शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

बंधाऱ्यांची होणार एकाच वेळी दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:22 IST

उस्मानाबाद : मराठवाडा हा कायम दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. त्यातही उस्मानाबाद जिल्ह्यात यापूर्वीच्या काही वर्षांपूर्वीचा अभ्यास केला ...

उस्मानाबाद : मराठवाडा हा कायम दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. त्यातही उस्मानाबाद जिल्ह्यात यापूर्वीच्या काही वर्षांपूर्वीचा अभ्यास केला असता दरवर्षी शंभर-दीडशे टँकरने पाणीपुरवठा करावा लागत असे. जिल्ह्यातील पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जुन्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीचे काम एकाच वेळी (वन स्ट्रोक) हाती घेण्यात येईल. यासाठी आवश्यक असलेला निधी जिल्हा नियोजन समितीकडून जास्तीत जास्त देण्यात येईलच, त्याशिवाय राज्य सरकारकडूनही निधी उपलब्ध करून हे काम केले जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी सोमवारी येथे केले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन इमारतीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर होते. यावेळी जि. प.च्या अध्यक्षा अस्मिता कांबळे, आ. विक्रम काळे, आ. ज्ञानराज चौगुले, आ. कैलास पाटील, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड, जिल्हा पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन, अपर जिल्हाधिकारी रूपाली आवले, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता ए. डी. कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, जिल्हा नियोजन अधिकारी श्रीकांत दे. कुंटला, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी प्रीतम श्री. कुंटला, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल सगर, आदी उपस्थित होते.

मराठवाड्यातील दुर्लक्षित अशा जिल्ह्यात अतिशय देखणी इमारत उभी राहिली आहे. जिल्ह्यातील शासकीय कार्यालयाच्या इमारतींच्या वैभवात भर घालणारी ही इमारत आहे. तेव्हा जिल्ह्याच्या विकासाचे काम येथून व्हावे. या इमारतीची स्वच्छता आणि देखभाल राखली जावी, अशी अपेक्षा पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. जिल्ह्यातील कोल्हापुरी बंधाऱ्यांना प्राथमिक तत्त्वावर तीन ठिकाणी अर्ध स्वयंचलित यांत्रिकी गेट बसविण्यास मान्यता दिली आहे. सध्याच्या प्राप्त निधीतून ६७ कोल्हापुरी बंधारे आणि १०९ लघू पाटबंधाऱ्यांच्या दुरुस्तीच्या कामांना मंजुरी दिली आहे. कोरोनाच्या काळात या कामांना गती देता आली नाही. परंतु, जिल्ह्यातील पिण्याच्या आणि सिंचनाच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी जुन्या सर्व बंधाऱ्यांची एकाच वेळी जिल्हा नियोजनमधून आणि राज्य सरकारकडून निधी मिळवून दुुरुस्ती करण्यात येईल. या कामासाठी शंभर ते १२५ कोटी रुपयांची गरज आहे. एवढा निधी प्राप्त केला जाईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. प्रारंभी नियोजन भवन इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ दीपप्रज्वलन करून आणि कोनशीलेचे अनावरण करून पालकमंत्री गडाख यांनी या इमारतीचे उद्घाटन केले. त्यानंतर फिरून संबंध इमारतीची पाहणीही केली.

९९ टक्के निधी खर्च

जिल्हा नियोजन समिती ही जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा आत्मा आहे. जिल्हा वार्षिक योजना २०२०-२१ करिता २६० कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. त्यापैकी २५९ कोटी ४० लाख रुपये इतका निधी खर्च करण्यात आला. या खर्चाची टक्केवारी ९९.४६ इतकी आहे. गेल्या वर्षी तालुकानिहाय समप्रमाणात कामांचे वाटप करण्यास प्राधान्य देण्यात आले, तर नगरपालिकांना लोकसंख्येच्या प्रमाणात निधीचे वाटप करण्यात आले, असे गडाख यावेळी म्हणाले.

यांचा झाला सत्कार

यावेळी इमारतीचे ठेकेदार लोकमंगल कन्स्ट्रक्शन कंपनी, सोलापूर, वास्तुविशारद, विद्युत विषयक काम केलेल्या सुवर्ण इंटरप्रायजेस, आदींचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कुलकर्णी आणि सगर यांचाही सत्कार पालकमंत्र्यांनी केला. जिल्हा अधीक्षक कृषी विभागाने काढलेल्या खरीप हंगामातील पिकांमध्ये सर्वाधिक उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांच्या लागवड पद्धतीवरील पुस्तकाचे प्रकाशनही पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.