शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
3
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
4
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
5
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
6
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
7
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
8
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
9
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
10
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
11
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
12
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
13
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
14
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
15
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
16
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
17
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
18
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
19
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
20
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”

अधिकाऱ्यांनी जबाब फाडल्याने तणाव

By admin | Updated: July 3, 2014 00:20 IST

येरमाळा : कार्डधारकांच्या तक्रारीनंतर रेशन दुकानाबाबत कार्डधारकांकडे चौकशी करून जबाब घेण्याचे काम चालू असतानाच एका अधिकाऱ्याने जबाब फाडून टाकल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.

येरमाळा : कार्डधारकांच्या तक्रारीनंतर रेशन दुकानाबाबत कार्डधारकांकडे चौकशी करून जबाब घेण्याचे काम चालू असतानाच एका अधिकाऱ्याने जबाब फाडून टाकल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. कळंब तालुक्यातील उपळाई येथे बुधवारी हा प्रकार घडला.याबाबत माहिती अशी की, उपळाई येथे दोन रेशनदुकान असून, या दुकानदारांसंदर्भात ग्रामस्थांनी यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. यावर २२ नोव्हेंबर २०१३ रोजी उपविभागीय अधिकारी सचिन बावरकर यांनी चौकशी करून रेशन दुकानदार दोषी आढळल्याने पर्यायी व्यवस्थाही केली होती. परंतु, यानंतर रेशन दुकानदारांनी या सर्व तक्रारी चुकीच्या असल्याचे सांगत आम्ही व्यवस्थित वितरण करतो, असे सांगून फेब्रुवारीपासून पुन्हा दुकान सुरू केले होते. दरम्यान, याबाबत पुन्हा उपळाई येथील २३७ ग्राहकांनी थेट राज्य शासनाच्या सचिवांकडे तक्रार दाखल केली होती. यावरून बुधवारी जिल्हा पुरवठा अधिकारी राम मिराशे, नायब तहसीलदार शिवानंद बिडवे, एन. आर. काटे, मोहिते, वाघमारे, मंडल अधिकारी बी. ई. ओव्हाळ यांचे पथक चौकशी करून जबाब नोंदविण्यासाठी उपळाई गावात दाखल झाले होते. यावेळी पांडुरंग नागरगोजे या कार्डधारकाची चौकशी करून जबाब घेतल्यानंतर त्यांनी जबाब वाचून दाखवा, अन्यथा जबाब बदला, अशी मागणी अधिकाऱ्यांकडे केली. यावरूनच संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांचा घेतलेला जबाब फाडून टाकला. यामुळे ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून हा तणाव शांत केला. दरम्यान, बुधवारी एकूण ८४ जणांचे जबाब घेण्यात आले. यापैकी ६८ जणांनी पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. (वार्ताहर)