शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

तूर डाळ पाच रुपयांनी महागली; खाद्यतेलाचे दर चढेच, भाज्या स्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:28 IST

उस्मानाबाद : स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक असलेले खाद्यतेलाचे चढ-उतार होणारे दर घराघरातील चिंतेचा विषय बनलेला असतानाच या आठवड्यात तूर डाळही ...

उस्मानाबाद : स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक असलेले खाद्यतेलाचे चढ-उतार होणारे दर घराघरातील चिंतेचा विषय बनलेला असतानाच या आठवड्यात तूर डाळही पाच रुपयांनी महागली असून तूर डाळीचे दर ९४ रुपयांहून ९९ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. त्याचप्रमाणे मूग डाळ व उडीद‌ डाळही महागली आहे.

तुरीचे भाव वाढले आहेत. त्यामुळे तूरडाळीच्या दरातही वाढ होऊ लागली आहे. मागील आठवड्यात ९४ रुपये किलोने विक्री होणारी तूरडाळ आता ९९ रुपयांवर जाऊन ठेपली आहे. मूग डाळ व उडीद डाळीच्या दरात वाढ झाली आहे. मूग डाळ ९५ ते ९६, उडीद डाळ ९३, हरभरा डाळ ६५ ते ६८ रुपये, मसूर डाळ ७० ते ७२ रुपये किलोने विक्री होत आहे. शिवाय, खाद्यतेलाच्या दरातही दिवसेंदिवस वाढतच आहेत. सोयाबीन तेल १२५ रुपये, सूर्यफूल तेल १३५ ते १३८ रुपये, शेंगदाणा तेल १५५ ते १६० रुपये किलो, पामतेल १०८ ते ११० रुपये प्रतिकिलोने विक्री होत आहे. डाळींचे दर आणखीन वाढण्याची शक्यता असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

चौकटी...

कांद्याचे दर स्थिर...

बाजारात नवीन कांदा आल्याने कांद्याचे दर स्थिर आहेत. कांदा ४० ते ५० रुपये प्रति किलो दराने विक्री होत आहे. बटाटा, वांगी १० ते १५ रुपये, पत्ताकोबी, फ्लॉवर १० रुपये, भेंडी, दोडका ३० रुपये, कारले ४०, गवार, शेवगा ५० ते ६० रुपये किलोने विक्री होत आहे.

सफरचंद महागले

बाजारात सफरचंदाची आवक कमी असल्याने सफरचंदाचे दर वाढले आहेत. सफरचंद १४० ते १६० रुपये किलोने विक्री होत आहेत. संत्रा, चिकू ५० रुपये, द्राक्षे लागल्याने ६० ते ७० रुपये किलाे दराने विक्री होत आहे.

टोमॅटो ५ रुपये

यंदा अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली होती. परिणामी, टोमॅटोचे उत्पादन वाढले आहेत. बाजारात मागणीच्या तुलनेत आवक अधिक असल्याने टोमॅटो ५ ते १० रुपये किलोने विक्री होत आहे.त्याचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतोय.

तीन चार महिन्यापासून तेलाचे दर वाढत आहेत. आता डाळीचे दरातही वाढ होत आहे. त्याचा सर्वसामान्यांना फटका बसत आहे. पालेभाज्या स्वस्त असल्याने काही अंशी दिलासा मिळत आहे.

- समाधान सरवदे, ग्राहक

मागील काही दिवसापासून वातावरणात गारठा वाढला आहे. त्यामुळे संत्रा, खरबूज, द्राक्षाला मागणी कमी आहे. सफरचंदाची आवक कमी असल्याने सफरचंद महागले आहे.

- समीर बागवान, फळविक्रेते

खाद्यतेलाचे दरात वाढ होत आहे. तुरीचा दर वाढला असल्याने तूर डाळीचा दर वाढला आहे. तूर डाळ ९९ रुपये किलोने विक्री होत आहे. इतर डाळीच्या किमतीतही काही अंशी वाढ झाली आहे.

- अमित गांधी, किराणा व्यावसायिक.