शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
2
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
3
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
4
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
5
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
6
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
7
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
8
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
9
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
10
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
11
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
12
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
13
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
14
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
15
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
16
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
17
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
18
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
19
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
20
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका

कडक निर्बंध लावा, पण मंदिर प्रवेश सुरू ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:33 IST

तुळजापूर : येथील श्री तुळजाभवानी मंदिर बंद ठेवल्याने यावर अवलंबून असणाऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी होत आहे. त्यामुळे मर्यादीत संख्येचे ...

तुळजापूर : येथील श्री तुळजाभवानी मंदिर बंद ठेवल्याने यावर अवलंबून असणाऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी होत आहे. त्यामुळे मर्यादीत संख्येचे कडक निर्बंध लावून भाविकांना मंदिरातील प्रवेश सुरू ठेवावा, अशी मागणी येथील नागरिकांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे, कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन न करता कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यानुसार धार्मिक स्थळे देखील बंद ठेवण्यात आली आहेत. वास्तविक तुळजापूर शहर ७० टक्के श्री तुळजाभवानी मंदिरावर अवलंबून आहे. मंदिर बंद म्हणजे तुळजापूर शहर व तालुका बंद, अशी परिस्थिती आहे. मंदिरावर पुजारी शहरातील छोटे-मोठे व्यापारी, तालुक्यातील शेतकरी व इतर कामगार यांची रोजी रोटी चालते. परंतु, आता मंदिर बंद झाल्यामुळे या सर्वांवर उपासमारीची वेळ आली आहे. पहिल्या ८ महीन्याच्या लाॅकडाऊनमुळे आगोदरच कंबरडे मोडले आहे. पूर्णपणे अर्थचक्र बिघडलेले आहे. आता पुन्हा लॉकडाऊन म्हणजे कोरोनाने नव्हे तर उपासमारीने मरण्याची वेळ आलेली आहे.

त्यामुळे ज्या पध्दतीने ५० टक्के क्षमतेने प्रवासी वाहतूक चालू ठेवली आहे, त्याच प्रमाणे धार्मिक स्थळांच्या ठिकाणी मार्यादीत संख्येने कडक निर्बंध लावून भाविकांना मंदिरात पूर्वीप्रमाणे प्रवेश सुरु ठेवावा. तसेच उस्मानाबाद जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. परंतु, इतर मोठ्या शहरात दररोज हजारोच्या संख्येने पॉझिटीव्ह रुग्ण सापडून देखील तेथील सर्व अस्थापना सुरु आहेत. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात देखील कठोर निर्बंध लावून सर्व लहान-मोठ्या अस्थापना सुरु करण्यात याव्यात, अशी मागणी निवेदनात केली आहे. तहसीलदारांमार्फत हे निवेदन पाठविण्यात आले. यावर इंद्रजीत साळुके, विजय भोसले, प्रसाद पानपुडे, दिनेश बागल, राम चोपदार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.