शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

एसटी येऊ लागली रुळावर, ३३ हजार प्रवासी करताहेत बसने प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:22 IST

एसटी येऊ लागली रुळावर, ३३ हजार प्रवासी करताहेत बसने प्रवास उस्मानाबाद : कोरोनाचे रुग्ण कमी होऊ लागल्याने राज्य परिवहन ...

एसटी येऊ लागली रुळावर, ३३ हजार प्रवासी करताहेत बसने प्रवास

उस्मानाबाद : कोरोनाचे रुग्ण कमी होऊ लागल्याने राज्य परिवहन महामंडळाने ७ जूनपासून बससेवा सुरू केली आहे. मंगळवारपासून ११२ वरून २४० बसेस सुरू करण्यात आल्या असून, प्रवाशांचा प्रतिसाद वाढू लागला आहे. सध्या प्रतिदिन ३३ हजार प्रवासी बसचा प्रवास करीत आहेत. यातून एसटीला दिवसाकाठी १८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.

कोरोनाबाधितांची संख्या कमी होऊ लागल्याने ७ जूनपासून राज्य परिवहन महामंडळाने बससेवा सुरू केली आहे. प्रथम ४८ बसेस सुरू करण्यात आल्या होत्या. प्रवाशांची संख्या वाढू लागल्याने ११२ बसेस सुरू करण्यात आल्या होत्या. मंगळवारपासून प्रवाशांची गर्दी पाहता एसटी महामंडळाने ६ आगारांतून २४० बसगाड्या सोडल्या आहेत. जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यांतील विविध मार्गांवर या बस ७० हजार किलोमीटर प्रवास करीत आहेत. प्रतिदिन ३३ हजार प्रवासी बसने प्रवास करीत असून, एसटीला यातून दिवसाकाठी १८ लाख रुपये उत्पन्न मिळत आहे. सध्या जिल्ह्यात चार वाजेपर्यंत बाजारपेठ सुरू राहत आहेत. त्यामुळे नागरिक चार वाजेपर्यंतच घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे चारपर्यंत बसला प्रवाशांचा प्रतिसादही चांगला मिळत आहे. चारनंतर प्रवाशांची संख्या कमी असते. जिल्ह्याचा ग्रीन झोनमध्ये समावेश झाल्यानंतर मात्र सहा आगारांतील सर्वच बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.

प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी...

कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणात कमी झाला असला तरी धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे महामंडळाकडून बस सॅनिटाईझ केल्या जात आहेत. तसेच प्रवाशांना प्रवास करतेवेळी मास्क बंधनकारक करण्यात आले आहे.

पाच पथकांकडून होतेय तपासणी

एसटी महामंडळाच्या उस्मानाबाद विभागाचे एकूण ५ मार्ग तपासणी पथके कार्यरत आहेत. या पथकामार्फत सध्या बसेसचे निर्जंतुकीकरण होत आहे की नाही याची तपासणी केली जात आहे. एक पथक दररोज सरासरी ४० बसेस तपासणी करीत आहे. त्यामुळे आगाराकडून बसच्या फेरीनंतर निर्जंतुकीकरण केले जात आहे.

रातराणी गाड्याही सुरू

एसटी बसला प्रवाशांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहता एसटीने रातराणी बसेसही सुरू केल्या आहेत. मुंबई, पुणे, बोरीवली, भिवंडी, कोल्हापूर या मार्गावरील बसेस धावत आहेत.

राज्याबाहेर जाणाऱ्या बसेस बंद

राज्यातून इतर राज्यांत जाण्यास अद्याप परवानगी नाही. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातून हैदराबाद, हुमनाबाद, सुरत, पणजी, बंगलोरला जाणाऱ्या बसेस बंद आहेत. त्यामुळे प्रवाशांना बाहेर राज्यात खासगी वाहनांनीच प्रवास करावा लागत आहे.

३० टक्के प्रवासी करताहेत प्रवास

लॉकडाऊनपूर्वी उस्मानाबाद विभागातील ४५० बसच्या सुमारे दोन हजारांच्या जवळपास फेऱ्या होत. प्रतिदिन बसचा १ लाख ६५ किलोमीटर प्रवास होत असे. जवळपास सव्वा लाख प्रवासी प्रवास करीत. यातून एसटीला प्रतिदिन ५० लाख रुपयांचे उत्पन्न होत होते. सध्या प्रतिदिन २४० बसच्या १ हजार फेऱ्या होत आहेत. ७० हजार किलोमीटरचा प्रवास होत असून, ३३ हजार प्रवासी प्रवास करीत आहेत. एसटीला १८ लाख रुपये उत्पन्न मिळत आहे.