शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
5
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
6
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
7
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
8
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
9
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
10
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
11
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
12
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
13
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
14
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
15
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
16
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
17
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
18
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
19
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
20
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
Daily Top 2Weekly Top 5

आजचं भागलं; उद्याचं काय? लसीकरण केंद्रावर नागरिकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:32 IST

उस्मानाबाद : मागणीच्या तुलनेत जिल्ह्यास लस मिळत नसल्याने नागरिकांना केंद्रावरून रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत १४ ...

उस्मानाबाद : मागणीच्या तुलनेत जिल्ह्यास लस मिळत नसल्याने नागरिकांना केंद्रावरून रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत १४ हजार व्यक्तींचे लसीकरण झाले. केवळ ७०० लस उपलब्ध असल्याने मंगळवारी अनेक केंद्रे बंद ठेवण्याची नामुष्की आरोग्य यंत्रणेवर येऊ शकते. लसीचा पुरवठा नियमित न झाल्यास १ मेपासून काय होणार? असा प्रश्नही आता नागरिकांतून केला जाऊ लागला आहे.

कोरोना संसर्गापासून बचाव, करण्याकरिता शासन व प्रशासनाकडून लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात सध्या ४५ वर्षांपुढील नागरिकांना लस टोचण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल्याने नागरिकांचा लसीकरण करून घेण्याकडे कल वाढला. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर गर्दी होतेय. नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहता आरोग्य विभागाच्या वतीने लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे शिवाय, लसीची मागणी करण्यात येत आहे. मात्र, मागणीच्या तुलनेत लसीचा पुरवठा होत नसल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. रविवारी १५ हजार लस आरोग्य विभागास प्राप्त झाली होती. सोमवारी दिवसभरात १४ हजार २९८ जणांचे लसीकरण झाले. त्यामुळे सद्य:स्थितीत केवळ ७०२ लस उपलब्ध आहेत. त्यामुळे मंगळवारी लस प्राप्त न झाल्यास अनेक केंद्रे बंद करण्याची वेळ आरोग्य विभागावर येऊ शकते. केंद्र सरकारने १ मे पासून १८ वर्षांपुढील व्यक्तींना लस देण्याची घोषणा केली आहे. सर्व नागरिकांना लस मिळण्यासाठी नियमित पुरवठा होणे गरजेचे आहे.

अशी आहे आकडेवारी

११५ सध्या सुरु असलेले केंद्र

२१९ जिल्ह्यातील एकूण लसीकरण केंद्र

१२००० जणांना दररोज लस देण्याचे उद्दिष्ट

१२००० जणांना प्रत्यक्षात लस दिली जाते

आतापर्यंत २३ टक्के टार्गेट पूर्ण

१ मे नंतरचे नियोजन काय

जिल्ह्यात सध्या २११ सरकारी व ८ खासगी असे एकूण २१९ लसीकरण केंद्र आहेत. या केंद्रावरून ४५ वर्षांपुढील व्यक्तींना लस दिली जात आहे.

१ मेपासून जिल्हयातील १८ ते ४४ वयोगटांतील १३ लाख ११ हजार ७२६ नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे. यासोबतच ४५ वर्षांपुढील नागरिकांना लस दिली जाणार आहे.

केंद्रावर गर्दी होऊ नये, यासाठी आता ग्रामीण भागातही लसीकरण केंद्र सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. प्रतिदिन २० हजार नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट राहील.

कोट...

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू असून, आतापर्यंत १ लाख ४९ हजार ५९८ जणांचे लसीकरण झाले आहे. मागणीच्या तुलनेत लसीचा पुरवठा कमी होत आहे. मात्र, लसीकरण सुरळीत सुरू आहे. सध्या १ लाख लसीची मागणी केली आहे.

डॉ. कुलदीप मिटकरी,

लसीकरण अधिकारी

१) जिल्ह्यातील ४५ वर्षांपुढील १ लाख २८ हजार १६४ नागरिकांनी २६ एप्रिलपर्यंत लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर दुसरा डोस २१ हजार ४३४ व्यक्तींनी घेतला असून, एकूण १ लाख ५९ हजार ५९८ जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

२) १८ ते ४४ वयोगटांतील १३ लाख ११ हजार व्यक्तींचे १ मेपासून लसीकरण सुरू होणार आहे. लसीचा पुरवठा सुरळीत न झाल्यास लसीकरण मोहिमेला ब्रेक बसू शकतो.

३ प्रत्येक व्यक्तीला लस घेता यावी, यासाठी जिल्ह्यात २१९ लसीकरण केंद्र सुरू असून, १ मेनंतर आणखी २६ केंद्रे वाढण्याची शक्यता आहे तसेच शासनाने शाळांमध्ये लस देण्यास परवानगी दिल्यास प्रत्येक गावांमध्ये लसीकरण केंद्र होऊ शकते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.