शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
3
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
4
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
5
लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
7
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
8
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
9
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
10
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
11
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
12
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
13
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
15
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
16
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
17
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
18
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
19
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
20
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा

व्यवसायात दिलेले पैसे मिळत नसल्याने आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:20 IST

खामसवाडी : व्यवसायासाठी दिलेले पैसे परत देण्यास भागिदारांनी टाळाटाळ केल्यामुळे २७ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना २ जुलै रोजी ...

खामसवाडी : व्यवसायासाठी दिलेले पैसे परत देण्यास भागिदारांनी टाळाटाळ केल्यामुळे २७ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना २ जुलै रोजी कळंब तालुक्यातील खामसवाडी शिवारात घडली. याप्रकरणी शिराढोण पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील संतोष दिनकर शेळके यांनी खामसवाडी ते तडवळा रस्त्यावर खामसवाडी शिवारात धाराशिव ॲग्रो सुग्रास निर्मितीच्या कारखान्याची उभारणी सुरु केली होती. यासाठी त्यांनी त्यांचे भागिदार असलेले वैभव कुलकर्णी व गणेश सावंत याच्याकडे पैसे दिले होते. या पैशांची ते वारंवार मागणी करीत होते. परंतु, भागिदारांकडून ते परत मिळत नसल्यामुळे संतोष शेळके यांनी २ जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास स्वतःच्या शेतातील चिंचेच्या झाडास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी संतोष यांनी स्वत:जवळ चिठ्ठी लिहून ठेवली होती. यात भागिदारांकडून पैसे मिळत नसल्यामुळे होणाऱ्या मानसिक त्रासास कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मोहा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. जाधवर यांनी शवविच्छेदन केले. याप्रकरणी मयताच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिराढोण पोलीस ठाण्यात वरील दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष हा आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. प्रकरणाचा अधिक तपास बीट जमादार दयानंद गादेकर हे करत आहेत