शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
5
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
6
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
7
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
8
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
9
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
10
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
11
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
12
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
13
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
15
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
16
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
19
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
20
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड

दहा एकर उडदात फिरविला रोटाव्हेटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:31 IST

जेवळी : पावसाने मोठ्या प्रमाणावर विश्रांती घेतल्याने उडीद पिकांना मोठा फटका बसला असून, लागवडीला काळ ठरणाऱ्या चार हेक्टर उडीद ...

जेवळी : पावसाने मोठ्या प्रमाणावर विश्रांती घेतल्याने उडीद पिकांना मोठा फटका बसला असून, लागवडीला काळ ठरणाऱ्या चार हेक्टर उडीद पिकात लोहारा तालुक्यातील उत्तर जेवळी येथील एका शेतकऱ्याने चक्क रोटाव्हेटर फिरवून पीक मोडीत काढले. त्यामुळे शेतकऱ्याला लाखो रुपयांचा आर्थिक फटका सहन बसला.

जून महिन्याच्या सुरूवातीला पावसाच्या आगमनाने काही शेतकऱ्यांनी पेरणी केली. या पावसावर जेवळी व परिसरात साधारण वीस टक्के पेरणी झाली. मात्र, कमी ओलीमुळे ८० टक्के शेतकरी जुलै महिन्यात पडलेल्या दमदार पावसानंतर पेरणी केली. पेरणीयोग्य पावसाने यावर्षी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु, हा आनंद शेतकऱ्यांना फार काळ राहिला नाही. जुलै महिन्यातील दमदार आगमनानंतर पावसाने महिनाभरापासून या परिसरात चक्क दडी मारली आहे. दिवसभर कडक ऊन पडल्याने शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे उडीद, मूग आणि सोयाबीन पिके रानात जागेवर करपून गेली.

नगदी पीक असलेल्या उडीद पिकावरील शेतकऱ्यांच्या अपेक्षा आता संपल्या आहेत. उत्पन्नापेक्षा खर्चाचा हिशोब दुप्पट दिसत असल्याने उत्तर जेवळी येथील शेतकरी कल्याणी संभाजी घोडके यांनी आपल्या दहा एकर क्षेत्रावर असलेल्या उडीद पिकात चक्क रोटाव्हेटर फिरवून पीक मोडीत काढले. यामुळे शेतकऱ्यांला लाखो रुपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

कोट.......

दहा एकर क्षेत्रावर जुलैमध्ये उडदाची पेरणी केली होती. पेरणीनंतर पावसाने हुलकावणी दिल्याने पिकांचे कंबरडे मोडले. तब्बल महिना होवून गेला तरी पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे फुलांच्या मोसमात संपूर्ण फुलगळ होऊन दोन-चार शेंगा आहेत. त्याची रास करणे परवडणारे नाही. पुढील होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी संपूर्ण उडीद पिकावरती रोटाव्हेटर मारावे लागले.

- कल्याणी संभाजी घोडके, शेतकरी