शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक गावात किमान एक बसफेरी सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कळंब : जिल्ह्यातील प्रत्येक गावात किमान सकाळी एक व सायंकाळी एक बसफेरी सुरू करावी. तसेच चालक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कळंब : जिल्ह्यातील प्रत्येक गावात किमान सकाळी एक व सायंकाळी एक बसफेरी सुरू करावी. तसेच चालक व वाहकांवर कामाचा अतिरिक्त भार न देता सेवा सुरळीत करावी, अशी मागणी बहुजन क्रांती मोर्चाने एस. टी. महामंडळाच्या विभागीय नियंत्रकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

जिल्ह्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र, बसफेऱ्या पूर्ण क्षमतेने सुरू न झाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी शाळेत जाऊ शकत नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील शालेय फेऱ्या त्वरित सुरू करण्याची मागणी या निवेदनातून केली आहे. ग्रामीण भागातून मागणी असतानाही अनेक फेऱ्या सुरू करण्यात एस. टी.च्या विभागीय कार्यालयाला यश आलेले नाही. अनेकदा अपुरे कर्मचारी असल्याने फेऱ्या रद्द करण्याची वेळ एस. टी. महामंडळावर येते.

मुंबईतील लोकल सेवा अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. त्यामुळे बेस्ट सेवेवरील ताण कमी करण्यासाठी जिल्ह्यातून २०० ते २५० कर्मचाऱ्यांची टीम प्रत्येक आठवड्याला मुंबईत पाठवली जाते. पर्यायाने जिल्ह्यातील व तालुक्यातील एस. टी. सेवा यामुळे विस्कळीत होत आहे. त्यामुळे मुंबईला कर्मचारी पाठविण्याचे थांबवून ग्रामीण भागातील वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणीही या निवेदनातून केली आहे. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष राहुल हौसलमल, सिद्धार्थ वाघमारे, भैरवनाथ लकडे, आतिष वाघमारे, प्रेम भांडे, कुमार वाघमारे, ऋषी आदमाने, बबलू शिंदे, बाबा टोपे, अजित ओहाळ, निखील जाधव, अमोल सोनवणे आदींच्या सह्या आहेत.