शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

शिबिरे घेऊन पारधी समाजाला अत्यावश्यक कागदपत्रे पुरवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:37 IST

उस्मानाबाद : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना जिल्ह्यातील अनेक पारधी कुटुंबांकडे नागरिक म्हणून आवश्यक असलेली कागदपत्रे ...

उस्मानाबाद : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना जिल्ह्यातील अनेक पारधी कुटुंबांकडे नागरिक म्हणून आवश्यक असलेली कागदपत्रे अद्याप उपलब्ध नाहीत. ती येत्या तीन महिन्यात शिबिरे घेऊन देण्यात यावीत, असे निर्देश राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी येथे दिले.

येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अपर मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नेवाळे, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, सोलापूर येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील प्रकल्प अधिकारी शुभांगी कांबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात अडीच हजार पारधी कुटुंबे आहेत. त्यापैकी काही कुटुंबांकडे अद्याप आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदार ओळख पत्र, जातीचा दाखला ही अत्यावश्यक कागदपत्रे नाहीत. उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी येत्या तीन महिन्यात शिबिराद्वारे ही कागदपत्रे देण्यात येतील, असे सांगितले आहे. याबाबत सोलापूरच्या जिल्हाधिकारी यांनीही सकारत्मक प्रतिसाद दिला असल्याचे पंडित म्हणाले.

आदिवासी पाड्यावर राहात असलेल्या नागरिकांना अद्याप मूलभूत सुविधा मिळण्यासह आणखी बऱ्याच गोष्टींची सुरुवात झालेली नाही. त्या सुविधा त्यांना मिळाव्यात, यासाठी आपण उस्मानाबाद आणि सोलापूर येथील जिल्हाधिकाऱ्यांना भेटून काही सुविधा आदिवासींना मिळाव्यात, अशी सूचना केली आहे. यानुसार जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी हैदराबाद मुक्ती संग्राम कार्यक्रम हाती घेतला असून, यामध्ये २ हजार ५०० पारधी कुटुंबांना आवश्यक असलेल्या सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रत्यक्ष भेटीत सांगितल्याचेही पंडित म्हणाले.

नेमक्या वस्त्या किती ?

अंगणवाडीच्या आकडेवारीवरून जिल्ह्यात पारधी समाजाच्या ६० वस्त्या असून, आदिवासी प्रकल्प विभागाकडे ८० वस्त्यांची नोंद आहे. सामाजिक कार्यकर्त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जिल्ह्यात पारधी समाजाच्या १४० वस्त्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात नेमक्या किती वस्त्या आणि किती पारधी कुटुंबं आहेत, याची नेमकी माहिती नोंदविण्याचे आदिवासी प्रकल्प कार्यालयातर्फे मिशन आरंभअंतर्गत सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

पारधी समाजाला टार्गेट करू नका

स्वातंत्र्यापूर्वी पारधी बांधवांवर गुन्हेगारीचा शिक्का मारला गेला आहे. त्यामुळे कोठेही आणि कोणीही चोरी केल्याबरोबर सर्वप्रथम पोलीस संशयित चोर म्हणून पारधी बांधवांना सरसकट उचलतात. यापुढे पोलिसांनी चौकशी करून चोरी करणाऱ्यास अटक करावी. पण, गुन्हेगारी समाज म्हणून प्रत्येक वेळी पारधी समाजातील नागरिकांनाच टार्गेट करू नये, अशा सूचनाही दिल्याचे त्यांनी सांगितले.