शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल रेंजसाठी कधी रस्त्यावर तर कधी डोंगरावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:34 IST

अणदूर : तुळजापूर तालुक्यातील उमरगा (चि) या गावात कोणत्याच मोबाईल कंपनीचे नेटवर्क मिळत नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थ, व्यापारी व ...

अणदूर : तुळजापूर तालुक्यातील उमरगा (चि) या गावात कोणत्याच मोबाईल कंपनीचे नेटवर्क मिळत नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थ, व्यापारी व विद्यार्थी यांचे मोठे हाल होत असून, रेंज मिळविण्यासाठी रस्त्यावर, डोंगरावर भटकंती करण्याची वेळ आली आहे.

उमरगा (चि) हे जवळपास चार हजार लोकसंख्येचे गाव आहे. येथे विविध कंपनीच्या मोबाईलचे हजारो ग्राहक आहेत. परंतु, बीएसएनएलसह कुठल्याच खाजगी मोबाईल कंपनीचे गावात टॉवर नाही. गावापासून सात-आठ किमी अंतरावर असलेल्या अणदूर, चिवरी येथे टॉवर असले तरी अंतर जास्त असल्यामुळे येथून तिथपर्यंत व्यवस्थित रेंज पोहोचू शकत नाही. अधून-मधून रेंज मिळत असल्यामुळे नागरिकांना शेतात, उंचवट्याचा आधार घ्यावा लागत आहे.

कोविडच्या महामारीत शासनाने विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन शिक्षण बंद केले व ऑनलाईन शिक्षणाची सक्ती केली. पण गावात नेटवर्क नसल्यामुळे ऑनलाईन शिक्षणाला व्यत्यय येत आहे. त्यामुळे शिक्षकांना यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. यातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊन गुणवत्तेचा दर्जा ढासळत आहे. कोणत्याही शासकीय सेवेचा लाभ घेण्यासाठी देखील आता ऑनलाईन फॉर्म भरावे लागत आहेत. त्यामुळे, शासनाच्या योजनांचा लाभ घेतानाही ग्रामस्थांना मोठ्या अडचणी येत आहेत. नेटवर्कअभावी वेळेत पीक विमा न भरता आल्याने काही शेतकऱ्यांचे नुकसानही झाले आहे. त्यामुळे मोबाईल कंपन्यांनी उमरगा (चि) येथे टाॅवर उभे करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे

चौकट......

गावात टाॅवर उभे करण्यासाठी विविध कंपन्यांशी आम्ही मेलद्वारे संपर्क केला. परंतु, कोणत्याच कंपनीकडून प्रतिसाद मिळत नाही. टाॅवरच्या उभारणीसाठी स्वत:ची जागा देण्याचीही तयारी आहे. फक्त कंपनीने पुढाकार घेण्याची गरज आहे.

- आसिफ नूरमहमद शेख, ग्रामस्थ

माझ्याकडे दोन सिमकार्ड आहेत. परंतु, एकाही कंपनीची रेंज व्यवस्थित मिळत नाही. वारंवार कस्टमर केअरला तक्रारीसाठी संपर्क करतोय. परंतु, त्यांच्याकडूनही समाधानकारक उत्तर मिळत नाही. आमचा व्यवसाय मोबाईलवरच अवलंबून आहे. त्यामुळे कुठल्या तरी कंपनीने टॉवर उभारणीसाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

- गणेश पोतदार, व्यावसायिक

गावामध्ये रेंज येत नसल्यामुळे बऱ्याच अडचणींना ग्रामस्थांना तोंड द्यावे लागते. संबंधित कंपनीला ग्रामपंचायतीच्यावतीने अर्ज देऊन टाॅवरची मागणी करणार आहोत. कंपनीने सहमती दर्शवली तर ग्रामपंचायत टाॅवर उभारण्यासाठी जागा देखील उपलब्ध करून देईल.

- गोरोबा गायकवाड, ग्रामविकास अधिकारी, उमरगा (चि)

गावांमध्ये कुठल्याही मोबाईलला रेंज येत नाही. सध्या ऑफलाईन शिक्षण बंद असल्यामुळे ऑनलाईन शिक्षण हा पर्याय निवडला होता. परंतु, रेंज नसल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी व्यत्यय येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे.

- विठ्ठल जेटीथोर, मुख्याध्यापक, जि. प. प्रशाला