शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
2
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
3
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
4
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
5
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
6
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
7
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
8
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
9
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
10
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
11
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
12
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
13
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
14
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
15
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
16
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
18
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
19
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
20
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!

धडाकेबाज राज्यमंत्री बच्चू कडूंना कोणी दिला आहे गोड बोलण्याचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 15:03 IST

काम करणाऱ्यांना दोन दिवससुद्धा पुरेसे असतात़ मात्र, जे अधिकारी-कर्मचारी कामच करीत नाहीत, त्यांना याचा  काही फरक पडत नसतो़ 

ठळक मुद्देदोन अधिक दोन बरोबर सहा म्हटले तरी ‘हो सरकार’ म्हणावेच लागतेकेलेल्या विधानानंतर वरून एक फोन आला आणि याविषयी चांगले सांगण्याचा निरोप मिळाला

- सूरज पाचपिंडे 

उस्मानाबाद : धडाकेबाज मंत्री म्हणून ख्याती असलेल्या बच्चू कडू यांना सरकारमध्ये कसे बोलावे, याविषयी आता ‘बाळकडू’ पाजले जात आहेत़ पाच दिवसांच्या आठवड्यावरुन त्यांनी केलेल्या विधानानंतर वरून एक फोन आला आणि याविषयी चांगले सांगण्याचा निरोप मिळाल्याचे खुद्द कडू यांनीच अनौपचारिक चर्चेत सांगितले़ यानंतर मात्र, काम करणाऱ्यांना दोन दिवस सुद्धा पुरेसे असतात, असे सांगून ‘त्या’ फोनचा आदर राखला

राज्यमंत्री बच्चू कडू हे सोमवारी उस्मानाबादेत आले होते़ दुपारी त्यांनी जिल्हा न्यायालयात विधिज्ञ मंडळाची भेट घेऊन अनौपचारिक गप्पा मारल्या़ पाच दिवसांच्या आठवड्यास विरोध दर्शविणारे विधान कडू यांनी यापूर्वी केले होते़ त्याविषयी बोलताना ते म्हणाले, आम्ही पाच अन् सातचा हिशोब सांगत होतो़ वरून फोन आला़ हा हिशोब (निर्णय) चांगला, असेच सांगा़ त्यामुळे दोन अधिक दोन चार ऐवजी सहा म्हटले तरी, हो सरकार म्हणावे लागते़ कारण, सरकारचा हा आरसा टिकवायचा आहे़ या विधानांतून त्यांनी काहिशी हतबलता  व्यक्त केली़ मात्र, त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना कडू यांनी ‘त्या’ फोनवरील निरोपाशी सुसंगत अशी भूमिका मांडून त्या निर्णयाचे एकप्रकारे समर्थनच केले़ ते म्हणाले, काम करणाऱ्यांना दोन दिवससुद्धा पुरेसे असतात़ मात्र, जे अधिकारी-कर्मचारी कामच करीत नाहीत, त्यांना याचा  काही फरक पडत नसतो़ 

नोटीस म्हणजे गुन्हा दाखल होईलच असे नव्हेइंदोरीकर महाराज हे प्रवचन करतात़ समाजाच्या प्रबोधनाचे काम ते करतात़ जेव्हा ते दोन-दोन तास अखंड बोलतात, तेव्हा एखादी चूक बोलण्यात होऊ शकते़ मात्र, संपूर्ण दोन तासांतील नेमके तेच शब्द पकडून त्याचा बाऊ करण्याची पद्धत चुकीची आहे़ इंदोरीकर महाराजांना नोटीस दिली म्हणजे गुन्हा दाखल होईलच असे नाही़ परंतु, ते जे काही बोलले त्यावर कायदा आपले काम करेल, अशा शब्दांत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी इंदोरीकर महाराजांच्या वक्तव्यावर मत व्यक्त केले. 

सरकार पाच वर्षे टिकेल़सरकारमध्ये विसंवाद कोठेही नाही़ त्यामुळे हे सरकार पाच वर्षे नक्कीच टिकेल़ जो काही विसंवाद दिसतो, तो चॅनल्सना बातम्या पुरविण्यासाठीचाच असतो, असे बच्चू कडू हसत हसत म्हणाले़

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूOsmanabadउस्मानाबादState Governmentराज्य सरकार