शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

...तर रस्त्यावर झोपून आंदोलन करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:32 IST

कळंब : गेल्या तीन वर्षापासून वळण (बायपास) रस्त्याचे काम रखडले असून, शहरातील अनेक कामाची मुदत संपलेली असतानाही ती पूर्ण ...

कळंब : गेल्या तीन वर्षापासून वळण (बायपास) रस्त्याचे काम रखडले असून, शहरातील अनेक कामाची मुदत संपलेली असतानाही ती पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळे ही कामे तात्क़ाळ सुरू न केल्यास रस्त्यावर झोपून आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

याबाबत मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की शहराच्या बाहेर जाणाऱ्या वळण रस्त्याचे (बायपास) काम गेल्या तीन वर्षापासून रखडलेले आहे. या कामाची मुदत संपलेली असतानाही काम बंद असून, याकडे प्रशासन, पदाधिकारी यांचे दुर्लक्ष आहे. हे काम करणाऱ्या गुत्तेदार एजन्सीची गिनिज बुकात नोंद होण्यासाठी न. प.ने शिफारस करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. शहरात अनेक कामे अर्धवट असून, ती तात्काळ पूर्ण करण्यात यावीत, अन्यथा याच रस्त्यावर झोपून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

या निवेदनावर नगरसेवक सतीश टोणगे, चर्मकार युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष विकास कदम, मारुती माने, राजाभाऊ गरड, पोपट जगताप, सोमनाथ वाघमारे, महेश दळवी, बाबूराव सुरवसे, हिम्मत मंडाळे, बालाजी देशमाने यांच्या सह्या आहेत.