शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याचा लाैकिक वाढविणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा आज सन्मान सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:33 IST

उस्मानाबाद : नगरपरिषदेच्या वतीने जिल्ह्याचा नावलाैकिक वाढविणाऱ्या व्यक्तिमत्त्वास ‘उस्मानाबाद भूषण’ व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा कार्यगाैरव पुरस्काराने १५ ऑगस्ट ...

उस्मानाबाद : नगरपरिषदेच्या वतीने जिल्ह्याचा नावलाैकिक वाढविणाऱ्या व्यक्तिमत्त्वास ‘उस्मानाबाद भूषण’ व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा कार्यगाैरव पुरस्काराने १५ ऑगस्ट राेजी सकाळी १० पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे. ही माहिती नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी दिली.

उस्मानाबाद नगरपरिषदेची स्थापना २५ मे, १९५८ राेजी झाली आहे. प्रत्येक वर्षी २५ मे हा नगरपरिषद स्थापना दिवस म्हणून साजरा केला जाताे. या स्थापना दिनाचे औचित्य साधून उपराेक्त पुरस्कार जाहीर करण्यात आले हाेते, परंतु काेराेना महामारीमुळे पुरस्कार वितरण साेहळा घेता आला नाही. दरम्यान, सध्या काेराेनाचा संसर्ग काही अंशी ओसरला आहे. शासनाने निर्बंधही शिथिल केले आहेत. त्यामुळे १५ ऑगस्ट राेजी सकाळी १० वाजता पालिकेच्या प्रांगणात हा पुरस्कार वितरण साेहळा घेण्यात येणार आहे. अध्यक्षस्थानी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, तर आमदार कैलास पाटील, नगराध्यक्ष मकरंद शूरसेन राजेनिंबाळकर व उपाध्यक्ष अभय इंगळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. उस्मानाबाद भूषण पुरस्काराने माजी न्यायमूर्ती पुरुषाेत्तम गायकवाड यांना देण्यात येणार आहे. गायकवाड हे ताेरंबा गावचे रहिवासी आहेत.

यासाेबतच कार्यगाैरव पुरस्काराने क्रीडा क्षेत्रातील अर्जुन पुरस्कार प्राप्त राष्ट्रीय खाे-खाे संघाच्या कॅप्टन सारिका काळे, खाे-खाे प्रशिक्षक चंद्रजीत जाधव, क्रिकेट प्रशिक्षक राम हिरापुरे यांना सन्मानित केले जाणार आहे. आराेग्य क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल डाॅ.इस्माईल मुल्ला, डाॅ.सचिन देशमुख, डाॅ.प्रवीण डुमणे, डाॅ.विशाल वडगावकर, डाॅ.सुश्रुत डंबळ, डाॅ.शकील अहमद खान, डाॅ.अनुराधा लाेखंडे यांना गाैरविले जाणार आहे. सामाजिक क्षेत्रातून संजय निंबाळकर, शैक्षणिक क्षेत्रातून सुधीर पाटील, लहू लाेमटे, सुरेश गायकवाड, कला क्षेत्रातील दीपाली नायगावकर, नगरपरिषदेतील पृथ्वीराज पवार, संजय कुलकर्णी, सुनील कांबळे, विलास गाेरे, शासकीय रुग्णालयातील जावदकर सुमन बासू, वाहिदा शेख, उषा दाणे, संध्या निकम, सुरेखा जाधव, नीलेश पाचभाई, तर साहित्य क्षेत्रातून युवराज नळे यांना सन्मानित केले जाणार आहे. या सन्मान साेहळ्यास नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी केले आहे.