शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
4
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
5
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
6
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
7
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
8
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
9
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
10
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
11
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
12
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
13
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
14
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
15
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
16
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
17
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
18
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
19
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
20
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!

उद्यापासून चारा छावण्या बंद !

By admin | Updated: June 14, 2016 21:22 IST

२०१४ पर्यंत झालेल्या पावसाळ्यानंतर टंचाईचे नियोजन करण्यासाठी ४ महिन्यांचा अवधी मिळत असे; परंतु २०१५ मध्ये पावसाळा संपताच आॅक्टोबर महिन्यापासून टंचाई नियोजनासाठी खर्च करण्याची वेळ प्रशासनावर आली.

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. १४ : मराठवाड्यात सतत चार वर्षांपासून पडणाऱ्या दुष्काळामुळे शासनाच्या तिजोरीवर त्याचा मोठा भार पडला आहे. पिण्याचे पाणी, चारा व इतर उपाययोजनांसाठी विभागात आॅक्टोबर २०१५ ते एप्रिल २०१६ या काळात ६०० कोटींचा तर मे व जून २०१६ या दोन महिन्यांतील संभाव्य निधी १०० कोटी असे ७०० कोटी रुपये खर्च झाल्याचा अंदाज आहे. चार वर्षांपासून दुष्काळ पडत असला तरी २०१४ पर्यंत झालेल्या पावसाळ्यानंतर टंचाईचे नियोजन करण्यासाठी ४ महिन्यांचा अवधी मिळत असे; परंतु २०१५ मध्ये पावसाळा संपताच आॅक्टोबर महिन्यापासून टंचाई नियोजनासाठी खर्च करण्याची वेळ प्रशासनावर आली.

चाराटंचाई आणि पिण्याचे पाणी या सुविधा देण्यासाठी शासनाला आजवर ६०० कोटी रुपयांचा निधी मराठवाड्यात द्यावा लागला. अजून दोन महिन्यांच्या नियोजनाचा निधी येणे बाकी आहे. यंदाचा मान्सून सुरू होऊन आठवडा झाला आहे. परंतु पिण्याच्या पाण्याचे टँकर कमी होत नाही. विभागातील बीड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांत मान्सूनने हजेरी लावली आहे. मात्र उर्वरित जिल्हे अजून पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

२५० कोटींचा चारा बीड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यांतील चारा छावण्या १५ जून्पासून बंद करण्यात येणार आहे. काही तुरळक छावण्या माणुसकीच्या नात्यातून सुरू राहणार आहेत. असे सूत्रांनी सांगितले. चारा छावण्यांवर साडेसात महिन्यांत २५० कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. बीड जिल्ह्यात २६५ छावण्यांमध्ये २ लाख ६२ हजार, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील ८५ चारा छावण्यांमध्ये ७८ हजार लहान मोठ्या जनावरांच्या चारा-पाण्याची सोय करण्यात आली होती. पूर्वमोसमी पावसानंतर ८ जून रोजी बीड जिल्ह्यातील २२२ तर उस्मानाबाद जिल्ह्यात सुरू असलेल्या ५६ छावण्या बंद करण्यात आल्या आहेत. उर्वरित छावण्या १५ जूनपासून बंद करण्यात येणार आहेत.

पाण्यावर पाण्यासारखा खर्चमराठवाड्यातील ४ हजार गावांत ४ टँकरने पाणी आजही पुरविले जात आहे. टँकर व इतर योजनांसाठी एप्रिलपर्यंत २२७ कोटींचा खर्च झाला. १२७ कोटींचा निधी अजून येणे बाकी आहेत. ३४७ कोटींच्या खर्चाचे नियोजन विभागीय प्रशासनाने केले होते. मे व जून या दोन महिन्यांसाठी किमान १०० कोटींची संभाव्य मागणी असेल. चारा छावण्या २५० कोटी, टँकरवर ३४७ कोटींचा असे ५९७ कोटी आजवर खर्च झाले आहेत.