शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

राज्य संरक्षित स्मारके आली सातबारावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:36 IST

उस्मानाबाद : प्राचीन व ऐतिहासिक वारसा लाभलेले अनेक स्मारके एकतर डागडुजीविना नामशेष होतात. किंबहुना कोणीतरी अतिक्रमण करून ते आपल्या ...

उस्मानाबाद : प्राचीन व ऐतिहासिक वारसा लाभलेले अनेक स्मारके एकतर डागडुजीविना नामशेष होतात. किंबहुना कोणीतरी अतिक्रमण करून ते आपल्या ताब्यात घेतात. असे प्रकार थांबून या स्मारकांचे संवर्धन करण्याच्या हेतूने त्यांची नोंद सातबारावर घेण्याचा उपक्रम उस्मानाबादच्या महसूल विभागाने सुरू केला आहे. पुरातत्त्व विभागाच्या मदतीने पहिल्या टप्प्यात तेर येथील आठ राज्य संरक्षित स्मारके आता साताबारावर उतरली आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यात अगदी पुरातन काळातील वास्तू वैभवशाली इतिहासाची साक्ष देत आजही उभ्या आहेत. विशेषत: तेर म्हणजेच प्राचीन तगर हे इ.स.पूर्व तिसऱ्या शतकातील एक प्राचीन व्यापारी केंद्र आहे. याबाबतच्या पाऊलखुणा तेथील पुरातत्त्वीय अवशेषाच्या माध्यमातून आजही दिसून येतात. आतापर्यंत तेर येथील काही टेकड्यांवर १९५८ पासून आठ वेळा पुरातत्त्वीय उत्खनन करण्यात आले आहे. यातून प्राचीन तगर शहराच्या इतिहासाचा उलगडा होत गेला. येथे आढळून आलेल्या १४ प्राचीन वास्तू व टेकड्यांना पुरातत्त्व विभागाने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केली आहेत. मात्र, त्यांच्या देखभालीकडे काहीसे दुर्लक्ष झाले होते. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी या स्मारकांची पाहणी केल्यानंतर त्यांच्या संवर्धनासाठी लागलीच

पुरातत्व विभागासमवेत बैठक घेऊन या स्मारकांची महसुली अभिलेखात नोंद घेण्याच्या अनुषंगाने सूचना केल्या होत्या. पुरातत्त्व विभागानेही वेळेत परिपूर्ण प्रस्ताव दाखल केले. यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी सचिन गिरी, उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, तहसीलदार गणेश माळी, नायब तहसीलदार संतोष पाटील, मंडळ अधिकारी ए. बी. तीर्थनकर, तेरचे तलाठी एस.एम.माळी यांनी त्वरेने पुढील कार्यवाही करुन ९ ऑगस्ट रोजी सुमारे ८ स्मारकांच्या नोंदी महसुली अभिलेखात करुन घेतल्या. त्यामुळे या स्मारकांच्या संवर्धनाला बळ मिळाले आहे.

स्मारके, टेकड्यांना मिळाले संरक्षण...

जिल्हाधिकारी दिवेगावकर यांच्या सूचनेनुसार तेर येथील गावठाणाबाहेरील ८ राज्य संरक्षित स्मारकाच्या नोंदी महसुली अभिलेखात घेतल्या आहेत. यामध्ये बैरागी पांढर, तीर्थकुंड, चैत्यगृह, तेरणा नदीपलीकडे असलेली सुलेमान टेकडी, रेणुकाई टेकडी, गोदावरी टेकडी यांचा समावेश आहे. पुरातत्व विभागाच्या वतीने तंत्र सहायक अमोल गोटे यांनी यात मोलाचे भूमिका बजावली. दरम्यान, अशा प्रकारे एकत्रितपणे एवढ्या स्मारकाच्या नोंदी महसुली अभिलेखात घेण्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच प्रक्रिया ठरली आहे.