शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

रसायनाचा ट्रक अचानक पेटल्याने दोन तास वाहतूक ठप्प, 40 लाखाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 18:44 IST

मुंबईहून हैद्राबादकडे रसायनाचे बॅरेल वाहतूक करणारा ट्रक अचानक पेटल्याने दोन तास वाहतूक ठप्प झाली होती़ ही घटना शुक्रवारी दुपारी मुंबई- हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील जळकोट (ता. तुळजापूर) शिवारात घडली़ असून, या घटनेत जवळपास ४० लाख रूपयांचे नुकसान झाले आहे़ 

नळदुर्ग ( उस्मानाबाद ), दि. 22 : मुंबईहून हैद्राबादकडे रसायनाचे बॅरेल वाहतूक करणारा ट्रक अचानक पेटल्याने दोन तास वाहतूक ठप्प झाली होती़ ही घटना शुक्रवारी दुपारी मुंबई- हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील जळकोट (ता. तुळजापूर) शिवारात घडली़ असून, या घटनेत जवळपास ४० लाख रूपयांचे नुकसान झाले आहे़ 

मुंबई येथून हैद्राबादकडे केमिकलचे ७५ बॅरेल घेऊन ट्रक (क्र. के़ए़५६ - ००८९) निघाला होता़ शुक्रवारी सकाळी तुळजापूर तालुक्यातील जळकोट शिवारात आल्यानंतर ट्रक अचानक पाठीमागून पेटला़ पाहता पाहता पूर्ण ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी आल्याने धुराचे लोट  उठले होते़ धुराचे लोट इतके मोठे होते की आठ ते दहा किलोमीटर अंतरावरून दिसत होते़ ट्रकने पेट घेतल्यानंतर क्लिनर, चालकाने ट्रक सोडून घटनास्थळावरून दूर पळ काढला़  घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी येथील अग्निशमन दलाची गाडी बोलावून घेतली़. अग्निशमन दलाचे वाहन आले असले तरी या पथकाला आग विझविण्यात अपेक्षित यश आले नाही. यामुळे अवघा ट्रक या घटनेत जळून खाक झाला़ महामार्गावरच ट्रक पेटल्याने दोन तास वाहतूक ठप्प होती़. आग आटोक्यात येईपर्यंत वाहने मूर्टा, लोहगाव मार्गाने वळविण्यात आली होती़