शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
3
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
4
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
5
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
6
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
7
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
8
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
9
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
10
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
11
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
13
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
14
प्रेमासाठी काय पण...! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
15
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
16
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
17
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
18
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
19
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
20
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!

उमरग्यातील भरोसा केंद्र बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:17 IST

महिलांच्या तक्रारी स्थानिक पोलिसात नोंदवणार उमरगा : महिला आणि बालकांच्या कौटुंबिक तक्रारींचे निवाडे करण्यासाठी उमरगा पोलीस ठाण्यात मागील २३ ...

महिलांच्या तक्रारी स्थानिक पोलिसात नोंदवणार

उमरगा : महिला आणि बालकांच्या कौटुंबिक तक्रारींचे निवाडे करण्यासाठी उमरगा पोलीस ठाण्यात मागील २३ वर्षांपासून सुरू असलेले भरोसा केंद्र अर्थात महिला तक्रार निवारण केंद्र १५ दिवसापासून बंद करण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे महिलांच्या अत्याचारावरील तक्रारी स्थानिक पोलीस ठाण्यातच घेतल्या जाणार आहेत. यासाठी विशेष महिला पोलीस पथक गठीत करण्यात आले असून, या पथकातील एक महिला पोलीस प्रत्येक पोलीस ठाण्यात प्रतिनिधी म्हणून कार्यरत राहणार आहे.

येथील महिला तक्रार निवारण केंद्रात महिलावर होणाऱ्या अत्याचाऱ्याच्या तक्रारी या केंद्रात नोंदवल्या जात होत्या आणि या तक्रारीच्याआधारे केंद्राच्या समितीकडून दोन्ही कुटुंबातील वाद-विवादबाबत चर्चा करून प्रकरण सामोपचाराने मिटवले जात होते. विशेष म्हणजे गेल्या २३ वर्षात जवळपास चार हजारपेक्षा जास्तीच्या कौटुंबिक वाद येथील केंद्रांतर्गत मिटवण्यात आल्याने त्यांचे संसार पुन्हा फुलल्याची उदाहरणे आहेत. अत्याचार पीडित महिलांना आणि त्यांच्या कुटुंबांना तक्रार निवारण केंद्राबाबत अधिकच ‘भरोसा’ असल्यामुळे तालुक्यातील असंख्य पीडित महिला पोलीस ठाण्यात दाद मिळत नसल्यामुळे आपल्या न्यायासाठी येथील भरोसा असलेल्या तक्रार निवारण केंद्राकडे धाव घेत होत्या. मात्र, मागील १५ दिवसापासून या केंद्रात तक्रारी स्वीकारल्या जात नसल्याने तक्रारदार महिलांची मोठी गैरसोय होत आहे.

दरम्यान, पीडित महिलांनी स्थानिक पोलीस ठाण्यातच तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. येथे महिला आणि बालकांवरील गुन्ह्याचे प्रकरण हाताळण्यासाठी जिल्ह्यात विशेष महिला पोलीस पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकांतर्गत प्रत्येक पोलीस ठाण्यात एका महिला पोलीस प्रतिनिधींची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक पोलिसात आलेल्या तक्रारींचे अहवाल महिला प्रतिनिधी पथकाच्या प्रमुखासमोर सादर करण्याच्या सूचना आहेत. सध्या सहायक पोलीस निरीक्षक कोल्हे यांच्याकडे महिलांवरील अत्याचार प्रकरणी तपास करण्याची जबाबदारी सोपवण्यात आले आहे. भरोसा केंद्र नेमके का बंद करण्यात आले, हे जाणून घेण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराधा उदमले यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

कोट.......

वेगवेगळ्या कारणाने होत असलेल्या कौटुंबिक वादाला पोलीस केंद्रात कार्यरत असणाऱ्या महिला तक्रार निवारण केंद्रामुळे (भरोसा केंद्र) अनेकांचे तुटणारे संसार परत उभे राहिले. या केंद्रामुळे पीडित महीलांना मोठा आधार होता. त्यामुळे प्रशासनाने परत या केंद्राची तालुका स्तरावर सुरूवात करावी.

- ॲड. फरहिनबानो पटेल