शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
2
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
3
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
4
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
5
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
6
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
7
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
8
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
9
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
10
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
11
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
12
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
13
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
14
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
15
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
16
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
17
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
18
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
19
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा

प्रत्येक गावात किमान एक बसफेरी सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कळंब : जिल्ह्यातील प्रत्येक गावात किमान सकाळी एक व सायंकाळी एक बसफेरी सुरू करावी. तसेच चालक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कळंब : जिल्ह्यातील प्रत्येक गावात किमान सकाळी एक व सायंकाळी एक बसफेरी सुरू करावी. तसेच चालक व वाहकांवर कामाचा अतिरिक्त भार न देता सेवा सुरळीत करावी, अशी मागणी बहुजन क्रांती मोर्चाने एस. टी. महामंडळाच्या विभागीय नियंत्रकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

जिल्ह्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र, बसफेऱ्या पूर्ण क्षमतेने सुरू न झाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी शाळेत जाऊ शकत नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील शालेय फेऱ्या त्वरित सुरू करण्याची मागणी या निवेदनातून केली आहे. ग्रामीण भागातून मागणी असतानाही अनेक फेऱ्या सुरू करण्यात एस. टी.च्या विभागीय कार्यालयाला यश आलेले नाही. अनेकदा अपुरे कर्मचारी असल्याने फेऱ्या रद्द करण्याची वेळ एस. टी. महामंडळावर येते.

मुंबईतील लोकल सेवा अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. त्यामुळे बेस्ट सेवेवरील ताण कमी करण्यासाठी जिल्ह्यातून २०० ते २५० कर्मचाऱ्यांची टीम प्रत्येक आठवड्याला मुंबईत पाठवली जाते. पर्यायाने जिल्ह्यातील व तालुक्यातील एस. टी. सेवा यामुळे विस्कळीत होत आहे. त्यामुळे मुंबईला कर्मचारी पाठविण्याचे थांबवून ग्रामीण भागातील वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणीही या निवेदनातून केली आहे. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष राहुल हौसलमल, सिद्धार्थ वाघमारे, भैरवनाथ लकडे, आतिष वाघमारे, प्रेम भांडे, कुमार वाघमारे, ऋषी आदमाने, बबलू शिंदे, बाबा टोपे, अजित ओहाळ, निखील जाधव, अमोल सोनवणे आदींच्या सह्या आहेत.