शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

अनाथ बालकांच्या डाेईवर शिवसेनेचे छत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:43 IST

उस्मानाबाद : कोरोना कालावधीत संसर्गामुळे पालकांचा मृत्यू होऊन अनेक बालके अनाथ झाली आहेत. या बालकांसाठी शासनाकडून योजना राबविली जात ...

उस्मानाबाद : कोरोना कालावधीत संसर्गामुळे पालकांचा मृत्यू होऊन अनेक बालके अनाथ झाली आहेत. या बालकांसाठी शासनाकडून योजना राबविली जात आहेच; मात्र सोबतच जिल्हा शिवसेनेच्यावतीने त्यांचे पालकत्व स्वीकारत अनाथ बालकांच्या नावे १ लाख रुपयांची ठेव ठेवून त्यांचे भवितव्य सुकूर करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आल्याची माहिती आमदार कैलास पाटील यांनी दिली.

कोरोना काळात अनेक कुटुंबांची भरुन न निघणारी हानी झाली आहे. कोणाचे वडील गेले तर कोणाची आई. काही जणांचे तर दोन्ही पालक मृत्युमुखी पडले. अगदी बालपणातच अनाथपण वाट्याला आलेले. अशावेळी शासनाने त्यांना मदतीचा हात देऊन जबाबदारी स्वीकारण्याचे महत्त्वाचे काम केले आहे. सोबतच शिवसेनाही मदतीला धावली आहे. स्व.बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलेले ८० टक्के समाजकारणाचे ब्रीद जपत अनाथ झालेल्या बालकांचे पालकत्व स्वीकारण्याचा मोठा निर्णय जिल्हा शिवसेनेने घेतल्याचे जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास पाटील यांनी सांगितले. अनाथ बालकांच्या नावे तातडीची मदत म्हणून १ लाख रुपयांची मुदतठेव ठेवण्यात आली आहे. ही मदत त्यांना भविष्यात मोलाची ठरेल. या मुदतठेवीचे प्रमाणपत्र या बालकांना रविवारी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते व नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर, गटनेते सोमनाथ गुरव, शहरप्रमुख संजय मुंडे, श्यामराव शिंदे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले.

आई-वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या आयुष्यात निर्माण झालेली ही मोठी पोकळी भरून काढण्याचा शिवसेनेचा छोटासा प्रयत्न आहे. त्यांना या काळात साथ देणे हे समाज म्हणून आपले कर्तव्य आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याचे कुटुंबप्रमुख म्हणून जबाबदारी पेलतच आहेत. त्यांच्या शिकवणीप्रमाणे हा निर्णय घेत या पाल्यांचे पालकत्व शिवसेना स्वीकारत असल्याचे आमदार कैलास पाटील यावेळी म्हणाले.