शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

‘झेडपी’च्या ६१ शाळांवरून गेल्यात धाेकादायक विद्युत तारा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:32 IST

घरावरून वा कार्यालयांच्या इमारतींवरून गेलेल्या विद्युत वाहिन्या तुटून दुर्घटना घडल्याच्या बातम्या अधून-मधून कानावर पडतात. विशेषत: पावसाळ्यात अशा घटना अधिक ...

घरावरून वा कार्यालयांच्या इमारतींवरून गेलेल्या विद्युत वाहिन्या तुटून दुर्घटना घडल्याच्या बातम्या अधून-मधून कानावर पडतात. विशेषत: पावसाळ्यात अशा घटना अधिक प्रमाणात घडतात. हीच बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने शहरी तसेच ग्रामीण भागातील जि.प. शाळांच्या इमारतीवरून तसेच मैदानातून धाेकादायकरीत्या विद्युत तारा गेलेल्या शाळांची माहिती मागविली हाेती. त्यानुसार गटशिक्षणाधिकारी कार्यालयाने ही माहिती शिक्षणाधिकारी यांना सादर केली असता, ही संख्या तब्बल ६१ वर पाेहाेचली. गावनिहाय शाळांची माहिती हाती आल्यानंतर शिक्षण विभागाने १८ फेब्रुवारी २०२० राेजी वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता यांच्या नावे पत्र देऊन हा प्रश्न मांडला. वीज तारा तातडीने शिफ्ट कराव्यात, असे त्यात म्हटले; परंतु पत्राची साधी दखलही घेतली नाही. यानंतर २३ मार्च राेजी दुसरे पत्र दिले. त्यासही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे १४ सप्टेंबर २०२० राेजी तिसरे पत्र दिले; परंतु यानंतरही वीज कंपनीला विद्यार्थ्याच्या सुरक्षेची चिंता वाटली नाही. त्यामुळे आजही शाळांच्या इमारतीवरून धाेकादायकरीत्या गेेलेल्या वीज वाहिन्या कायम आहेत. दरम्यान, मंगळवारी झालेल्या शिक्षण विषय समितीच्या बैठकीत यावरून वादळी चर्चा झाली. त्यानुसार वीज महावितरणचे अधीक्षक अभियंता यांच्या नावे पत्र देण्याचे आदेश उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी दिले.

चाैकट...

तर अधीक्षक अभियंता कारणीभूत असतील -सावंत

धाेकादायकरीत्या शाळांवरून गेलेल्या तारा हटविण्याबाबत शिक्षण विभाग तीन-तीन वेळा पत्रव्यवहार करीत आहे. शाळानिहाय यादी त्यांना दिली आहे. असे असतानाही पत्र गांभीर्याने घेतले जात नाही. ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे भविष्यात दुर्दैवाने एखादी दुर्घटना घडल्यास थेट अधीक्षक अभियंता यांना कारणीभूत धरले जाईल, असा इशारा जि.प.चे उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी बैठकीत इशारा दिला.

चाैकट...

दृष्टिक्षेपात शाळा

तालुका संख्या

उस्मानाबाद ०४

तुळजापूर ०२

उमरगा १८

लाेहारा ०६

भूम ०६

वाशी १९

परंडा ०३

कळंब ०६