शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक गावात किमान एक बसफेरी सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कळंब : जिल्ह्यातील प्रत्येक गावात किमान सकाळी एक व सायंकाळी एक बसफेरी सुरू करावी. तसेच चालक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कळंब : जिल्ह्यातील प्रत्येक गावात किमान सकाळी एक व सायंकाळी एक बसफेरी सुरू करावी. तसेच चालक व वाहकांवर कामाचा अतिरिक्त भार न देता सेवा सुरळीत करावी, अशी मागणी बहुजन क्रांती मोर्चाने एस. टी. महामंडळाच्या विभागीय नियंत्रकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

जिल्ह्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र, बसफेऱ्या पूर्ण क्षमतेने सुरू न झाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी शाळेत जाऊ शकत नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील शालेय फेऱ्या त्वरित सुरू करण्याची मागणी या निवेदनातून केली आहे. ग्रामीण भागातून मागणी असतानाही अनेक फेऱ्या सुरू करण्यात एस. टी.च्या विभागीय कार्यालयाला यश आलेले नाही. अनेकदा अपुरे कर्मचारी असल्याने फेऱ्या रद्द करण्याची वेळ एस. टी. महामंडळावर येते.

मुंबईतील लोकल सेवा अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. त्यामुळे बेस्ट सेवेवरील ताण कमी करण्यासाठी जिल्ह्यातून २०० ते २५० कर्मचाऱ्यांची टीम प्रत्येक आठवड्याला मुंबईत पाठवली जाते. पर्यायाने जिल्ह्यातील व तालुक्यातील एस. टी. सेवा यामुळे विस्कळीत होत आहे. त्यामुळे मुंबईला कर्मचारी पाठविण्याचे थांबवून ग्रामीण भागातील वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणीही या निवेदनातून केली आहे. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष राहुल हौसलमल, सिद्धार्थ वाघमारे, भैरवनाथ लकडे, आतिष वाघमारे, प्रेम भांडे, कुमार वाघमारे, ऋषी आदमाने, बबलू शिंदे, बाबा टोपे, अजित ओहाळ, निखील जाधव, अमोल सोनवणे आदींच्या सह्या आहेत.