शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

एसटीचा प्रवास सुरक्षित, मग ट्रॅव्हल्सलाच पसंती का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:19 IST

उस्मानाबाद : एस. टी.चा प्रवास सुरक्षित प्रवास असा सर्वसाधारण समज आहे. असे असताना प्रवाशांकडून ट्रॅव्हल्सलाच अधिक पसंती दिली जात ...

उस्मानाबाद : एस. टी.चा प्रवास सुरक्षित प्रवास असा सर्वसाधारण समज आहे. असे असताना प्रवाशांकडून ट्रॅव्हल्सलाच अधिक पसंती दिली जात आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी बहुतांश नागरिकांकडूनच एस.टी. बसऐवजी ट्रॅव्हल्सचीच निवड करण्यात येत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.

गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून आलेल्या कोरोना संकाटामुळे एसटी महामंडळाला आर्थिक फटका बसला आहे. पहिल्या व दुसऱ्या लाटेत लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे एस.टी.चे उत्पन्न जवळजवळ ठप्प झाले होते. मात्र, कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने ७ जूनपासून जिल्ह्यात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. एसटी वाहतूक देखील पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मात्र, लांबपल्ल्याच्या प्रवासासाठी नागरिक एस.टी. बसच्या तुलनेत ट्रॅव्हल्सलाच जास्त पसंती देत आहेत. एस.टी.पेक्षा टॅव्हल्सचा प्रवास आरामदायक असल्याचा समज निर्माण होत आहे.

एसटीला स्पीड लॉक, ट्रॅव्हल्स सुसाट

अपघात टाळण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसला स्पीड लॉक करण्यात आला आहे. यामुळे इतर खासगी वाहनांच्या तुलनेत एसटी बसचे अपघात नसल्यासारखे आहेत. एसटीचा प्रवास खरोखरच सुरक्षित प्रवास आहे.

खासगी वाहनांच्या अपघातांत वाढ

बहुतांश अपघात खराब रस्त्यामुळे होत असले तरी याला वाहनधारकही तेवढेच जबाबदार आहेत. कारण रस्ता चांगला असल्यास वाहने सुसाट वेगाने पळविल्या जातात. यामुळे वाहनांवर नियंत्रण मिळविणे कठीण होत असल्याने अनेकवेळा अपघाताच्या घटना घडत असल्याचे पाहावयास मिळत आहे. यातून अनेकांना जीव गमवाला लागतो. मृताच्या कुटुंबीयाला कुठलीही नुकसानभरपाई दिली जात नाही.

अनेक एस.टी. बसेसची अवस्था अत्यंत बिकट झाली असली तरी एसटीतून प्रवास हा सुरक्षित प्रवास आहे. प्रवास आरामदायक व्हावा याकरिता ट्रॅव्हल्समधून प्रवासाला पसंती देतात. मात्र, आरामापेक्षा सुरक्षित प्रवास महत्त्वाचा आहे. यामुळे एसटीतून प्रवासाला अधिक पसंती देतो. दररोज एसटीने अपडाऊन करतो.

श्रीकांत धावारे, प्रवासी.

एसटीचे चालक प्रशिक्षित असतात. याउलट ट्रॅव्हल्सचे चालक हे सातत्याने बदलत असून, त्यांना कुठलेही प्रशिक्षण नसते. त्यामुळे ट्रॅव्हल्समधून प्रवास करणे टाळत असतो. एसटीचा प्रवास सुरक्षित आहे. अपवादात्मक परिस्थितीतच ट्रॅव्हल्समधून प्रवास करतो. आरामापेक्षा जीव महत्त्वाचा आहे. एसटी अपघात झाल्यास नुकसानभरपाई दिली जाते.

किशोर गायकवाड, प्रवासी.

कोट...

खासगी वाहतुकीच्या तुलनेत बसचा प्रवास सुरक्षित आहे. अपघाताचे प्रमाण नगण्य आहे. शिवाय अपघात मृत्यू पडलेल्या व जखमींना नुकसानभरपाई दिली जात असते. आरामदायी प्रवासासाठी सिटर कम स्लिपर, शिवशाही बसेसही प्रवाशांच्या सेवेत आहेत. प्रवाशांना सुविधा देण्यावर महामंडळाचा अधिक भर असतो.

पांडुरंग पाटील, आगारप्रमुख, उस्मानाबाद.