शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

पाणी वळविण्याबाबत प्रस्ताव सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:25 IST

कळंब : लासरा बॅरेज ते रायगव्हाण प्रकल्प या जोडकालव्याचे सर्वेक्षण करताना लगतच्या शिवारातील लघू तलावात पाणी वळतं करण्याची मागणी ...

कळंब : लासरा बॅरेज ते रायगव्हाण प्रकल्प या जोडकालव्याचे सर्वेक्षण करताना लगतच्या शिवारातील लघू तलावात पाणी वळतं करण्याची मागणी खासदार, आमदारांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली होती. यानुसार मंत्री पाटील यांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना यासंदर्भात आवश्यक तो प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मांजरा प्रकल्पात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाणी एक्सेस होते. याचा विचार करत पुढे मांजरा नदीवर एकूण १५ उच्च पातळी बंधारे (बॅरेज) बांधण्यात आले आहेत. यातील पहिला बॅरेज हा कळंब तालुक्यातील लासरा शिवारात आहे.

या बॅरेजसची साठवण क्षमता तीन दलघमी असून, पूर्ण क्षमतेने बंधारा भरल्यानंतर यामधून ११.५३ दलघमी पाणी एक्सेस होते. असे असताना येथून दहा किलोमीटर अंतरावर असलेला तालुक्यातील १२.७०१ दलघमी क्षमतेचा रायगव्हाण प्रकल्प मात्र सातत्याने तहानलेला असतो.

यामुळेच मांजरा प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यानंतर एक्सेस होणारे पाणी जोडकालव्याच्या माध्यमातून रायगव्हाण प्रकल्पात टाकणाऱ्या योजनेचा विषय पुन्हा अजेंड्यावर आला होता. यासाठी बंद पाईपलाईन पर्याय समोर ठेवत सर्वेक्षणाचे काम नव्याने हाती घेण्यात येणार आहे.

या सर्वेक्षणात लासरा ते रायगव्हाण दरम्यान येणाऱ्या गावातील व लगतच्या शिवारातील अस्तित्वातील स्थापित साठवण क्षेत्रात पाणी वळतं करावी, अशी मागणी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. कैलास पाटील यांनी मंगळवारी राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची समक्ष भेट घेऊन केली होती. तत्पूर्वी यासाठी अधिक्षक अभियंता इलियास चिश्ती यांच्यासमवेत उस्मानाबाद येथे बैठक घेतली होती.