शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने सौंदाना, वाकडी ग्रामस्थांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 19:06 IST

गावाला जोडणाऱ्या प्रमुख रस्त्याची दुरूस्ती करावी, यासाठी संबंधित विभागाकडे गत अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरु आहे

ठळक मुद्दे ग्रामसभेत घेतला ठराव रस्त्यासह इतर प्रश्न सुटत नसल्याने घेतला निर्णय

कळंब ( उस्मानाबाद ) : गत दोन दशकांपासून गावाला जोडणाऱ्या एकमेव रस्त्याची सुधारणा होत नसल्याने संतप्त झालेल्या तालुक्यातील सौंदना (अंबा) व वाकडी (ई) या गावातील ग्रामस्थांनी आगामी काळात होणाऱ्या लोकसभा, विधानसभेसह इतर सर्वच निवडणुकावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. प्रजासत्ताकदिनी झालेल्या ग्रामसभेत दोन्ही गावांनी हा एकमुखी निर्णय घेतला.

कळंब तालुक्यातील सौंदना अंबा व वाकडी (ई़) ही दोन गावे उस्मानाबादच्या टोकावरील आहेत़ मांजरा नदीच्या काठावर स्थिरावलेल्या यातील सौंदना गावाची जेमतेम दीड हजार तर वाकडी गावाची एक हजाराच्या आसपास लोकसंख्या आहे़ मांजरामायच्या कृपेने गावशिवारत चांगली सुबत्ता असली तरी रहदारीचा रस्ता मात्र कायम मागसलेला. लातूर-कळंब या राज्यमार्गावरून सौंदना (अंबा) व वाकडी (ई) या गावांना जोडणारा एक रस्ता कसाबसा झाला खरा परंतु, गत दोन दशकापेक्षा जास्त कालावधीपासून या रस्त्याची  ‘खड्डयात रस्ता की  रस्त्यात खड्डे’ अशी गत झालेली आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या साधारणत: पाच किलोमीटर लांबीच्या या रस्त्यावर खड्ड्यांची मोठी घनता वाढली आहे. यामुळे ये-जा करतांना नाकीनऊ येत आहे. या खराब रस्त्यामुळे गावात ना राज्य परिवहन महामंडळाची बस येते ना, इतर वाहने सहजासहजी धावतात़ त्यामुळे विद्यार्थी, वृद्ध, रूग्ण यांना त्रास सहन करावा लागत आहे़ तसेच नित्य ये-जा करणाऱ्या वाहनधारकांनाही दणक्यात प्रवास करावा लागत आहे.

वारंवार पाठपुरावा करूनही गावच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने सौंदना (अंबा) व वाकडी (ई) येथील ग्रामस्थांनी आगामी होणाऱ्या लोकसभा, विधानसभेसह इतर सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त सौंदना अंबा येथे सरपंच डी.बी. देवकते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत हा ठराव घेण्यात आला़ रमेश पालकर यांनी हा ठराव मांडला तर रमेश गायकवाड यांनी अनुमोदन दिले़ तसेच वाकडी (ई) येथे संजय महानवर सुचक असलेला ठराव संमत करण्यात आला. ऐन निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन गावातील नागरिकांनी मतदानवरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याने लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे़

वारंवार मागणी करूनही दुर्लक्षगावाला जोडणाऱ्या प्रमुख रस्त्याची दुरूस्ती करावी, यासाठी संबंधित विभागाकडे गत अनेक वर्षांपासून पाठपुरावा करीत आहोत. यासंबधी निवेदन, तक्र ही देण्यात आली़ परंतु, कोणताही लोकप्रतिनिधी अथवा प्रशासकीय अधिकारी या समस्याकडे लक्ष देत नाही़ त्यामुळे दोन्ही गावातील ग्रामस्थांनी आगामी निवडणुकावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीच्या ठरावाची प्रत व निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार असल्याचे सौंदना अंबा येथील सामाजीक कार्यकर्ते कुलदीप गायकवाड यांनी सांगितले.

टॅग्स :Electionनिवडणूकroad safetyरस्ते सुरक्षाOsmanabadउस्मानाबाद