शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

उपजिल्हा रुग्णालय, ट्राॅमा केअरला पुन्हा ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:27 IST

कळंब : उस्मानाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबरोबर कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयासाठी जागा हस्तांतरण व ट्राॅमा केअर हॉस्पिटलचा प्रश्न शासन ...

कळंब : उस्मानाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबरोबर कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयासाठी जागा हस्तांतरण व ट्राॅमा केअर हॉस्पिटलचा प्रश्न शासन दरबारी निकाली निघेल, ही कळंबकरांची अपेक्षा फोल ठरली. त्यामुळे या सुविधेसाठी कळंबकरांना आणखी किती प्रतीक्षा करावी लागेल, असा संतप्त सवाल नागरिकांतून विचारला जातो आहे.

कळंब ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा दिल्यानंतर नगर परिषदेने अधिक सुविधांसाठी या रुग्णालयाशेजारील जवळपास दीड एकर जागा रुग्णालयाला दिली. या जागेच्या हस्तांतरणाचा प्रस्ताव मागील तीन वर्षांपासून मंत्रालयात मंजुरीअभावी पडून आहे. त्यामुळे कळंब रुग्णालयाची अवस्था ‘नाव सोनुबाई...’ या म्हणीप्रमाणे झाली आहे. रुग्णालयाला उपजिल्हा हा दर्जा मिळाल्याने याठिकाणी विविध वैद्यकीय सोयी सुविधा मिळतील, अशी कळंब शहर व शेजारील बीड, लातूर जिल्ह्यातील नागरिकांची अपेक्षा होती. त्यामुळे खासगी दवाखान्यातील खर्चिक उपचारांना आळा बसेल, अशीही भावना होती. परंतु, रुग्णालयात आल्यावर फक्त नाव बदलले, व्यवस्था नाही, असा अनुभव रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना येत आहे.

कळंब उपजिल्हा रुग्णालयाच्या जागा हस्तांतरणासाठी तत्कालिन आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी मंत्रालय स्तरावर अनेकदा पत्र देऊन पाठपुरावा केला. विद्यमान आमदार कैलास पाटील यांनीही याविषयी मंत्रालयात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतल्याचे सांगितले होते. राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी हा प्रश्न थेट आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या दरबारात मांडला होता. असा सर्वपक्षीय रेटा असतानाही उपजिल्हा रुग्णालयाची फाईल कोठे चिटकून बसली आहे? असा प्रश्नही आता उपस्थित केला जात आहे.

चौकट -

स्थगिती झटक्यात, हस्तांतरण बासनात!

कळंब नगर परिषदेमधील विकासकामांवर स्थगिती आणण्याची व हटविण्याची मंत्रालयातील फाईल वेगाने फिरली. तसा रेटाही दोन्हीही बाजूने लावण्यात आला होता. दोन्ही पक्षांनी व स्थानिक नेत्यांनी तो प्रश्न प्रतिष्ठेचा केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालय व ट्राॅमा केअरचा प्रश्न तसाच प्रतिष्ठेचा करून सर्वपक्षीय मंडळींनी ही फाईलही त्याच वेगात पळवावी, अशी अपेक्षा सर्वसामान्यांतून व्यक्त केली जात आहे.

चौकट -

विकासाचे राजकारण अपेक्षित

कळंब तालुक्यातील राजकारणाची सुत्रे आता जिल्ह्याबाहेरून हालत आहेत. काँग्रेस - राष्ट्रवादीचे निर्णय उमरगा येथून, तर सेना - भाजपची सुत्रे उस्मानाबाद येथून हलविली जात आहेत. त्यामुळे कळंबचा आवाज शासनदरबारी थेट जाण्याऐवजी उमरगा किंवा उस्मानाबादमार्गे जातो आहे. तो जातो की नाही, याचीही खात्री स्थानिक नेत्यांना नाही. त्यामुळे दुसऱ्यांच्या खांद्यावर बसून राजकारण करताना ते विकासासाठी करा, अशी अपेक्षाही कळंबकरातून व्यक्त होते आहे.