शहरं
Join us  
Trending Stories
1
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
2
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
3
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
4
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
5
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
6
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
7
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
8
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
9
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
10
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
11
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
12
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
13
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
14
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
15
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
16
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
17
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
18
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
19
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
20
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक

पीकविम्यासाठी होतेय चालढकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:12 IST

उस्मानाबाद : अतिवृष्टीने शेतीपिकांचे प्रचंड नुकसान होऊनही केवळ तांत्रिक कारण समोर करुन विमा कंपनीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नाकारली आहे. ...

उस्मानाबाद : अतिवृष्टीने शेतीपिकांचे प्रचंड नुकसान होऊनही केवळ तांत्रिक कारण समोर करुन विमा कंपनीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नाकारली आहे. यासंदर्भात राज्य शासनाकडूनही चालढकल केली जात असल्याचे सांगत पुढील दिशा ठरविण्यासाठी आ.राणाजगजितसिंह पाटील हे ७ फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांची बैठक घेणार आहेत.

खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ९ लाख ४८ हजार ९९० अर्जाद्वारे ५ लाख १८ हजार ६५ हेक्टर क्षेत्रासाठी त्यांच्या हिश्श्याचा ४१ कोटी ८५ लाख रुपये हप्ता भरला आहे. यात राज्य सरकारने त्यांचा ३२२ कोटी ९५ लाख रुपये तर केंद्राने २७४ कोटी २१ लाख रुपये हप्ता विमा कंपनीकडे भरला आहे. दरम्यान, सप्टेंबर व ऑक्टोबरच्या अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीनंतर जिल्ह्यातील ७९ हजार १२१ तक्रारी विमा कंपनीकडे प्राप्त झाले. त्यातील ६९ हजार २३१ अर्ज पात्र ठरवून ८३ कोटी ५६ लाख रुपये मंजूर करण्यात आले. त्यापैकी जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत ४८ हजार ४४२ अर्जदारांना ४९ कोटी २१ लाख रुपये वाटप केले आहेत. अद्याप २० हजार ७८९ अर्जदारांचे ३४ कोटी ३५ लाख रुपये प्रलंबित आहेत. दरम्यान, राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काही प्रमाणात मदत केली. मात्र, हक्काच्या विम्याची रक्कम मात्र त्यांना मिळत नाही. कंपनीने शेतकऱ्यांना ॲपवर अर्ज करण्याची अट टाकली होती. मात्र, त्यासाठीही काही दिवसांचीच मुदत दिली. याशिवाय, बहुतांश शेतकऱ्यांना अर्ज करताच आले नाहीत. त्यामुळे त्यांना नुकसान भरपाईपासून वंचित ठेवले गेले आहे. ही बाब राणाजगजितसिंह पाटील यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिली. तसेच विमा कंपनीने अपात्र ठरविलेल्या तसेच अर्ज करू न शकलेल्या इतर वंचित शेतकऱ्यांना विमा मिळावा, यासाठी कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे १२ जानेवारी रोजी तांत्रिक दोष निदर्शनास आणून देत शासनाने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली होती. तेव्हा भुसे यांनी याबाबत आश्वासित केले हाेते. मात्र, अनेक दिवस उलटून गेल्यानंतरही ठोस काही कृती झाली नाही. यासंदर्भात आ. पाटील यांनी कृषी सचिव एकनाथ डवले यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते याच आठवड्यात याबाबत बैठक घेणार आहेत. मात्र, शासनाकडून याप्रश्नी चालढकल होत असल्याने पुढील संघर्षाची दिशा ठरविण्यासाठी रविवारी शिंगोली सर्किट हाऊस येथे सकाळी ११ वाजता शेतकऱ्यांसोबत आ.पाटील हे बैठक घेणार आहेत. यास उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले आहे.