शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

स्वच्छता, पाणी प्रश्नी विशेष सभा बोलवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:34 IST

कळंब : शहरात ठिकठिकाणी साचत असलेल्या कचऱ्यामुळे व अस्वच्छतेमुळे वातावरण दूषित झाले आहे. त्यातच कोरोना काळात न. प. मार्फत ...

कळंब : शहरात ठिकठिकाणी साचत असलेल्या कचऱ्यामुळे व अस्वच्छतेमुळे वातावरण दूषित झाले आहे. त्यातच कोरोना काळात न. प. मार्फत दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी नळाला येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहराची स्वच्छता व पाणी प्रश्नावर न. प. ची विशेष सभा बोलवावी, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे, शहराच्या अनेक भागांत न. प.च्या नियोजनाभावी स्वच्छतेचे तीनतेरा वाजले आहेत. शासनाकडून स्वच्छ शहर सुंदर शहर संकल्पनेला प्रोत्साहन देण्यात येत असले तरी स्थानिक प्रशासनाकडून मात्र स्वच्छतेला बगल दिल्याचे दिसून येते. शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. अस्वच्छता वाढल्याने शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. तसेच नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. शहरातील नळाला गेल्या काही दिवसांपासून दुर्गंधीयुक्त आणि पिवळे पाणी येत आहे. वेळोवेळी तक्रारी करूनही प्रशासन याची दखल घेण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

शुद्ध पाणी मिळण्यासाठी शहरातील मोक्याच्या ठिकाणी पाणी फिल्टर मशीन (ए. टी. एम.) बसवण्यासाठी शेड उभे केले आहेत; परंतु त्यात अद्यापही पाणी सोडलेले नसल्याने हे शेड म्हणजे ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे याची गांभीर्याने दखल घेऊन स्वच्छता व पाणीप्रश्नांवर विशेष सभा बोलावून त्या सभेला प्रत्येक प्रभागातील जाणकार नागरिकांनाही बोलावण्यात यावे, अशी सूचना न. प. मुख्याधिकाऱ्यांना द्यावी, अशी मागणी या निवेदनात केली आहे. निवेदनावर शिवसेनेचे गटनेते शिवाजी कापसे, नगरसेवक मुस्ताक कुरेशी, मीरा चोंदे, अनंत वाघमारे, अश्विनी शिंदे, सुरेखा पारख, सतीश टोणगे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.