शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

महालक्ष्मीची मंदिर परसरिसरात शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:00 IST

अणदूर : मागील काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे बैठक ...

अणदूर : मागील काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे बैठक घेऊन कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी यात्रौत्सव रद्द करण्याचे आवाहन केले होते. शिवाय, मोठ्या प्रमाणात यात्रा होऊ नये यासाठी स्थानिक प्रशासन, देवस्थान ट्रस्ट, पुजारी मंडळाने देखील पुढाकार घेतला आहे. भाविकांनी देखील प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत यात्रेला येणे टाळल्यामुळे मंदिर परसिरात सध्या शुकशुकाट दिसत आहे.

महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील श्री महालक्ष्मीचा यात्रौत्सव शेकडो वर्षांपासून प्रसिध्द आहे. यात्रेनिमित्त महाराष्ट्रासोबतच कर्नाटक व आंध्र प्रदेशातून देखील हजारोंच्या संख्येने भाविक चिवरीमध्ये दाखल होत होते. मात्र, यंदा यात्रौत्सव रद्द झाल्याने शेकडो पोतराज, आराधी, जान्यांचा नृत्य, त्यांच्या हस्ते विधिवत पूजा, पारधी समाजातील हजारो भक्तांची यात्रेतील वर्दळ दिसेनासी झाली आहे. यात्रेत होणारा ‘आई राजा उदे उदे’ चा सूरही बंद झाला आहे.

या यात्रेकडे तुळजापूरचे तहसीलदार सौदागर तांदळे, नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सपोनि जगदीश राऊत यांचे विषेश लक्ष असून, नळदुर्ग पोलीस ठाण्याचा ताफा चोख बंदोबस्तासाठी बोलावण्यात आला आहे. महालक्ष्मी मंदिर स्थापनेनंतर यंदा प्रथमच हा यात्रौत्सव रद्द करण्याची ही पहिली वेळ आहे. यासाठी सरपंच अशोक घोडके, उपसरपंच बालाजी पाटील, ग्रामविकास अधिकारी गोरोबा गायकवाड, तलाठी डी. एन. गायकवाड, देवस्थान ट्रस्टचे ज्ञानदेव पाटील, अनिल गायकवाड, जयपालसिंह बायस, ज्ञानदेव झिंगरे, प्रभाकर बिराजदार, भिमराव देडे, विश्‍वनाथ कोरे, रवींद्र शिंदे, सुरेश भुजबळ, पोलीस पाटील योगेश बिराजदार, मोतीराम चिमणे, बालाजी शिंदे यांच्यासह दुकानदार, पुजारी मंडळाने पुढाकार घेतला आहे.

चौकट..

कडक बंदोबस्त

भाविकांनी मंदिरात येऊ नये यासाठी मंदिराकडे जाणाऱ्या सर्वच रस्त्यांवर बॅरिगेट्‌स लावून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिवाय, मंदिर परिसरात देखील पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे दर्शनासाठी येणारे भाविक लांबूनच महालक्ष्मीचे दर्शन घेऊन आपापल्या गावी परतले. दरम्यान, यात्रौत्सव रद्द झाला असला तरी यानिमित्त होणारे आंबटभात कार्यक्रम, पालखीची मिरवणूक, अभिषेक, पूजा, नैवद्य आदी धार्मिक विधी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पाडले जात आहेत.