकीची मोट’ बांधली जात आहे.

या खिचडीला नाव काय द्यावे

महाविकास आघाडीचा प्रयोग इटकूर, कन्हेरवाडी गावात झाला आहे. तर बहुला, पिंपळगाव येथे सेना, बोर्डा व इटकूर येथे भाजपाचे स्वतंत्र पॅनल आहेत. एका पक्षाचे शिक्कामोर्तब असलेले पॅनल क्वचित आहेत. बहुतांश गावात समविचारांची ‘खिचडी’ शिजली आहे. यामुळे सध्या ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ असा सूर आळविला जात असला तरी मोठ्या गप्पा मारणारे अनेक ‘राव’ गावात स्वतंत्र पॅनल उभे करण्यात, उमेदवार उभे करण्यात अपयशी ठरल्याचे दिसून आले आहे.