शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

एसटीचा प्रवास सुरक्षित, मग ट्रॅव्हल्सलाच पसंती का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:19 IST

उस्मानाबाद : एस. टी.चा प्रवास सुरक्षित प्रवास असा सर्वसाधारण समज आहे. असे असताना प्रवाशांकडून ट्रॅव्हल्सलाच अधिक पसंती दिली जात ...

उस्मानाबाद : एस. टी.चा प्रवास सुरक्षित प्रवास असा सर्वसाधारण समज आहे. असे असताना प्रवाशांकडून ट्रॅव्हल्सलाच अधिक पसंती दिली जात आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी बहुतांश नागरिकांकडूनच एस.टी. बसऐवजी ट्रॅव्हल्सचीच निवड करण्यात येत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.

गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून आलेल्या कोरोना संकाटामुळे एसटी महामंडळाला आर्थिक फटका बसला आहे. पहिल्या व दुसऱ्या लाटेत लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे एस.टी.चे उत्पन्न जवळजवळ ठप्प झाले होते. मात्र, कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने ७ जूनपासून जिल्ह्यात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. एसटी वाहतूक देखील पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मात्र, लांबपल्ल्याच्या प्रवासासाठी नागरिक एस.टी. बसच्या तुलनेत ट्रॅव्हल्सलाच जास्त पसंती देत आहेत. एस.टी.पेक्षा टॅव्हल्सचा प्रवास आरामदायक असल्याचा समज निर्माण होत आहे.

एसटीला स्पीड लॉक, ट्रॅव्हल्स सुसाट

अपघात टाळण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसला स्पीड लॉक करण्यात आला आहे. यामुळे इतर खासगी वाहनांच्या तुलनेत एसटी बसचे अपघात नसल्यासारखे आहेत. एसटीचा प्रवास खरोखरच सुरक्षित प्रवास आहे.

खासगी वाहनांच्या अपघातांत वाढ

बहुतांश अपघात खराब रस्त्यामुळे होत असले तरी याला वाहनधारकही तेवढेच जबाबदार आहेत. कारण रस्ता चांगला असल्यास वाहने सुसाट वेगाने पळविल्या जातात. यामुळे वाहनांवर नियंत्रण मिळविणे कठीण होत असल्याने अनेकवेळा अपघाताच्या घटना घडत असल्याचे पाहावयास मिळत आहे. यातून अनेकांना जीव गमवाला लागतो. मृताच्या कुटुंबीयाला कुठलीही नुकसानभरपाई दिली जात नाही.

अनेक एस.टी. बसेसची अवस्था अत्यंत बिकट झाली असली तरी एसटीतून प्रवास हा सुरक्षित प्रवास आहे. प्रवास आरामदायक व्हावा याकरिता ट्रॅव्हल्समधून प्रवासाला पसंती देतात. मात्र, आरामापेक्षा सुरक्षित प्रवास महत्त्वाचा आहे. यामुळे एसटीतून प्रवासाला अधिक पसंती देतो. दररोज एसटीने अपडाऊन करतो.

श्रीकांत धावारे, प्रवासी.

एसटीचे चालक प्रशिक्षित असतात. याउलट ट्रॅव्हल्सचे चालक हे सातत्याने बदलत असून, त्यांना कुठलेही प्रशिक्षण नसते. त्यामुळे ट्रॅव्हल्समधून प्रवास करणे टाळत असतो. एसटीचा प्रवास सुरक्षित आहे. अपवादात्मक परिस्थितीतच ट्रॅव्हल्समधून प्रवास करतो. आरामापेक्षा जीव महत्त्वाचा आहे. एसटी अपघात झाल्यास नुकसानभरपाई दिली जाते.

किशोर गायकवाड, प्रवासी.

कोट...

खासगी वाहतुकीच्या तुलनेत बसचा प्रवास सुरक्षित आहे. अपघाताचे प्रमाण नगण्य आहे. शिवाय अपघात मृत्यू पडलेल्या व जखमींना नुकसानभरपाई दिली जात असते. आरामदायी प्रवासासाठी सिटर कम स्लिपर, शिवशाही बसेसही प्रवाशांच्या सेवेत आहेत. प्रवाशांना सुविधा देण्यावर महामंडळाचा अधिक भर असतो.

पांडुरंग पाटील, आगारप्रमुख, उस्मानाबाद.