उस्मानाबाद : शासनाचे आदेश आल्यानंतर साेमवार व मंगळवार असे दाेन दिवस पात्र कर्मचाऱ्यांच्या विनंती व प्रशासकीय कारणांवरून विविध विभागातील ७९ बदल्या करण्यात आल्या. यामध्ये सामान्य प्रशासन विभागातील सर्वाधिक २६ बदल्यांचा समावेश आहे.
राज्य शासनाकडून बदल्यांना हिरवा कंदील मिळताच सामान्य प्रशासन विभागाकडून नियाेजन करण्यात आले. सीईओ राहुल गुप्ता यांच्या निर्देशानुसार साेमवार व मंगळवार हे दाेन दिवस बदली प्रक्रियेसाठी निश्चित करण्यात आले हाेते. बदली प्रक्रिया पारदर्शक वातावरणात व्हावी, म्हणून समुपदेशन पद्धतीचा अवलंब करण्यात आला. बदली प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी म्हणजेच साेमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी गुप्ता हे काेराेनाच्या मिटिंगमध्ये अडकून पडल्याने प्रक्रिया काही काळ विलंबाने सुरू झाली हाेती. रात्री साडेआठ वाजता संबंधित विभागाच्या बदल्या झाल्यानंतरच त्यांनी दालन साेडले. दुसऱ्या दिवशी म्हणजे, बुधवारी निर्धारित वेळेत ही प्रक्रिया पार पडली. उपराेक्त दाेन दिवसांत जवळपास ७९ बदल्या करण्यात आल्या. यामध्ये बांधकाम विभागातील ३, आराेग्य १४, महिला व बालकल्याण १, पशुसंवर्धन ८, कृषी १, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग १, ग्रामपंचायत विभाग १८, वित्त विभाग ३, शिक्षण विभाग ४, तर सामान्य प्रशासन विभागातील सर्वाधिक २६ बदल्या झाल्या आहेत. दरम्यान, बदली झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तातडीने पदभार स्वीकारावा, असे निर्देश सीईओ गुप्ता यांनी दिले आहेत.