शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कडक निर्बंध लावा, पण मंदिर प्रवेश सुरू ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:33 IST

तुळजापूर : येथील श्री तुळजाभवानी मंदिर बंद ठेवल्याने यावर अवलंबून असणाऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी होत आहे. त्यामुळे मर्यादीत संख्येचे ...

तुळजापूर : येथील श्री तुळजाभवानी मंदिर बंद ठेवल्याने यावर अवलंबून असणाऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी होत आहे. त्यामुळे मर्यादीत संख्येचे कडक निर्बंध लावून भाविकांना मंदिरातील प्रवेश सुरू ठेवावा, अशी मागणी येथील नागरिकांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे, कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन न करता कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यानुसार धार्मिक स्थळे देखील बंद ठेवण्यात आली आहेत. वास्तविक तुळजापूर शहर ७० टक्के श्री तुळजाभवानी मंदिरावर अवलंबून आहे. मंदिर बंद म्हणजे तुळजापूर शहर व तालुका बंद, अशी परिस्थिती आहे. मंदिरावर पुजारी शहरातील छोटे-मोठे व्यापारी, तालुक्यातील शेतकरी व इतर कामगार यांची रोजी रोटी चालते. परंतु, आता मंदिर बंद झाल्यामुळे या सर्वांवर उपासमारीची वेळ आली आहे. पहिल्या ८ महीन्याच्या लाॅकडाऊनमुळे आगोदरच कंबरडे मोडले आहे. पूर्णपणे अर्थचक्र बिघडलेले आहे. आता पुन्हा लॉकडाऊन म्हणजे कोरोनाने नव्हे तर उपासमारीने मरण्याची वेळ आलेली आहे.

त्यामुळे ज्या पध्दतीने ५० टक्के क्षमतेने प्रवासी वाहतूक चालू ठेवली आहे, त्याच प्रमाणे धार्मिक स्थळांच्या ठिकाणी मार्यादीत संख्येने कडक निर्बंध लावून भाविकांना मंदिरात पूर्वीप्रमाणे प्रवेश सुरु ठेवावा. तसेच उस्मानाबाद जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. परंतु, इतर मोठ्या शहरात दररोज हजारोच्या संख्येने पॉझिटीव्ह रुग्ण सापडून देखील तेथील सर्व अस्थापना सुरु आहेत. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात देखील कठोर निर्बंध लावून सर्व लहान-मोठ्या अस्थापना सुरु करण्यात याव्यात, अशी मागणी निवेदनात केली आहे. तहसीलदारांमार्फत हे निवेदन पाठविण्यात आले. यावर इंद्रजीत साळुके, विजय भोसले, प्रसाद पानपुडे, दिनेश बागल, राम चोपदार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.