शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पीकविम्यासाठी होतेय चालढकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:12 IST

उस्मानाबाद : अतिवृष्टीने शेतीपिकांचे प्रचंड नुकसान होऊनही केवळ तांत्रिक कारण समोर करुन विमा कंपनीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नाकारली आहे. ...

उस्मानाबाद : अतिवृष्टीने शेतीपिकांचे प्रचंड नुकसान होऊनही केवळ तांत्रिक कारण समोर करुन विमा कंपनीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नाकारली आहे. यासंदर्भात राज्य शासनाकडूनही चालढकल केली जात असल्याचे सांगत पुढील दिशा ठरविण्यासाठी आ.राणाजगजितसिंह पाटील हे ७ फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांची बैठक घेणार आहेत.

खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ९ लाख ४८ हजार ९९० अर्जाद्वारे ५ लाख १८ हजार ६५ हेक्टर क्षेत्रासाठी त्यांच्या हिश्श्याचा ४१ कोटी ८५ लाख रुपये हप्ता भरला आहे. यात राज्य सरकारने त्यांचा ३२२ कोटी ९५ लाख रुपये तर केंद्राने २७४ कोटी २१ लाख रुपये हप्ता विमा कंपनीकडे भरला आहे. दरम्यान, सप्टेंबर व ऑक्टोबरच्या अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीनंतर जिल्ह्यातील ७९ हजार १२१ तक्रारी विमा कंपनीकडे प्राप्त झाले. त्यातील ६९ हजार २३१ अर्ज पात्र ठरवून ८३ कोटी ५६ लाख रुपये मंजूर करण्यात आले. त्यापैकी जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत ४८ हजार ४४२ अर्जदारांना ४९ कोटी २१ लाख रुपये वाटप केले आहेत. अद्याप २० हजार ७८९ अर्जदारांचे ३४ कोटी ३५ लाख रुपये प्रलंबित आहेत. दरम्यान, राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काही प्रमाणात मदत केली. मात्र, हक्काच्या विम्याची रक्कम मात्र त्यांना मिळत नाही. कंपनीने शेतकऱ्यांना ॲपवर अर्ज करण्याची अट टाकली होती. मात्र, त्यासाठीही काही दिवसांचीच मुदत दिली. याशिवाय, बहुतांश शेतकऱ्यांना अर्ज करताच आले नाहीत. त्यामुळे त्यांना नुकसान भरपाईपासून वंचित ठेवले गेले आहे. ही बाब राणाजगजितसिंह पाटील यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिली. तसेच विमा कंपनीने अपात्र ठरविलेल्या तसेच अर्ज करू न शकलेल्या इतर वंचित शेतकऱ्यांना विमा मिळावा, यासाठी कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे १२ जानेवारी रोजी तांत्रिक दोष निदर्शनास आणून देत शासनाने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली होती. तेव्हा भुसे यांनी याबाबत आश्वासित केले हाेते. मात्र, अनेक दिवस उलटून गेल्यानंतरही ठोस काही कृती झाली नाही. यासंदर्भात आ. पाटील यांनी कृषी सचिव एकनाथ डवले यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते याच आठवड्यात याबाबत बैठक घेणार आहेत. मात्र, शासनाकडून याप्रश्नी चालढकल होत असल्याने पुढील संघर्षाची दिशा ठरविण्यासाठी रविवारी शिंगोली सर्किट हाऊस येथे सकाळी ११ वाजता शेतकऱ्यांसोबत आ.पाटील हे बैठक घेणार आहेत. यास उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले आहे.