शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

चाेवीस तासांत एकाच मुद्याला हरकत अन् ना हरकतही..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:28 IST

सकळंब : ना-परतावा असलेली रक्कम नियमांच्या अधीन राहून खर्च करण्यास हरकत नसावी, असे पत्र नगर परिषद प्रशासन संचालनालयाच्या उपसंचालकांनी ...

सकळंब : ना-परतावा असलेली रक्कम नियमांच्या अधीन राहून खर्च करण्यास हरकत नसावी, असे पत्र नगर परिषद प्रशासन संचालनालयाच्या उपसंचालकांनी जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना १७ डिसेंबर रोजी निर्गमित केले हाेते. तर याच मुद्यावर शिवसेनेच्या एका कार्यकर्त्याने घेतलेल्या आक्षेपावर शासनाच्या नगर विकास विभागाने निविदा प्रक्रियेलाच स्थगिती दिल्याचे पत्र १८ डिसेंबर रोजी जिल्हािधकार्यांना पाठविले. एकाच प्रकरणी शासनाच्या दोन विभागाने हारकत-नाहारकतीचे पत्र दिल्याने शासन-प्रशासनात नेमके चाललंय काय? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

कळंब येथील आरक्षण क्र.३२/३३ मधील दुकान गाळ्यांच्या लिलावातून आलेली रक्कम न.प. प्रशासनाला विविध बाबींवर खर्च करता येते का? याबाबत जिल्हािधकार्यांनी नगरपरिषद प्रशासन संचालनालयाकडे विचारणा केली होती. याबाबत १७ डिसेंबर रोजी या विभागाच्या उपसंचालकांनी गाळेलिलावातील ना-परतावा रक्कम ही न.प. च्या स्थावर मालमत्तेपासून मिळालेले भांडवली उत्पन्न आहे. त्यामुळे ते न.प. च्या उत्पन्नाचा भाग ठरते. परिणामी न.प. अधिनियमांच्या अधीन राहून पालिकेची आर्थिक स्थिती विचारात घेता ही रक्कम खर्च करण्यास हरकत नसावी, असा स्पष्ट अभिप्राय जिल्हाधिकारी यांना कळविला हाेता. दरम्यान, हा अभिप्राय पोहोचल्यानंतर सर्व तांत्रिक अडचणी दूर झाल्या असतानाच १८ डिसेंबर रोजी शासनाच्या नगरविकास विभागाने शिवसेनेचे कार्यकर्ते विजय पारवे यांच्या आक्षेपाला ग्राह्य मानून या निविदेप्रक्रियेस स्थगिती दिल्याचे जिल्हाधिकार्यांना कळविले. विशेष म्हणजे नगरपरिषद संचालनालयाच्या उपसंचालकांनी ज्या मुद्यावर स्पष्टीकरण दिले आहे, त्याच मुद्यावर नगरविकास विभागाने कळंब न.प.च्या मुख्याधिकार्यांकडून अहवाल मागविला आहे. म्हणजे शासनाचा उच्चपदस्थ अधिकारी ज्या मुद्याला क्लीनचिट देतात, त्यावर शासनालाचं भरोसा नाही काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाच्याच दोन विभागाकडून एकाच मुद्यावर चोवीस तासात नाहरकत व हरकतीचे पत्र देण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिकांत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या राजकीय साठमारीत शहराच्या विकासकामांना खोडा बसल्याने नाराजीही व्यक्त केली जात आहे.

चाैकट...

राज्यात महाविकास आघाडीत घटकपक्ष असलेले राष्ट्रवादी व शिवसेना कळंब न.प. मध्ये मात्र सत्ताधारी व विरोधक आहेत. यामुळे विकासकामांना ब्रेक लावायची भूमिका घेत नगरविकास विभागामार्र्फत शिवसेनेने स्मशानभूमी विकास कामांना स्थगिती आणली. यासाठी आमदार कैलास पाटील यांनी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा केला. राष्ट्रवादीनेही उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे या कामांवर स्थगिती येवू नये यासाठी पाठपुरावा केला. पण नगरविकास विभाग सेनेेकडे असल्याने तिथे सेनेच्या मंत्र्यांचा शब्द चालला. आता याच कामाला व कळंब न.प. ला जवळपास ५ कोटी रुपयाचा विशेष निधी देण्याच्या हालचाली राष्ट्रवादीच्या गोटात चालू आहेत. या माध्यमातून राष्ट्रवादी शिवसेनेला शह देण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.