शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

एसटी प्रवाशांची तीच ती कारणे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:23 IST

उस्मानाबाद : संचारबंदीकाळात अत्यावश्यक सेवेसाठी प्रवाशांना ये-जा करता यावे, यासाठी राज्य परिवहन महामंडळास बससेवा सुरू ठेवण्याच्या सूचना आहेत. मात्र, ...

उस्मानाबाद : संचारबंदीकाळात अत्यावश्यक सेवेसाठी प्रवाशांना ये-जा करता यावे, यासाठी राज्य परिवहन महामंडळास बससेवा सुरू ठेवण्याच्या सूचना आहेत. मात्र, बसला २२ प्रवासी मिळत नसल्याने ब्रेक लागला आहे. बुधवारी केवळ एक बस धावली असून, अत्यावश्यक सेवेसाठी तीच ती कारणे सांगितली जात असल्याचे एसटीकडून सांगण्यात आले.

गतवर्षी लॉकडाऊनमुळे दोन ते अडीच महिने बसची चाके थांबली होती. त्यामुळे एसटी महामंडळाला आर्थिक फटका सहन करावा लागला. त्यानंतर ५० टक्के प्रवासी क्षमतेवर बसेस सुरू झाल्या होत्या. दिवाळीपासून एसटीची वाहतूक पूर्वपदावर येऊ लागली होती. मात्र, एप्रिल महिन्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली. त्यामुळे शासनाने १४ एप्रिलपासून कडक निर्बंध लागू करण्यात आले. अत्यावश्यक कारणाशिवाय नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडण्यास प्रतिबंध लावण्यात आला आहे. मात्र, नातेवाईक आजारी असल्यानंतर त्यांना भेटण्यास, नातेवाइकांच्या अंत्यविधीस जाण्यासाठी तसेच दुर्धर आजाराच्या रुग्णांना रुग्णालयात जाण्यासाठी एसटीची बससेवा सुरू ठेवण्यात आली आहे. परंतु, मागील १४ दिवसांपासून एकाच मार्गावर २२ प्रवासी मिळत नसल्याने बसेस थांबून राहत आहेत. बुधवारी केवळ एक बस अत्यावश्यक सेवेचे प्रवासी घेऊन धावली आहे. अत्यावश्यक सेवेसाठी प्रवाशांकडून साहेब, रुग्णालयात, अंत्यसंस्काराला जातोय. नातेवाईक आजारी आहेत, त्यांना भेटण्यासाठी जातोय, अशी कारणे दिली जात असल्याचे एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोणत्याच मार्गावर

गर्दी नाही

कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने शासनाने कडक निर्बंध लागू करण्यात आले. परिणामी, नागरिकही घराबाहेर जाणे टाळत आहेत. अत्यावश्यक सेवेतील प्रवासी बसस्थानकात आले तरी २२ प्रवासी हाेत नसल्याने प्रवाशांना परतावे लागत आहे. त्यामुळे कोणत्याच मार्गावर गर्दी होत नाही.

तीच ती कारणे

संचारबंदीच्या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी एसटीला शासकीय, निमशासकीय कर्मचारी, दूधविक्रेते, फळ-भाजीविक्रेत्यांना प्रवासास मुभा दिली आहे.

दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्णांना रुग्णालयात जाण्यासाठी तसेच नातेवाइकांचे आजारपण व अंत्यविधीस जाण्यासाठी नागरिकांना परवानगी आहे.

बसेसला एकाच मार्गावरील २२ प्रवासी मिळत नसल्याने बस दिवसभर डेपोतच थांबून असतात.

बसने प्रवास करताना स्थानकातील आगारप्रमुखांकडे नोंदणी करणे गरजेचे करण्यात आले आहे. त्यात अनेक प्रवासी तीच ती कारणे सांगत आहे.

दररोज ५० लाखांचा फटका

उस्मानाबाद विभागातील सहा आगारांत एकूण ४५० बसेसचा ताफा आहे. लॉकडाऊनपूर्वी या बसेस प्रतिदिन १ लाख ४९ हजार किलोमीटर धावत होत्या. यातून विभागास ५० लाख रुपयांचे उत्पन्न मिळत होते. मात्र, सध्या बसेस बंद असल्याने ५० लाखांचा फटका बसत आहे.

कोट...

संचारबंदी व जिल्हाबंदीमुळे अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना प्रवास करण्यास मुभा आहे. मात्र, एकाच मार्गावर २२ प्रवासी मिळत नाहीत. त्यामुळे बसेस थांबून आहेत. शासकीय, निमशासकीय कार्यालयांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वेळ निश्चित केल्यानंतर बस सोडणे सोपे होईल, अत्यावश्यक सेवेसाठी प्रवास करण्यासाठी नोंदणी करणे गरजेचे आहे.

पी.एम. पाटील, आगारप्रमुख उस्मानाबाद

पॉइंटर

६ जिल्ह्यातील एकूण आगार

१ बसेस चालविल्या जातात

१८ प्रवास करणाऱ्यांची संख्या