शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
3
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
4
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
7
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
8
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
9
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
10
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
11
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
12
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
13
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
14
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
15
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
16
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
17
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
18
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
19
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
20
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही

धडाकेबाज राज्यमंत्री बच्चू कडूंना कोणी दिला आहे गोड बोलण्याचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 15:03 IST

काम करणाऱ्यांना दोन दिवससुद्धा पुरेसे असतात़ मात्र, जे अधिकारी-कर्मचारी कामच करीत नाहीत, त्यांना याचा  काही फरक पडत नसतो़ 

ठळक मुद्देदोन अधिक दोन बरोबर सहा म्हटले तरी ‘हो सरकार’ म्हणावेच लागतेकेलेल्या विधानानंतर वरून एक फोन आला आणि याविषयी चांगले सांगण्याचा निरोप मिळाला

- सूरज पाचपिंडे 

उस्मानाबाद : धडाकेबाज मंत्री म्हणून ख्याती असलेल्या बच्चू कडू यांना सरकारमध्ये कसे बोलावे, याविषयी आता ‘बाळकडू’ पाजले जात आहेत़ पाच दिवसांच्या आठवड्यावरुन त्यांनी केलेल्या विधानानंतर वरून एक फोन आला आणि याविषयी चांगले सांगण्याचा निरोप मिळाल्याचे खुद्द कडू यांनीच अनौपचारिक चर्चेत सांगितले़ यानंतर मात्र, काम करणाऱ्यांना दोन दिवस सुद्धा पुरेसे असतात, असे सांगून ‘त्या’ फोनचा आदर राखला

राज्यमंत्री बच्चू कडू हे सोमवारी उस्मानाबादेत आले होते़ दुपारी त्यांनी जिल्हा न्यायालयात विधिज्ञ मंडळाची भेट घेऊन अनौपचारिक गप्पा मारल्या़ पाच दिवसांच्या आठवड्यास विरोध दर्शविणारे विधान कडू यांनी यापूर्वी केले होते़ त्याविषयी बोलताना ते म्हणाले, आम्ही पाच अन् सातचा हिशोब सांगत होतो़ वरून फोन आला़ हा हिशोब (निर्णय) चांगला, असेच सांगा़ त्यामुळे दोन अधिक दोन चार ऐवजी सहा म्हटले तरी, हो सरकार म्हणावे लागते़ कारण, सरकारचा हा आरसा टिकवायचा आहे़ या विधानांतून त्यांनी काहिशी हतबलता  व्यक्त केली़ मात्र, त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना कडू यांनी ‘त्या’ फोनवरील निरोपाशी सुसंगत अशी भूमिका मांडून त्या निर्णयाचे एकप्रकारे समर्थनच केले़ ते म्हणाले, काम करणाऱ्यांना दोन दिवससुद्धा पुरेसे असतात़ मात्र, जे अधिकारी-कर्मचारी कामच करीत नाहीत, त्यांना याचा  काही फरक पडत नसतो़ 

नोटीस म्हणजे गुन्हा दाखल होईलच असे नव्हेइंदोरीकर महाराज हे प्रवचन करतात़ समाजाच्या प्रबोधनाचे काम ते करतात़ जेव्हा ते दोन-दोन तास अखंड बोलतात, तेव्हा एखादी चूक बोलण्यात होऊ शकते़ मात्र, संपूर्ण दोन तासांतील नेमके तेच शब्द पकडून त्याचा बाऊ करण्याची पद्धत चुकीची आहे़ इंदोरीकर महाराजांना नोटीस दिली म्हणजे गुन्हा दाखल होईलच असे नाही़ परंतु, ते जे काही बोलले त्यावर कायदा आपले काम करेल, अशा शब्दांत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी इंदोरीकर महाराजांच्या वक्तव्यावर मत व्यक्त केले. 

सरकार पाच वर्षे टिकेल़सरकारमध्ये विसंवाद कोठेही नाही़ त्यामुळे हे सरकार पाच वर्षे नक्कीच टिकेल़ जो काही विसंवाद दिसतो, तो चॅनल्सना बातम्या पुरविण्यासाठीचाच असतो, असे बच्चू कडू हसत हसत म्हणाले़

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूOsmanabadउस्मानाबादState Governmentराज्य सरकार