शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

सर्व शाळांचा दहावीच निकला शंभर टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:24 IST

उस्मानाबाद : काेराेनाच्या संकटामुळे सुरुवातीला दहावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या हाेत्या. परंतु, हे संकट निवळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर राज्य शासनानेही ...

उस्मानाबाद : काेराेनाच्या संकटामुळे सुरुवातीला दहावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या हाेत्या. परंतु, हे संकट निवळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर राज्य शासनानेही परीक्षा रद्द केल्या. तसेच विद्यार्थ्यांना सरसकट अकरावीच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे यंदा सर्वच शाळांचा निकाल शंभर टक्के लागणार आहे. अकरावीच्या प्रवेशासाठी सर्वांसाठी एकत्र सीईटी घेण्यात येणार आहे. मात्र ही परीक्षाही ऐच्छिक असणार आहे.

काेराेनाची पहिली लाट ओसरल्यानंतर दहावीच्या परीक्षा घेण्याच्या अनुषंगाने हालचाली सुरू झाल्या हाेत्या. त्यानुसार २२ हजार ६७५ विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेचे शिक्षण विभागाकडून नियाेजनही करण्यात आले हाेते. हे सर्व सुरू असतानाच काेराेनाची दुसरी लाट येऊन धडकली. पहिलीच्या तुलनेत ही लाट अधिक तीव्र आहे. रुग्णवाढीसाेबतच मृत्यूचे प्रमाणही अधिक हाेते. त्यामुळे शासनाने या परीक्षा काही काळ पुढे ढकलल्या हाेत्या. मात्र काेराेनाचा संसर्ग वाढतच गेल्याने थेट परीक्षा रद्द करण्यात आली. सरसकट सर्वच विद्यार्थ्यांना अकरावीच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी सर्वांसाठी एकच सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र, ही परीक्षाही ऐच्छिक असेल. जे विद्यार्थी ही परीक्षा देतील, त्यांना गुणानुक्रमे काॅलेजमध्ये प्रवेश दिला जाईल. यानंतर रिक्त राहणाऱ्या जागेसाठी परीक्षा न दिलेल्या अन्य विद्यार्थ्यांचा विचार केला जाणार आहे. शासनाचा हा निर्णय ताेडगा काढणारा असल्याचे काही पालकांचे म्हणणे असून त्यांनी समाधान व्यक्त केले. तर कहींनी मात्र हा निर्णय हितकारक नसल्याचे नमूद केले.

असे असेल नव्हे सूत्र...

दहावी परीक्षेसाठी प्रविष्ठ विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करताना त्यांच्या नववीच्या विषयनिहाय अंतिम निकालास ५० गुण देण्यात येणार आहेत. एवढेच नाही तर दहावीच्या अंतर्गत लेखी मूल्यमापनास ३० गुण तर दहावीच्या अंतिम ताेंडी तसेच प्रात्यक्षिक परीक्षेस २० गुण दिले जाणार आहेत. या गुणांच्या आधारेच त्यांना दहावी उत्तीर्ण करण्यात येणार आहे.

विद्यार्थी खूश....

काेराेनाच्या संकटामुळे शाळा बंद हाेत्या. त्यामुळे जवळपास सर्वच विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणावर विसंबून राहावे लागले. काही शाळांकडून चांगली तयारी करून घेण्यात आली. परंतु, काही शाळांनी ही बाब फारशी गांभीर्याने घेतली नाही. हे चित्र ग्रामीण भागात ठळकपणे दिसून येते. त्यामुळे असे विद्यार्थी चिंतेत हाेते. परीक्षा कशी द्यायची, असा प्रश्न त्यांच्यासमाेर हाेता. परंतु, आता परीक्षाच रद्द करण्यात आल्याने हे विद्यार्थी खूश झाले आहेत.

शिक्षण तज्ज्ञ काय म्हणतात...

१) दहावीच्या परीक्षा होणार नसल्याने सर्व विद्यार्थी उत्तीर्ण समजायचे आहेत. यामुळे गुणवत्ता स्पष्ट होत नसली तरी महाराष्ट्र शासनाने इयत्ता अकरावी प्रवेशासाठी एक सीईटी परीक्षा ठेवलेली आहे ती परीक्षा योग्य आहे. सदरील सीईटी परीक्षा अभ्यासक्रमाचे सर्व मुद्दे घेऊन होणार आहे. यामुळे अकरावीची प्रवेश प्रक्रिया व्यवस्थित होईल.

सुरेश टेकाळे, जिल्हाध्यक्ष, उस्मानाबाद जिल्हा मुख्याध्यापक संघ.

पुढील प्रवेशाचे काय हाेणार?

दहावीच्या परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना सरसकट अकरावीच्या वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी सीईटीच परीक्षा घेण्यात येणार आहे. ती ऐच्छिक असेल. या परीक्षेतील गुणांप्रमाणे प्रवेश निश्चित केले जातील. यानंतर ज्या जागा रिक्त असतील, त्या ठिकाणी परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे.