शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
2
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
3
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
4
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
5
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
6
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
7
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
8
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
9
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
10
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
11
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
12
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
13
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
14
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
15
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
16
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
17
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
18
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
19
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
Daily Top 2Weekly Top 5

‘परिवर्तन, ग्रामविकास’ बॅनरपुरतेच, गावकीची निवडणूक भावकीच्या मुद्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:26 IST

बालाजी आडसूळ कळंब - ग्रापं निवडणुकीत कुठं ‘परिवर्तन’ तर कुठे ‘ग्रामविकास’ आघाडी मैदानात उतरली आहेे. असं असलं तरी बॅनरवरचा ...

बालाजी आडसूळ

कळंब - ग्रापं निवडणुकीत कुठं ‘परिवर्तन’ तर कुठे ‘ग्रामविकास’ आघाडी मैदानात उतरली आहेे. असं असलं तरी बॅनरवरचा हा ‘विकास’ वास्तवात मात्र ज्याच्या त्याच्या ‘वाड्यात’ घुसला असून ‘गावकी’च्या निवडणुकीत यंदाही ‘भावकी’च्या मुद्यालाच महत्व दिले जात असल्याचे दिसून येत आहे.

कळंब तालुक्यातील ५३ ग्रापंचे कारभारी येत्या १५ जानेवारीला ठरणार आहेत. यात इटकूर, येरमाळा, मंगरूळ, दहिफळ, रांजणी, नायगाव, पाडोळी, हावरगाव, शेलगाव, वडगाव, चोराखळी, कन्हेरवाडी यासारख्या महत्वाच्या ग्रापंचा समावेश आहे. यासाठी प्रशासकीय पातळीवर सर्वतोपरी तयारी अंतिम टप्यात असतानाच लढतीचे चित्र स्पष्ट झालेल्या ग्रामीण भागात ग्रापंची सत्ता काबीज करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. यात काही गावात महाविकास आघाडीचे पाऊल पडले असून भाजपाची कोंडी करण्यात आली आहे. तर काही गावात सेना, भाजपा, राष्ट्रवादी यांनी ‘स्वबळ’ अजमावले आहे. यात इटकूर, येरमाळा येथील तिरंगी लढती वगळता इतर गावात दुरंगी लढती होत आहेत.

उमेदवार, नेते विजयासाठी धडपड करत आहेत. यात सत्ताधारी ‘सत्ता’ टिकवण्यासाठी तर विरोधक ‘परिवर्तन’ करण्यासाठी विविध क्लृप्त्या वापरत आहेत. या स्थितीत बहुतांश गावात विकासाचा मुद्दा हा केवळ ‘बोलाचाच भात अन् बोलाचीच कढी’ ठरत असून प्रत्यक्षात निवडणूक नेहमीप्रमाणे ‘गावकी अन् भावकी’ अशा चक्रव्यूहात अडकली आहे.

चौकट...

मुद्दे बाजूला, विकास पुन्हा वाड्यात घुसला...

गावगाड्यात भावकी, त्यांचे वाड्याला चांगलेच महत्व. ही ‘भाऊबंदकी’ विशेषतः ग्रापं निवडणुकीत बहरात येते. अशावेळी कुठे मागचा ‘हिशोब’ चुकता करायचा असतो तर कुठे पदावर आपल्या माणसांचं ‘बस्तान’ बसवायचं असतं.यात विकासाचा मुद्दा मात्र अचानक गायब होतो. यंदाही बहुतांश गावात निवडणूक रंगात आली असताना ‘विकास’ ज्याच्या त्याच्या ‘वाड्यात’ लुप्त झाला आहे. आडनाव अन् वाड्यावर ‘एकीची मोट’ बांधली जात आहे.

या खिचडीला नाव काय द्यावे

महाविकास आघाडीचा प्रयोग इटकूर, कन्हेरवाडी गावात झाला आहे. तर बहुला, पिंपळगाव येथे सेना, बोर्डा व इटकूर येथे भाजपाचे स्वतंत्र पॅनल आहेत. एका पक्षाचे शिक्कामोर्तब असलेले पॅनल क्वचित आहेत. बहुतांश गावात समविचारांची ‘खिचडी’ शिजली आहे. यामुळे सध्या ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ असा सूर आळविला जात असला तरी मोठ्या गप्पा मारणारे अनेक ‘राव’ गावात स्वतंत्र पॅनल उभे करण्यात, उमेदवार उभे करण्यात अपयशी ठरल्याचे दिसून आले आहे.