शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

'ऑक्सिजन संपत आले, पळा पळा...'; शासकीय यंत्रणा आणि रुग्णालयाच्या सुसंवादाने टळली हानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 14:53 IST

Run out of oxygen in Osmanabad एकिकडे रुग्णांचा आकडा भरमसाठ वाढत चालला आहे. त्यात शासकीय आयोग्य यंत्रणेकडे अपुरे मनुष्यबळ आहे.

ठळक मुद्देसोमवारी सकाळी उस्मानाबादेतील एका खाजगी रुग्णालयातील ऑक्सिजनचा साठा संपत आला होता. स्टॉक नसल्याने प्रसंगावधान राखून रुग्णालय प्रशासनाने वेळीच जिल्हा रुग्णालयातील समन्वय अधिकारी डॉ.इक्बाल मुल्ला यांच्याशी संपर्क केला.

उस्मानाबाद : जिल्ह्यात रुग्ण वाढीस लागल्याने ऑक्सिजनचा वापरही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यातून सोमवारी उस्मानाबाद शहरातील एका खाजगी रुग्णालयातील ऑक्सिजनचा साठा संपत आला होता. प्रसंगावधान राखून जिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधल्याने वेळीच ऑक्सिजनची उपलब्धता झाली. तसेच काही गंभीर रुग्णांना जिल्हा रुग्णालयात शिफ्ट केल्याने पुढची हानी टळली.

एकिकडे रुग्णांचा आकडा भरमसाठ वाढत चालला आहे. त्यात शासकीय आयोग्य यंत्रणेकडे अपुरे मनुष्यबळ आहे. त्यातही मेहनतीने गाडा ओढला जात आहे. खाजगी रुग्णालयांचीही काही परिस्थिती वेगळी नाही. सधन रुग्णांचा खाजगीकडे ओढा आहे. मात्र, बेडची मर्यादा असल्याने येथेही ताण प्रचंड वाढला आहे. दुसरीकडे ऑक्सिजनचाही वापर वाढल्याने पुरवठ्यावर ताण पडत चालला आहे. यातूनच सोमवारी सकाळी उस्मानाबादेतील एका खाजगी रुग्णालयातील ऑक्सिजनचा साठा संपत आला होता. स्टॉक नसल्याने प्रसंगावधान राखून रुग्णालय प्रशासनाने वेळीच जिल्हा रुग्णालयातील समन्वय अधिकारी डॉ.इक्बाल मुल्ला यांच्याशी संपर्क केला. त्यांनी तातडीने खाजगी रुग्णालयातील व्हेंटिलेटर, आयसीयु व ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांची माहिती घेतली. ५ सिलेंडर लागलीच या रुग्णालयाकडे रवाना केले. शिवाय, गंभीर रुग्णांची ऐनवेळी अडचण होऊ नये, याकरिता त्यांना तात्पुरत्या स्वरुपात जिल्हा रुग्णालयात शिफ्ट करण्याचे काम हाती घेतले. जिल्हा रुग्णालय व खाजगी रुग्णालयात वेळीच झालेल्या संवादाने संभाव्य हानी टाळता आली. एकिकडे अशा गंभीर स्थितीत विसंवादाची उदाहरणेही कानी येत असताना या प्रसंगाने मात्र, एक सकारात्मकता निर्माण केली आहे.

सकाळी रुग्णालय प्रशासनाचा ऑक्सिजन स्थितीबाबत फोन आला होता. यानंतर संपूर्ण माहिती तातडीने घेत पहिल्यांदा तेथे जिल्हा रुग्णालयाकडे उपलब्ध असलेले ५ ऑक्सिजन सिलेंडर रवाना केले. तसेच गंभीर असलेल्या रुग्णांची अडचण होऊ नये याकरिता त्यांना जिल्हा रुग्णालयात शिफ्ट करण्याचे काम हाती घेण्यात आले. आपला लढा कोरोनाशी आहे. खाजगी असो वा सरकारी, कोणताही भेद न करता सर्वांनीच संवाद ठेवल्यास हा लढा आपण जिंकू शकू.- डॉ.इक्बाल मुल्ला, समन्वय अधिकारी, जिल्हा रुग्णालय 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOsmanabadउस्मानाबाद