शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

तूर डाळ पाच रुपयांनी महागली; खाद्यतेलाचे दर चढेच, भाज्या स्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:28 IST

उस्मानाबाद : स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक असलेले खाद्यतेलाचे चढ-उतार होणारे दर घराघरातील चिंतेचा विषय बनलेला असतानाच या आठवड्यात तूर डाळही ...

उस्मानाबाद : स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक असलेले खाद्यतेलाचे चढ-उतार होणारे दर घराघरातील चिंतेचा विषय बनलेला असतानाच या आठवड्यात तूर डाळही पाच रुपयांनी महागली असून तूर डाळीचे दर ९४ रुपयांहून ९९ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. त्याचप्रमाणे मूग डाळ व उडीद‌ डाळही महागली आहे.

तुरीचे भाव वाढले आहेत. त्यामुळे तूरडाळीच्या दरातही वाढ होऊ लागली आहे. मागील आठवड्यात ९४ रुपये किलोने विक्री होणारी तूरडाळ आता ९९ रुपयांवर जाऊन ठेपली आहे. मूग डाळ व उडीद डाळीच्या दरात वाढ झाली आहे. मूग डाळ ९५ ते ९६, उडीद डाळ ९३, हरभरा डाळ ६५ ते ६८ रुपये, मसूर डाळ ७० ते ७२ रुपये किलोने विक्री होत आहे. शिवाय, खाद्यतेलाच्या दरातही दिवसेंदिवस वाढतच आहेत. सोयाबीन तेल १२५ रुपये, सूर्यफूल तेल १३५ ते १३८ रुपये, शेंगदाणा तेल १५५ ते १६० रुपये किलो, पामतेल १०८ ते ११० रुपये प्रतिकिलोने विक्री होत आहे. डाळींचे दर आणखीन वाढण्याची शक्यता असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

चौकटी...

कांद्याचे दर स्थिर...

बाजारात नवीन कांदा आल्याने कांद्याचे दर स्थिर आहेत. कांदा ४० ते ५० रुपये प्रति किलो दराने विक्री होत आहे. बटाटा, वांगी १० ते १५ रुपये, पत्ताकोबी, फ्लॉवर १० रुपये, भेंडी, दोडका ३० रुपये, कारले ४०, गवार, शेवगा ५० ते ६० रुपये किलोने विक्री होत आहे.

सफरचंद महागले

बाजारात सफरचंदाची आवक कमी असल्याने सफरचंदाचे दर वाढले आहेत. सफरचंद १४० ते १६० रुपये किलोने विक्री होत आहेत. संत्रा, चिकू ५० रुपये, द्राक्षे लागल्याने ६० ते ७० रुपये किलाे दराने विक्री होत आहे.

टोमॅटो ५ रुपये

यंदा अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली होती. परिणामी, टोमॅटोचे उत्पादन वाढले आहेत. बाजारात मागणीच्या तुलनेत आवक अधिक असल्याने टोमॅटो ५ ते १० रुपये किलोने विक्री होत आहे.त्याचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतोय.

तीन चार महिन्यापासून तेलाचे दर वाढत आहेत. आता डाळीचे दरातही वाढ होत आहे. त्याचा सर्वसामान्यांना फटका बसत आहे. पालेभाज्या स्वस्त असल्याने काही अंशी दिलासा मिळत आहे.

- समाधान सरवदे, ग्राहक

मागील काही दिवसापासून वातावरणात गारठा वाढला आहे. त्यामुळे संत्रा, खरबूज, द्राक्षाला मागणी कमी आहे. सफरचंदाची आवक कमी असल्याने सफरचंद महागले आहे.

- समीर बागवान, फळविक्रेते

खाद्यतेलाचे दरात वाढ होत आहे. तुरीचा दर वाढला असल्याने तूर डाळीचा दर वाढला आहे. तूर डाळ ९९ रुपये किलोने विक्री होत आहे. इतर डाळीच्या किमतीतही काही अंशी वाढ झाली आहे.

- अमित गांधी, किराणा व्यावसायिक.