शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

राज्याने झटकले हात, मग रेल्वे येणार कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:28 IST

६० वर्षांहून अधिक जुनी मागणी असलेल्या रेल्वेमार्ग प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आता कुठे हालचाली सुरु झाल्या होत्या. २०१९ मध्ये या मार्गाला ...

६० वर्षांहून अधिक जुनी मागणी असलेल्या रेल्वेमार्ग प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आता कुठे हालचाली सुरु झाल्या होत्या. २०१९ मध्ये या मार्गाला मंजुरी मिळाली. तत्पूर्वी महाराष्ट्रात असलेल्या तत्कालीन राज्य सरकारने हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एकूण खर्चाच्या ५० टक्के निधीचा वाटा उचलण्याची हमी दिली होती. तत्कालीन प्रधान सचिव आशिष कुमार सिंह यांनी रेल्वे बोर्डाच्या अधिकार्यांना राज्य सरकार निम्मा खर्च उचलण्यास तयार असल्याची माहिती पत्रान्वये कळविली होती. ही संमती मिळताच रेल्वेच्या बांधकाम विभागाचे संचालक धनंजय सिंह यांनी ८ जानेवारी रोजी मुंबई मध्य रेल्वेच्या सरव्यवस्थापकांना या मार्गाला मंजुरी मिळाल्याचे कळविले. दरम्यान, सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद हा रेल्वेमार्ग ८० किलोमीटर अंतराचा असून, त्यासाठी ९०४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. केंद्र सरकारने यावेळच्या अर्थसंकल्पात त्यासाठी पुरेशी नसली तरी २० कोटींची तरतूद केली आहे. मात्र,राज्याने आता हात झटकल्याने हा प्रकल्प अधांतरी लटकण्याची चिन्हे आहेत.

म्हणे, निधीचा प्रश्नच उद्भवत नाही...

नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी आ.राणाजगजितसिंह पाटील व आ. सुभाष देशमुख यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हा प्रकल्प पूर्णत: केंद्राच्या आर्थिक सहभागाने केला जाणार असल्याने राज्याने निधी देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे ठासून सांगितले. मग राज्याच्याच प्रधान सचिवांनी २०१९ मध्ये वाटा स्विकारण्याची तयारी असल्याचे दिलेले ते पत्र खोटे होते की परब यांचे उत्तर, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, परब खोटे बोलत असल्याचा दावा करीत आ.पाटील व आ.देशमुख हे त्यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार असल्याचे सांगत आहेत.

रेल्वेच्याही उंटावरुन शेळ्या...

सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या प्रकल्पावरील संनियत्रण आधी पुण्यातील रेल्वेच्या अधिका-यांकडे होते. मात्र, वर्षभरापूर्वी अचानक हे संनियंत्रण भुसावळ येथील अधिका-यांकडे सोपविण्यात आले आहे. यानंतर लागलीच खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी बोलाविलेल्या एका बैठकीस भुसावळहून धापा टाकत आलेले अधिकारी या प्रकल्पाच्या कामाला कितपत गती देऊ शकतील, याविषयी शंकाच आहे.