शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

जागेचा पेच; विझाेरा, दहीवडी, शेकापूर उपकेंद्रांचे बांधकाम लटकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:56 IST

उस्मानाबाद : एकीकडे निधी नाही म्हणून ओरड करायची अन् दुसरीकडे उपलब्ध निधी दाेन-दाेन वर्ष खर्च करायचा नाही. याचा फटका ...

उस्मानाबाद : एकीकडे निधी नाही म्हणून ओरड करायची अन् दुसरीकडे उपलब्ध निधी दाेन-दाेन वर्ष खर्च करायचा नाही. याचा फटका गाेरगरीब जनतेला बसत आहे. आराेग्य विभागाकडून २०१९-२० मध्ये विझाेरा, दहीवडी, शेकापूर येथील उपकेंद्रांच्या नवीन इमारती उभ्या करण्यासाठी निधी मंजूर केला. परंतु, निधी खर्चाची मुदत संपण्यास अवघ्या वीस दिवसांचा कालावधी उरला आहे. असे असतानाही छदामही खर्च झाला नाही. येत्या अठरा ते वीस दिवसात निधी खर्च करण्याच्या अनुषंगाने कुठलीच कार्यवाही न झाल्यास सुमारे तीन काेटी रुपये शासनास परत करण्याची नामुष्की ओढावणार आहे, हे निश्चित.

ग्रामीण भागात आजही खासगी दवाखान्यांची म्हणावी तेवढी संख्या नाही. त्यामुळे लहान-माेठे आजार असाेत की मातांची प्रसूती, यासाठी ग्रामस्थ उपकेंद्र जवळ करतात. हीच बाब लक्षात घेऊन उपकेंद्रांना आता डाॅक्टरही देण्यात आले आहेत. सुसज्ज इमारतीही उभारण्यात येत आहेत. त्यामुळे गाेरगरिबांना माेठा आधार मिळत आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षात भूम तालुक्यातील विझाेरा, तुळजापूर तालुक्यातील दहीवडी आणि उस्मानाबाद तालुक्यातील शेकापूर येथे उपकेंद्रांना नवीन इमारती मंजूर करण्यात आल्या हाेत्या. यासाठी प्रत्येकी एक काेटी रुपयांची तरतूद शासनाने मंजूर केली हाेती. हा निधीही जिल्हा परिषदेकडे जमा आहे. परंतु, यातील काही कामे गावपातळीवरील तांत्रिक अडचणीमुळे तर काही कामे पुढाऱ्यांतील अंतर्गत लाथाळ्यांमुळे रखडली आहेत. काेट्यवधीचा निधी पडून आहे. महागाईचा आलेख दिवसागणिक वाढू लागला आहे. त्यामुळे कामाची किंमत प्रत्येकी एक काेटीवरून दीड काेटीवर जाऊन ठेपली आहे. असे असतानाही इमारत बांधकामास गती मिळत नसल्याचे दिसत आहे. दरम्यान, इमारत बांधकामाची प्राेसेस सुरू करण्यास आराेग्य यंत्रणेच्या हाती अवघे १८ ते २० दिवस उरले आहेत. या कालावधीत जर कुठलाच ताेडगा निघाला नाही तर हा निधी शासनखाती जमा करण्याची नामुष्की जिल्हा परिषदेवर ओढावणार आहे. असे घडल्यास गाेरगरीब जनतेची गैरसाेय माेठ्या प्रमाणात हाेणार आहे. सर्दी, पडसे यांसारख्या आजारांवर उपचार करण्यासाठी पाेटाला चिमटे घेऊन बचत केलेली पै पै खासगी दवाखान्यात खर्च करावी लागणार आहे. या प्रकाराबाबत ग्रामस्थांतून आता तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, हा विभाग उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या अखत्यारित येताे. त्यामुळे त्यांनी विशेष लक्ष देऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची संबंधित गावातील गाेरगरीब जनतेतून व्यक्त केली जाऊ लागली आहे.

चाैकट...

सीईओंनी लक्ष घालण्याची गरज...

दाेन वर्षांपासून गाेरगरिबांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या उपकेंद्र इमारत उभारणीचे पैसे पडून आहेत. तातडीने पाऊले न उचलल्यास संबंधित निधी शासनाकडे परत पाठवावा लागणार आहे. यात संबंधित गावांचे अधिक नुकसान हाेणार आहे. वरतून अकार्यक्षम आराेग्य विभाग असा शिक्काही पडणार आहे. ही बाब लक्षात घेता, जिल्हा परिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. विजयकुमार फड यांनी स्वत: लक्ष घालण्याची गरज आता ग्रामस्थ व्यक्त करू लागले आहेत.

अंदाजपत्रकीय रक्कम वाढली...

तीनही उपकेंद्रांच्या इमारत उभारणीसाठी सुरुवातीला प्रत्येकी एक काेटी रुपये मंजूर करण्यात आले हाेते. परंतु, तीनही कामे रेंगाळली. त्यामुळे अंदाजपत्रकीय रक्कम वाढली आहे. आता एका इमारतीच्या उभारणीसाठी दीड काेटी रुपये खर्च येणार आहे. एवढे हाेऊनही मार्चपर्यंत कार्यवाही न झाल्यास ही रक्कम शासनखाती जमा करावी लागणार आहे.