शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

तूर डाळ पाच रुपयांनी महागली; खाद्यतेलाचे दर चढेच, भाज्या स्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:28 IST

उस्मानाबाद : स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक असलेले खाद्यतेलाचे चढ-उतार होणारे दर घराघरातील चिंतेचा विषय बनलेला असतानाच या आठवड्यात तूर डाळही ...

उस्मानाबाद : स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक असलेले खाद्यतेलाचे चढ-उतार होणारे दर घराघरातील चिंतेचा विषय बनलेला असतानाच या आठवड्यात तूर डाळही पाच रुपयांनी महागली असून तूर डाळीचे दर ९४ रुपयांहून ९९ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. त्याचप्रमाणे मूग डाळ व उडीद‌ डाळही महागली आहे.

तुरीचे भाव वाढले आहेत. त्यामुळे तूरडाळीच्या दरातही वाढ होऊ लागली आहे. मागील आठवड्यात ९४ रुपये किलोने विक्री होणारी तूरडाळ आता ९९ रुपयांवर जाऊन ठेपली आहे. मूग डाळ व उडीद डाळीच्या दरात वाढ झाली आहे. मूग डाळ ९५ ते ९६, उडीद डाळ ९३, हरभरा डाळ ६५ ते ६८ रुपये, मसूर डाळ ७० ते ७२ रुपये किलोने विक्री होत आहे. शिवाय, खाद्यतेलाच्या दरातही दिवसेंदिवस वाढतच आहेत. सोयाबीन तेल १२५ रुपये, सूर्यफूल तेल १३५ ते १३८ रुपये, शेंगदाणा तेल १५५ ते १६० रुपये किलो, पामतेल १०८ ते ११० रुपये प्रतिकिलोने विक्री होत आहे. डाळींचे दर आणखीन वाढण्याची शक्यता असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

चौकटी...

कांद्याचे दर स्थिर...

बाजारात नवीन कांदा आल्याने कांद्याचे दर स्थिर आहेत. कांदा ४० ते ५० रुपये प्रति किलो दराने विक्री होत आहे. बटाटा, वांगी १० ते १५ रुपये, पत्ताकोबी, फ्लॉवर १० रुपये, भेंडी, दोडका ३० रुपये, कारले ४०, गवार, शेवगा ५० ते ६० रुपये किलोने विक्री होत आहे.

सफरचंद महागले

बाजारात सफरचंदाची आवक कमी असल्याने सफरचंदाचे दर वाढले आहेत. सफरचंद १४० ते १६० रुपये किलोने विक्री होत आहेत. संत्रा, चिकू ५० रुपये, द्राक्षे लागल्याने ६० ते ७० रुपये किलाे दराने विक्री होत आहे.

टोमॅटो ५ रुपये

यंदा अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली होती. परिणामी, टोमॅटोचे उत्पादन वाढले आहेत. बाजारात मागणीच्या तुलनेत आवक अधिक असल्याने टोमॅटो ५ ते १० रुपये किलोने विक्री होत आहे.त्याचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतोय.

तीन चार महिन्यापासून तेलाचे दर वाढत आहेत. आता डाळीचे दरातही वाढ होत आहे. त्याचा सर्वसामान्यांना फटका बसत आहे. पालेभाज्या स्वस्त असल्याने काही अंशी दिलासा मिळत आहे.

- समाधान सरवदे, ग्राहक

मागील काही दिवसापासून वातावरणात गारठा वाढला आहे. त्यामुळे संत्रा, खरबूज, द्राक्षाला मागणी कमी आहे. सफरचंदाची आवक कमी असल्याने सफरचंद महागले आहे.

- समीर बागवान, फळविक्रेते

खाद्यतेलाचे दरात वाढ होत आहे. तुरीचा दर वाढला असल्याने तूर डाळीचा दर वाढला आहे. तूर डाळ ९९ रुपये किलोने विक्री होत आहे. इतर डाळीच्या किमतीतही काही अंशी वाढ झाली आहे.

- अमित गांधी, किराणा व्यावसायिक.