शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

प्रशिक्षणाकडे सरपंचांनी फिरविली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:32 IST

कळंब : गावच्या सर्वसमावेशक विकासासाठी तयार करण्यात येणाऱ्या ‘ग्राम विकास आराखडा’ संदर्भातील प्रशिक्षण व क्षमता बांधणी कार्यक्रमाकडे खुद्द सरपंचानी ...

कळंब : गावच्या सर्वसमावेशक विकासासाठी तयार करण्यात येणाऱ्या ‘ग्राम विकास आराखडा’ संदर्भातील प्रशिक्षण व क्षमता बांधणी कार्यक्रमाकडे खुद्द सरपंचानी पाठ फिरवल्याचे स्पष्ट झाले आहे. कळंब येथे बुधवार व गुरूवारी पार पडलेल्या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात पन्नास टक्के सरपंचानी ‘दांडी’ मारल्याने त्यांचा विकासाचा वादा किती ‘बेगडी’ होता हे यामुळे स्पष्ट झाले आहे.त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेमधील ग्रामपंचायत ही महत्त्वाची संस्था आहे. या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाचा विकास करण्यात येतो. गावच्या नागरिकांच्या नागरी सुविधांपासून सुदृढ आरोग्यांचा भार ग्रामपंचायतींच्या खांद्यावर असतो. यामुळेच ग्रामपंचायतीना विविध माथ्यमातून भरीव निधी देण्यात येतो. यापैकीच वित्त आयोग हा महत्वाचा निधीस्त्रोत आहे. सध्या पंधराव्या वित्त आयोगाचा थेट ऐंशी टक्के निधी ग्रा. पं. च्या खात्यावर दिला जात आहे. या निधीचा विनियोग करताना गावच्या गरजांचा प्राधान्याक्रम ठरवावा तसेच शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचा विचार करावा असा दंडक आहे. यासाठी ग्राम विकास विभागाच्या निर्देशानुसार ‘आमचा गाव, आमचा विकास’ उपक्रमांतर्गत ग्राम विकास आराखडा (जीपीडीपी ) तयार करणे गरजेचे आहे.

ग्राम विकास विभागाच्या २५ सप्टेंबरच्या आदेशानुसार २०२१-२०२२ मधील ग्राम विकास आराखडा निश्चित करताना तो सर्वसमावेशक असावा यासाठी राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत सरपंच व ग्रामसेवक यांचा प्रशिक्षण व क्षमता बांधणी कार्यक्रम घ्यावे, असे सूचित केले होते. यानुसार बुधवारी कळंब पंचायत समितीमध्ये दोन दिवसीय, प्रत्येकी दोन सत्रात प्रविण प्रशिक्षकांच्या उपस्थितीमध्ये प्रशिक्षण आयोजीत केले होते.

सभापती संगिता वाघे, उपसभापती गुणवंत पवार, गटविकास अधिकारी एन. पी. राजगुरू यांच्या उपस्थितीत सुरू झालेल्या या प्रशिक्षणाला पहिल्याच दिवशी पन्नास टक्केपेक्षा जास्त सरपंचानी दांडी मारली होती. तर दुसऱ्या दिवशीही यापेक्षा काही वेगळी स्थिती दिसून आली नाही. याशिवाय काही ग्रामसेवकही अनुपस्थित होते. यामुळे गावच्या विकासासाठी आयोजित केलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा एकप्रकारे ‘सोपस्कार’ पार पाडला जात असल्याचे समोर आले.

चौकट...

९१ पैकी ४५ जण हजर

पंचायत समिती सभागृहात आयोजीत प्रशिक्षणास तालुक्यातील ९१ पैकी केवळ ४५ सरपंच उपस्थित होते. याशिवाय ४७ ग्रामसेवक हजर होते. विशेष म्हणजे आठ गावातील उपसरपंच थेट ‘सरपंच’ असल्याच्या अविर्भावात प्रशिक्षणाला ‘प्रेझेंट’ होते. एकूणच या महत्वाच्या प्रशिक्षण कार्यक्रमास मोठ्या संख्येने सरपंच व काही ग्रामसेवक गैरहजर असल्याची धक्कादायक स्थिती दिसून आली.

वेळेत निरोप दिला होता का?

यासंदर्भात पंचायत समितीच्या संबंधित विभागाने योग्य नियोजन केले नसल्याचे समोर आले आहे. काही गावात निरोप पोहचला नसल्याचे, पत्र दिले नसल्याचे सांगण्यात आले. यामुळे महत्वाच्या अशा प्रशिक्षण कार्यक्रमाचे पूर्वनियोजन करणे गरजेच होते. विशेष म्हणजे पं. स. सदस्यांनाही नेमकं काय चालू आहे याचा थांगपत्ता नव्हता.

शेवटी ‘विकास’ राहिला डिजीटलवर

ग्रा. पं. निवडणुकीत विकासाचा वादा करत पॅनल उभे राहतात. सरपंच होण्यासाठी नाही ते करतात. यावेळी गावोगावच्या डिजीटलवर दिसणारा ‘विकास’ वास्तवात मात्र भलताच ‘बेगडी’ असतो. याचाच प्रत्यय बुधवारी आला. गावच्या विकासाचा आराखडा व यासंदर्भातील क्षमता बांधणी प्रशिक्षणाला दांडी मारणारे सरपंच खरोखरच विकासाच्या बाबतीत किती गंभीर आहेत, हे यावरून दिसून येत आहे.