शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

तूर डाळ पाच रुपयांनी महागली; खाद्यतेलाचे दर चढेच, भाज्या स्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:28 IST

उस्मानाबाद : स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक असलेले खाद्यतेलाचे चढ-उतार होणारे दर घराघरातील चिंतेचा विषय बनलेला असतानाच या आठवड्यात तूर डाळही ...

उस्मानाबाद : स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक असलेले खाद्यतेलाचे चढ-उतार होणारे दर घराघरातील चिंतेचा विषय बनलेला असतानाच या आठवड्यात तूर डाळही पाच रुपयांनी महागली असून तूर डाळीचे दर ९४ रुपयांहून ९९ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. त्याचप्रमाणे मूग डाळ व उडीद‌ डाळही महागली आहे.

तुरीचे भाव वाढले आहेत. त्यामुळे तूरडाळीच्या दरातही वाढ होऊ लागली आहे. मागील आठवड्यात ९४ रुपये किलोने विक्री होणारी तूरडाळ आता ९९ रुपयांवर जाऊन ठेपली आहे. मूग डाळ व उडीद डाळीच्या दरात वाढ झाली आहे. मूग डाळ ९५ ते ९६, उडीद डाळ ९३, हरभरा डाळ ६५ ते ६८ रुपये, मसूर डाळ ७० ते ७२ रुपये किलोने विक्री होत आहे. शिवाय, खाद्यतेलाच्या दरातही दिवसेंदिवस वाढतच आहेत. सोयाबीन तेल १२५ रुपये, सूर्यफूल तेल १३५ ते १३८ रुपये, शेंगदाणा तेल १५५ ते १६० रुपये किलो, पामतेल १०८ ते ११० रुपये प्रतिकिलोने विक्री होत आहे. डाळींचे दर आणखीन वाढण्याची शक्यता असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

चौकटी...

कांद्याचे दर स्थिर...

बाजारात नवीन कांदा आल्याने कांद्याचे दर स्थिर आहेत. कांदा ४० ते ५० रुपये प्रति किलो दराने विक्री होत आहे. बटाटा, वांगी १० ते १५ रुपये, पत्ताकोबी, फ्लॉवर १० रुपये, भेंडी, दोडका ३० रुपये, कारले ४०, गवार, शेवगा ५० ते ६० रुपये किलोने विक्री होत आहे.

सफरचंद महागले

बाजारात सफरचंदाची आवक कमी असल्याने सफरचंदाचे दर वाढले आहेत. सफरचंद १४० ते १६० रुपये किलोने विक्री होत आहेत. संत्रा, चिकू ५० रुपये, द्राक्षे लागल्याने ६० ते ७० रुपये किलाे दराने विक्री होत आहे.

टोमॅटो ५ रुपये

यंदा अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली होती. परिणामी, टोमॅटोचे उत्पादन वाढले आहेत. बाजारात मागणीच्या तुलनेत आवक अधिक असल्याने टोमॅटो ५ ते १० रुपये किलोने विक्री होत आहे.त्याचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतोय.

तीन चार महिन्यापासून तेलाचे दर वाढत आहेत. आता डाळीचे दरातही वाढ होत आहे. त्याचा सर्वसामान्यांना फटका बसत आहे. पालेभाज्या स्वस्त असल्याने काही अंशी दिलासा मिळत आहे.

- समाधान सरवदे, ग्राहक

मागील काही दिवसापासून वातावरणात गारठा वाढला आहे. त्यामुळे संत्रा, खरबूज, द्राक्षाला मागणी कमी आहे. सफरचंदाची आवक कमी असल्याने सफरचंद महागले आहे.

- समीर बागवान, फळविक्रेते

खाद्यतेलाचे दरात वाढ होत आहे. तुरीचा दर वाढला असल्याने तूर डाळीचा दर वाढला आहे. तूर डाळ ९९ रुपये किलोने विक्री होत आहे. इतर डाळीच्या किमतीतही काही अंशी वाढ झाली आहे.

- अमित गांधी, किराणा व्यावसायिक.