शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
5
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
6
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
7
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
8
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
9
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
10
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
11
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
12
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
13
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
14
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
15
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
16
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
17
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
18
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
19
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
20
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?

विमा कंपन्या अन् केंद्राचीच सेटलमेंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:35 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यात पडलेल्या पावसाच्या खंडामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. या अनुषंगाने कृषिमंत्री दादा भुसे यांनी ३० ऑगस्ट रोजी ...

उस्मानाबाद : जिल्ह्यात पडलेल्या पावसाच्या खंडामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. या अनुषंगाने कृषिमंत्री दादा भुसे यांनी ३० ऑगस्ट रोजी बैठक घेण्याचे अधिकाऱ्यांना आधीच सूचित केले आहे. राज्य सरकार हे शेतकऱ्यांच्याच बाजूने असून, उलट केंद्र सरकार व विमा कंपन्यांचेच साटेलोटे असल्याचा आरोप खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी केला.

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये २० ते २२ दिवसांपेक्षा अधिक काळ पावसाने खंड दिला. त्यामुळे खरिपाची पिके वाळली आहेत. या अनुषंगाने ही बाब कृषिमंत्री दादा भुसे, पालकमंत्री शंकरराव गडाख-पाटील, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांच्या निदर्शनास आणून दिली होती. यानंतर महसूल, कृषी विभाग व पीक विमा प्रतिनिधींमार्फत चाचणी प्रयोग केले असून, त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. दरम्यान, २५ ऑगस्ट रोजी दादा भुसे यांची मुंबई येथील शासकीय निवासस्थानी आमदार कैलास पाटील यांच्यासमवेत भेट घेतली. त्यांनी कृषी आयुक्त व सचिवांना तात्काळ बैठक लावावी, असे आदेश दिले. त्यानुसार ३० ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय बैठक होत आहे. यातून पीक विमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के मर्यादेपर्यंत आगाऊ रक्कम देण्यासंदर्भात मागणी विमा कंपनीकडे होणार असल्याचे खा. राजेनिंबाळकर यांनी सांगितले.

खाजगी कंपन्या, केंद्राचा आशीर्वाद...

प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सुरुवातीला सरकारी कंपन्या होत्या. मात्र, नंतर खाजगी कंपन्यांचा सहभाग केंद्र सरकारच्या आशीर्वादाने वाढवला आहे. सोबत तीन वर्षांचा करार केला आहे. राज्य सरकारनेदेखील खाजगी पीक विमा कंपनीच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तरीही केंद्र सरकार पीक विमा कंपनीची पाठराखण करून कंपन्यांना अभय देत असल्याचा आरोप करून विमा कंपन्या कोणाच्या जावई आहेत, हे शेतकऱ्यांना चांगलेच ठाऊक असल्याचे खा. राजेनिंबाळकर म्हणाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नात राजकारण करण्याऐवजी सामूहिक प्रयत्न आवश्यक असल्याचे खा. राजेनिंबाळकर व आ. कैलास पाटील यांनी सांगितले.