शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
3
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
7
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
8
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
9
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
10
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
11
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
12
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
13
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
14
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
15
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
16
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
17
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
18
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
19
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
20
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 

शिबिरे घेऊन पारधी समाजाला अत्यावश्यक कागदपत्रे पुरवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:37 IST

उस्मानाबाद : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना जिल्ह्यातील अनेक पारधी कुटुंबांकडे नागरिक म्हणून आवश्यक असलेली कागदपत्रे ...

उस्मानाबाद : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना जिल्ह्यातील अनेक पारधी कुटुंबांकडे नागरिक म्हणून आवश्यक असलेली कागदपत्रे अद्याप उपलब्ध नाहीत. ती येत्या तीन महिन्यात शिबिरे घेऊन देण्यात यावीत, असे निर्देश राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी येथे दिले.

येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अपर मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नेवाळे, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, सोलापूर येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील प्रकल्प अधिकारी शुभांगी कांबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात अडीच हजार पारधी कुटुंबे आहेत. त्यापैकी काही कुटुंबांकडे अद्याप आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदार ओळख पत्र, जातीचा दाखला ही अत्यावश्यक कागदपत्रे नाहीत. उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी येत्या तीन महिन्यात शिबिराद्वारे ही कागदपत्रे देण्यात येतील, असे सांगितले आहे. याबाबत सोलापूरच्या जिल्हाधिकारी यांनीही सकारत्मक प्रतिसाद दिला असल्याचे पंडित म्हणाले.

आदिवासी पाड्यावर राहात असलेल्या नागरिकांना अद्याप मूलभूत सुविधा मिळण्यासह आणखी बऱ्याच गोष्टींची सुरुवात झालेली नाही. त्या सुविधा त्यांना मिळाव्यात, यासाठी आपण उस्मानाबाद आणि सोलापूर येथील जिल्हाधिकाऱ्यांना भेटून काही सुविधा आदिवासींना मिळाव्यात, अशी सूचना केली आहे. यानुसार जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी हैदराबाद मुक्ती संग्राम कार्यक्रम हाती घेतला असून, यामध्ये २ हजार ५०० पारधी कुटुंबांना आवश्यक असलेल्या सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रत्यक्ष भेटीत सांगितल्याचेही पंडित म्हणाले.

नेमक्या वस्त्या किती ?

अंगणवाडीच्या आकडेवारीवरून जिल्ह्यात पारधी समाजाच्या ६० वस्त्या असून, आदिवासी प्रकल्प विभागाकडे ८० वस्त्यांची नोंद आहे. सामाजिक कार्यकर्त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जिल्ह्यात पारधी समाजाच्या १४० वस्त्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात नेमक्या किती वस्त्या आणि किती पारधी कुटुंबं आहेत, याची नेमकी माहिती नोंदविण्याचे आदिवासी प्रकल्प कार्यालयातर्फे मिशन आरंभअंतर्गत सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

पारधी समाजाला टार्गेट करू नका

स्वातंत्र्यापूर्वी पारधी बांधवांवर गुन्हेगारीचा शिक्का मारला गेला आहे. त्यामुळे कोठेही आणि कोणीही चोरी केल्याबरोबर सर्वप्रथम पोलीस संशयित चोर म्हणून पारधी बांधवांना सरसकट उचलतात. यापुढे पोलिसांनी चौकशी करून चोरी करणाऱ्यास अटक करावी. पण, गुन्हेगारी समाज म्हणून प्रत्येक वेळी पारधी समाजातील नागरिकांनाच टार्गेट करू नये, अशा सूचनाही दिल्याचे त्यांनी सांगितले.