शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

महालक्ष्मीची मंदिर परसरिसरात शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:00 IST

अणदूर : मागील काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे बैठक ...

अणदूर : मागील काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे बैठक घेऊन कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी यात्रौत्सव रद्द करण्याचे आवाहन केले होते. शिवाय, मोठ्या प्रमाणात यात्रा होऊ नये यासाठी स्थानिक प्रशासन, देवस्थान ट्रस्ट, पुजारी मंडळाने देखील पुढाकार घेतला आहे. भाविकांनी देखील प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत यात्रेला येणे टाळल्यामुळे मंदिर परसिरात सध्या शुकशुकाट दिसत आहे.

महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील श्री महालक्ष्मीचा यात्रौत्सव शेकडो वर्षांपासून प्रसिध्द आहे. यात्रेनिमित्त महाराष्ट्रासोबतच कर्नाटक व आंध्र प्रदेशातून देखील हजारोंच्या संख्येने भाविक चिवरीमध्ये दाखल होत होते. मात्र, यंदा यात्रौत्सव रद्द झाल्याने शेकडो पोतराज, आराधी, जान्यांचा नृत्य, त्यांच्या हस्ते विधिवत पूजा, पारधी समाजातील हजारो भक्तांची यात्रेतील वर्दळ दिसेनासी झाली आहे. यात्रेत होणारा ‘आई राजा उदे उदे’ चा सूरही बंद झाला आहे.

या यात्रेकडे तुळजापूरचे तहसीलदार सौदागर तांदळे, नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सपोनि जगदीश राऊत यांचे विषेश लक्ष असून, नळदुर्ग पोलीस ठाण्याचा ताफा चोख बंदोबस्तासाठी बोलावण्यात आला आहे. महालक्ष्मी मंदिर स्थापनेनंतर यंदा प्रथमच हा यात्रौत्सव रद्द करण्याची ही पहिली वेळ आहे. यासाठी सरपंच अशोक घोडके, उपसरपंच बालाजी पाटील, ग्रामविकास अधिकारी गोरोबा गायकवाड, तलाठी डी. एन. गायकवाड, देवस्थान ट्रस्टचे ज्ञानदेव पाटील, अनिल गायकवाड, जयपालसिंह बायस, ज्ञानदेव झिंगरे, प्रभाकर बिराजदार, भिमराव देडे, विश्‍वनाथ कोरे, रवींद्र शिंदे, सुरेश भुजबळ, पोलीस पाटील योगेश बिराजदार, मोतीराम चिमणे, बालाजी शिंदे यांच्यासह दुकानदार, पुजारी मंडळाने पुढाकार घेतला आहे.

चौकट..

कडक बंदोबस्त

भाविकांनी मंदिरात येऊ नये यासाठी मंदिराकडे जाणाऱ्या सर्वच रस्त्यांवर बॅरिगेट्‌स लावून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिवाय, मंदिर परिसरात देखील पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे दर्शनासाठी येणारे भाविक लांबूनच महालक्ष्मीचे दर्शन घेऊन आपापल्या गावी परतले. दरम्यान, यात्रौत्सव रद्द झाला असला तरी यानिमित्त होणारे आंबटभात कार्यक्रम, पालखीची मिरवणूक, अभिषेक, पूजा, नैवद्य आदी धार्मिक विधी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पाडले जात आहेत.