शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
2
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
3
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७८ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
4
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
5
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
6
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
7
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
8
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
9
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
10
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
11
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
12
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
13
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
14
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
15
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
16
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
17
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
18
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
19
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
20
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...

उस्मानाबादच्या महिलांचे वाढू लागले टेन्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:23 IST

उस्मानाबाद : बदलती जीवनशैली अन् वाढलेली धावपळ निरोगी व्यक्तींनाही आजाराकडे घेऊन जात आहे. नुकत्याच पूर्ण झालेल्या राष्ट्रीय कुटूंब व ...

उस्मानाबाद : बदलती जीवनशैली अन् वाढलेली धावपळ निरोगी व्यक्तींनाही आजाराकडे घेऊन जात आहे. नुकत्याच पूर्ण झालेल्या राष्ट्रीय कुटूंब व आरोग्य सर्वेक्षणातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. यामध्ये ४४ टक्के महिला तर जवळपास ५० टक्के पुरुष रक्तदाबाने त्रस्त असलेले निष्पन्न झाले आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात रोजगाराच्या पुरेश्या संधी नाहीत. काम मिळाले तरी त्याबदल्या मिळणारा मोबदला पुरेसा नसतो. त्यामुळे साहजिकच मानसिक तणाव वाढत चालला आहे. सातत्याने दुष्काळ किंवा अतिवृष्टी, गारिपटीमुळे मोठ्या संख्येने असलेला शेतकरीवर्गही तणावपूर्ण जीवन जगताना दिसत आहे. याचा परिणाम थेट शरिरावर होत असून, रक्तदाबाचे प्रमाण वाढत चालले आहे. आजघडीला निम्मे पुरुष सौम्य, मध्यम व उच्चरक्तदाबाने त्रस्त आहेत. तसेच महिलांचेही प्रमाण ४४ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.

रक्तदाब वाढण्याचे कारण...

बदललेली जीवनशैली, वाढलेला ताणतणाव, वरचेवर कमी होत चाललेली सहनशक्ती, कामाचा वाढलेला स्ट्रेस या काही प्रमुख बाबी रक्तदाब वाढण्यामागे कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे.

काय घ्यावी काळजी...

रक्तदाबाचा त्रास कमी करण्यासाठी किंवा तो होऊच नये यासाठी प्रत्येकानेच सकस अहारावर भर दिला पाहिजे. याशिवाय, नियमित व्यायाम व योगासने करणे गरजेचे आहे. मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी आपल्या आवडीच्या बाबी, छंदाना काही वेळ जरुन काढला पाहिजे.

कोट...

सध्या तिशीतल्या तरुणांमध्येही रक्तदाबाचे प्रमाण वढीस लागले आहे. या जनरेशनची सहनशक्ती कमी झाली आहे. आहार व जीवनशैली बदलली. व्यसनही यास कारणीभूत ठरत आहे. या बाबी टाळून व्यायाम व आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

-डॉ.मनोज देव्हारे, फिजिशिअन