शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
4
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
5
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
6
संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
7
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
8
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
9
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
10
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
11
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
12
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
13
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
14
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
15
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
16
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
17
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
18
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
19
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
20
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?

मोबाईल रेंजसाठी कधी रस्त्यावर तर कधी डोंगरावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:34 IST

अणदूर : तुळजापूर तालुक्यातील उमरगा (चि) या गावात कोणत्याच मोबाईल कंपनीचे नेटवर्क मिळत नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थ, व्यापारी व ...

अणदूर : तुळजापूर तालुक्यातील उमरगा (चि) या गावात कोणत्याच मोबाईल कंपनीचे नेटवर्क मिळत नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थ, व्यापारी व विद्यार्थी यांचे मोठे हाल होत असून, रेंज मिळविण्यासाठी रस्त्यावर, डोंगरावर भटकंती करण्याची वेळ आली आहे.

उमरगा (चि) हे जवळपास चार हजार लोकसंख्येचे गाव आहे. येथे विविध कंपनीच्या मोबाईलचे हजारो ग्राहक आहेत. परंतु, बीएसएनएलसह कुठल्याच खाजगी मोबाईल कंपनीचे गावात टॉवर नाही. गावापासून सात-आठ किमी अंतरावर असलेल्या अणदूर, चिवरी येथे टॉवर असले तरी अंतर जास्त असल्यामुळे येथून तिथपर्यंत व्यवस्थित रेंज पोहोचू शकत नाही. अधून-मधून रेंज मिळत असल्यामुळे नागरिकांना शेतात, उंचवट्याचा आधार घ्यावा लागत आहे.

कोविडच्या महामारीत शासनाने विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन शिक्षण बंद केले व ऑनलाईन शिक्षणाची सक्ती केली. पण गावात नेटवर्क नसल्यामुळे ऑनलाईन शिक्षणाला व्यत्यय येत आहे. त्यामुळे शिक्षकांना यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. यातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊन गुणवत्तेचा दर्जा ढासळत आहे. कोणत्याही शासकीय सेवेचा लाभ घेण्यासाठी देखील आता ऑनलाईन फॉर्म भरावे लागत आहेत. त्यामुळे, शासनाच्या योजनांचा लाभ घेतानाही ग्रामस्थांना मोठ्या अडचणी येत आहेत. नेटवर्कअभावी वेळेत पीक विमा न भरता आल्याने काही शेतकऱ्यांचे नुकसानही झाले आहे. त्यामुळे मोबाईल कंपन्यांनी उमरगा (चि) येथे टाॅवर उभे करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे

चौकट......

गावात टाॅवर उभे करण्यासाठी विविध कंपन्यांशी आम्ही मेलद्वारे संपर्क केला. परंतु, कोणत्याच कंपनीकडून प्रतिसाद मिळत नाही. टाॅवरच्या उभारणीसाठी स्वत:ची जागा देण्याचीही तयारी आहे. फक्त कंपनीने पुढाकार घेण्याची गरज आहे.

- आसिफ नूरमहमद शेख, ग्रामस्थ

माझ्याकडे दोन सिमकार्ड आहेत. परंतु, एकाही कंपनीची रेंज व्यवस्थित मिळत नाही. वारंवार कस्टमर केअरला तक्रारीसाठी संपर्क करतोय. परंतु, त्यांच्याकडूनही समाधानकारक उत्तर मिळत नाही. आमचा व्यवसाय मोबाईलवरच अवलंबून आहे. त्यामुळे कुठल्या तरी कंपनीने टॉवर उभारणीसाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

- गणेश पोतदार, व्यावसायिक

गावामध्ये रेंज येत नसल्यामुळे बऱ्याच अडचणींना ग्रामस्थांना तोंड द्यावे लागते. संबंधित कंपनीला ग्रामपंचायतीच्यावतीने अर्ज देऊन टाॅवरची मागणी करणार आहोत. कंपनीने सहमती दर्शवली तर ग्रामपंचायत टाॅवर उभारण्यासाठी जागा देखील उपलब्ध करून देईल.

- गोरोबा गायकवाड, ग्रामविकास अधिकारी, उमरगा (चि)

गावांमध्ये कुठल्याही मोबाईलला रेंज येत नाही. सध्या ऑफलाईन शिक्षण बंद असल्यामुळे ऑनलाईन शिक्षण हा पर्याय निवडला होता. परंतु, रेंज नसल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी व्यत्यय येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे.

- विठ्ठल जेटीथोर, मुख्याध्यापक, जि. प. प्रशाला