शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

अंगणी तुळस, पारावर पिंपळ, वेशीवर वड अन्‌ बांधावर लिंब...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:33 IST

कळंब : मागच्या पिढीने जिथं माणसांचा राबता, तिथं वृक्षसंपदा जोपासली. त्यामुळे अंगणी तुळस, पारावर पिंपळ, वेशीवर वड, बांधावर लिंब, ...

कळंब : मागच्या पिढीने जिथं माणसांचा राबता, तिथं वृक्षसंपदा जोपासली. त्यामुळे अंगणी तुळस, पारावर पिंपळ, वेशीवर वड, बांधावर लिंब, अशी परिस्थिती गावागावात दिसून येत होती. जास्त ‘ऑक्सिजन’ देणाऱ्या या वृक्षांचे महत्त्व त्यांनी जाणले होते, हेच यावरून अधोरेखित होते. यामुळे ‘श्वास’ गुदमरत असलेल्या सध्याच्या पिढीने याचे अनुकरण करावे, असाच संदेश यातून मिळत आहे.

मनुष्यप्राणी, पशू, पक्षी अशा जैवविविधतेला ‘प्राणवायू’ देण्याचे काम याच सजीवसृष्टीतील वनस्पती करीत आल्या आहेत. वृक्षसंपदा घनदाट, तर पर्यावरण संतुलित अन् पर्यावरण समृद्ध, तर मानवी स्वास्थ्य धडधाकट, असे हे चक्र अनादि काळापासून चालत आलेले आहे.

संतांनी ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे...’चा दाखला यातूनच दिला असावा. हे मागच्या पिढ्यांनी जाणलं होतं. म्हणूनच त्यांनी वृक्षसंपदा जपत आपला ‘अधिवास’ पर्यावरणपूरक केल्याचे दिसून येते.

मागच्या काही दशकांत गावगाड्यात ‘विकास’ घुसला. यामुळे गावे बदलली. असे असले तरी काही गावांत मागच्या पिढ्यांच्या खाणाखुणा अद्याप शिल्लक आहेत. गावात दाखल झाल्यानंतर दिसणारी घनदाट व डौलदार झाडे, ही यापैकीच एक. वेशीवर, नाक्यावर, मोक्यावर, चौकात अन् पारावर या टुमदार वृक्षांचे बीजारोपण मागच्या पिढ्यांनी केले. त्यातून उरल्यासुरल्या खुणांची सावली आजची ‘स्मार्ट’ पिढी घेत आहे.

विशेषतः वर्दळ व मोक्याच्या ठिकाणी लावलेली ही झाडे अधिक ऑक्सिजन देणारी आहेत. जीवनात प्राणवायूला असलेलं महत्त्व त्या पिढीला माहीत होतं हेच यावरून स्पष्ट होतं. सध्याच्या कोरोना संकटात ‘ऑक्सिजन’चा अभाव अन् यामुळे श्वास गुदमरलेले रुग्ण पाहिल्यावर ‘झाडं लावा, झाडं जगवा’ नव्हे, तर ‘झाडं लावा, माणसं जगवा’ असाच संदेश पुढच्या पिढीला ही वृक्षसंपदा देत आहे.

चौकट...

वृक्ष नव्हे, हे तर ‘ऑक्सिजन प्लांट’

अंगणात तुळस, पारावर पिंपळ, वेशीवर वड, विहिरीवर उंबर, बांधावर कडुलिंब, ओढ्यात जांभूळ हा मागच्या पिढीचा शिरस्ता होता. इतरांपेक्षा अधिक ऑक्सिजन देणारी ही झाडं. त्यातच गावाची लोकसंख्या जेमतेम. यामुळे गाव, पार अन् वे‌शीवर एकत्र यायचं, शेतात राबायचं अन् घरात स्थिरावायचं. नेमक्या अशाच ठिकाणी जास्त ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षांची मागच्या पिढ्यांनी लागवड केली. इटकूर, कन्हेरवाडी, मस्सा, शेवगाव, गंभीरवाडी, आडसूळवाडी, बहुला, मोहा अशा अनेक गावांत पार, वेस, चौकात असे जुन्या पिढीने कार्यान्वित केलेले ‘ऑक्सिजन प्लांट’च्या खुणा आजही आहेत.

या देशी वृक्षांचे महत्त्व जाणा

वटवृक्ष कुळातील वड, पिंपळ, उंबर, नांदुरकी यासह तुळस, कडुनिंब, अशोक, बांबू, जांभूळ, अर्जुन, कदंब आदी वृक्ष आदी जास्त काळ व जास्त क्षमतेने ऑक्सिजन देतात. यात २३ तासांपैकी साधारणतः २२ तास पिंपळ, तर इतर २० तासांच्या आसपास ऑक्सिजन देतात. जितकी पानं जास्त तितका प्राणवायू जास्त. यामुळेच आकाराने मोठे, पानाची संख्या जास्त असलेल्या पिंपळ, अक्षयवृक्ष अर्थात वडाचे स्थान यासंदर्भात मोठे मानाचे आहे. ही सारी देशी वृक्षसंपदा जुनी पिढी प्राधान्याने जोपासत आली होती.

वृक्ष, मनुष्य आणि ऑक्सिजन

रंग, गंध व चवहीन असलेलं ‘ऑक्सिजन’ मनुष्यासाठी ‘प्राणवायू’ आहे. शरीरात ९५ ते १०० असा प्राणवायूचा स्तर असेल तर शरीर कार्यक्षम राहते, सर्व अवयव चांगले काम करतात. अन्न-पाण्यातून १०, तर ऑक्सिजनमधून ९० टक्के ऊर्जा मिळते. श्वासातूून घेतल्या जाणाऱ्या हवेत २० टक्के ऑक्सिजन असतो. एक मनुष्य साधारणतः मिनिटाला पंधरा, तर दिवसाला २१ हजार ६०० श्वास घेतो. एकूणच माणसाला दिवसाला ५५० लिटर ऑक्सिजन लागतो. आता झाडाचा विचार केला, तर एक झाड प्रतिदिन किमान २३० ते ४०० लिटर ऑक्सिजन देते. एक पान एका तासात पाच मिलिलिटरपेक्षा जास्त ऑक्सिजन देते. वायुमंडलात ७८ टक्के नायट्रोजन व २१ टक्के ऑक्सिजन असतो. यातील ७० ते ८० टक्के ऑक्सिजन समुद्री वनस्पती देतात. जमिनीवरील वनस्पतीचा यात वाटा तुलनेने कमी आहे. यामुळे दररोज घटत चाललेली वृक्षसंपदा हे किती धोकादायक आहे, हे यावरून लक्षात येते.