शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

तेरणासाठी पडद्याआडून हालचालींना गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:39 IST

उस्मानाबाद : मराठवाड्यातील पहिला साखर कारखाना, अशी ख्याती असलेला तेरणा कारखाना आज ढोकीच्या माळावर भग्नावस्थेत उभा आहे. थकीत कर्जापोटी ...

उस्मानाबाद : मराठवाड्यातील पहिला साखर कारखाना, अशी ख्याती असलेला तेरणा कारखाना आज ढोकीच्या माळावर भग्नावस्थेत उभा आहे. थकीत कर्जापोटी जिल्हा बँकेने त्यावर ताबा मिळविल्यानंतर आता तो दीर्घ मुदतीने भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तेरणा हा केवळ कारखाना नसून, तो राजकीय केंद्रबिंदू असल्याने आपल्याच ताब्यात येण्यासाठी सर्वच प्रमुख पक्षांतील पुढाऱ्यांनी पडद्याआडून कंबर कसली आहे.

तेरणा सहकारी साखर कारखाना व्यावसायिकदृष्ट्या अन् राजकीयदृष्ट्याही चांगभलं करणारा आहे. कारखान्याचे ३५ हजारांवर सभासद आहेत. त्यामुळे इतक्या कुटुंबांशी व कारखान्याभोवती छोटे-मोठे व्यवसाय करून उपजीविका भागविणाऱ्या शेकडो कुटुंबीयांशी थेट नाळ जोडणारा आहे. त्यामुळे ज्याच्या हाती तेरणा, त्याची राजकीय खुंटी मजबूत, असे समीकरण आहे. परिणामी, तो सहजासहजी दुसऱ्यांच्या पदरी पडणार नाही, याची काळजी पुढाऱ्यांना आहे. त्यामुळेच काहींनी आपल्या नजिकच्या संस्थांच्या माध्यमातून कारखाना भाडेतत्त्वावर घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. यात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीसोबतच आता काँग्रेसच्या पुढाऱ्यांनीही इंटरेस्ट दाखविल्याची चर्चा आहे. दरम्यान, कारखाना कोणाच्याही ताब्यात का जाईना, पण तो वेळेत सुरू होऊन दिलासा मिळावा, इतकीच अपेक्षा शेतकऱ्यांची आहे. तर जिल्हा बँकेला आपले थकीत कर्ज पदरी पडावे, ही अपेक्षा आहे.

मुदतवाढीला कारखान्याचीच किनार...

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाला आता आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे प्रशासकाचा मार्ग रोखला गेला. तेरणा कारखान्याची निविदा निघाली आहे. १५ सप्टेंबरपर्यंत त्यासाठी निविदा भरता येणार आहे. त्यापुढील काही दिवसांतच त्या ओपन होतील व कारखान्याचा मार्ग मोकळा होईल. बँकेला मुदतवाढ मिळाली नसती तर येथे प्रशासक बसला असता. ही प्रक्रिया रद्द करण्याचे किंवा एखाद्याची निविदा फेटाळून लावण्याचे अधिकारही त्याच्याकडे गेले असते. त्याच्याकडून पार्सिलिटी झाली तर..? ही भीतीही काही संचालकांना होती.

पडसाद स्थानिक स्वराज्य संस्थेवरही...

जिल्हा बँकेची निवडणूक पुढे ढकलून विद्यमान मंडळाने तेरणेच्या निविदा प्रक्रियेचे अधिकार आपल्याकडेच राखण्यात यश मिळविले आहे; मात्र तो एखाद्या संस्थेकडे भाड्याने देत असताना राजकीय संघर्ष उफाळण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्वच पक्षांच्या पुढाऱ्यांनी स्वतंत्र प्रयत्न सुरू ठेवल्याने अगदी महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली एकत्र आलेल्या तीन पक्षांतही कारखान्यावरून खडाजंगी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या पालिका निवडणुकांचा बिगुल वाजलेला आहे. त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समित्या आहेत. या निवडणुकांवर कारखान्याचे पडसाद उमटतील का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.