शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

धडाकेबाज राज्यमंत्री बच्चू कडूंना कोणी दिला आहे गोड बोलण्याचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 15:03 IST

काम करणाऱ्यांना दोन दिवससुद्धा पुरेसे असतात़ मात्र, जे अधिकारी-कर्मचारी कामच करीत नाहीत, त्यांना याचा  काही फरक पडत नसतो़ 

ठळक मुद्देदोन अधिक दोन बरोबर सहा म्हटले तरी ‘हो सरकार’ म्हणावेच लागतेकेलेल्या विधानानंतर वरून एक फोन आला आणि याविषयी चांगले सांगण्याचा निरोप मिळाला

- सूरज पाचपिंडे 

उस्मानाबाद : धडाकेबाज मंत्री म्हणून ख्याती असलेल्या बच्चू कडू यांना सरकारमध्ये कसे बोलावे, याविषयी आता ‘बाळकडू’ पाजले जात आहेत़ पाच दिवसांच्या आठवड्यावरुन त्यांनी केलेल्या विधानानंतर वरून एक फोन आला आणि याविषयी चांगले सांगण्याचा निरोप मिळाल्याचे खुद्द कडू यांनीच अनौपचारिक चर्चेत सांगितले़ यानंतर मात्र, काम करणाऱ्यांना दोन दिवस सुद्धा पुरेसे असतात, असे सांगून ‘त्या’ फोनचा आदर राखला

राज्यमंत्री बच्चू कडू हे सोमवारी उस्मानाबादेत आले होते़ दुपारी त्यांनी जिल्हा न्यायालयात विधिज्ञ मंडळाची भेट घेऊन अनौपचारिक गप्पा मारल्या़ पाच दिवसांच्या आठवड्यास विरोध दर्शविणारे विधान कडू यांनी यापूर्वी केले होते़ त्याविषयी बोलताना ते म्हणाले, आम्ही पाच अन् सातचा हिशोब सांगत होतो़ वरून फोन आला़ हा हिशोब (निर्णय) चांगला, असेच सांगा़ त्यामुळे दोन अधिक दोन चार ऐवजी सहा म्हटले तरी, हो सरकार म्हणावे लागते़ कारण, सरकारचा हा आरसा टिकवायचा आहे़ या विधानांतून त्यांनी काहिशी हतबलता  व्यक्त केली़ मात्र, त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना कडू यांनी ‘त्या’ फोनवरील निरोपाशी सुसंगत अशी भूमिका मांडून त्या निर्णयाचे एकप्रकारे समर्थनच केले़ ते म्हणाले, काम करणाऱ्यांना दोन दिवससुद्धा पुरेसे असतात़ मात्र, जे अधिकारी-कर्मचारी कामच करीत नाहीत, त्यांना याचा  काही फरक पडत नसतो़ 

नोटीस म्हणजे गुन्हा दाखल होईलच असे नव्हेइंदोरीकर महाराज हे प्रवचन करतात़ समाजाच्या प्रबोधनाचे काम ते करतात़ जेव्हा ते दोन-दोन तास अखंड बोलतात, तेव्हा एखादी चूक बोलण्यात होऊ शकते़ मात्र, संपूर्ण दोन तासांतील नेमके तेच शब्द पकडून त्याचा बाऊ करण्याची पद्धत चुकीची आहे़ इंदोरीकर महाराजांना नोटीस दिली म्हणजे गुन्हा दाखल होईलच असे नाही़ परंतु, ते जे काही बोलले त्यावर कायदा आपले काम करेल, अशा शब्दांत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी इंदोरीकर महाराजांच्या वक्तव्यावर मत व्यक्त केले. 

सरकार पाच वर्षे टिकेल़सरकारमध्ये विसंवाद कोठेही नाही़ त्यामुळे हे सरकार पाच वर्षे नक्कीच टिकेल़ जो काही विसंवाद दिसतो, तो चॅनल्सना बातम्या पुरविण्यासाठीचाच असतो, असे बच्चू कडू हसत हसत म्हणाले़

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूOsmanabadउस्मानाबादState Governmentराज्य सरकार