शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
2
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
3
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
4
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
5
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
6
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
7
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
8
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
9
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
10
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
11
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
12
UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!
13
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
14
बायकोचा खून करून घरात रचला चोरीचा बनाव, पण पतीच्या एका चुकीमुळे झाला 'भांडाफोड'...
15
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
16
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?
17
Jio चा धमाका! २०० रुपयांपेक्षा कमी दरात अनलिमिटेड 5G डेटा आणि कॉलिंग; 'हे' २ स्वस्त प्रीपेड प्लॅन्स लॉन्च
18
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
19
IND vs AUA 1st T20I : सूर्यकुमार यादव अन् शुबमन गिल जोडी जमली; पण शेवटी पाऊस जिंकला!
20
रणबीर कपूरनंतर आता प्रभासही देणार न्यूड सीन? संदीप रेड्डी वांगा यांच्या 'स्पिरीट'ची चर्चा

रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने सौंदाना, वाकडी ग्रामस्थांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 19:06 IST

गावाला जोडणाऱ्या प्रमुख रस्त्याची दुरूस्ती करावी, यासाठी संबंधित विभागाकडे गत अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरु आहे

ठळक मुद्दे ग्रामसभेत घेतला ठराव रस्त्यासह इतर प्रश्न सुटत नसल्याने घेतला निर्णय

कळंब ( उस्मानाबाद ) : गत दोन दशकांपासून गावाला जोडणाऱ्या एकमेव रस्त्याची सुधारणा होत नसल्याने संतप्त झालेल्या तालुक्यातील सौंदना (अंबा) व वाकडी (ई) या गावातील ग्रामस्थांनी आगामी काळात होणाऱ्या लोकसभा, विधानसभेसह इतर सर्वच निवडणुकावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. प्रजासत्ताकदिनी झालेल्या ग्रामसभेत दोन्ही गावांनी हा एकमुखी निर्णय घेतला.

कळंब तालुक्यातील सौंदना अंबा व वाकडी (ई़) ही दोन गावे उस्मानाबादच्या टोकावरील आहेत़ मांजरा नदीच्या काठावर स्थिरावलेल्या यातील सौंदना गावाची जेमतेम दीड हजार तर वाकडी गावाची एक हजाराच्या आसपास लोकसंख्या आहे़ मांजरामायच्या कृपेने गावशिवारत चांगली सुबत्ता असली तरी रहदारीचा रस्ता मात्र कायम मागसलेला. लातूर-कळंब या राज्यमार्गावरून सौंदना (अंबा) व वाकडी (ई) या गावांना जोडणारा एक रस्ता कसाबसा झाला खरा परंतु, गत दोन दशकापेक्षा जास्त कालावधीपासून या रस्त्याची  ‘खड्डयात रस्ता की  रस्त्यात खड्डे’ अशी गत झालेली आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या साधारणत: पाच किलोमीटर लांबीच्या या रस्त्यावर खड्ड्यांची मोठी घनता वाढली आहे. यामुळे ये-जा करतांना नाकीनऊ येत आहे. या खराब रस्त्यामुळे गावात ना राज्य परिवहन महामंडळाची बस येते ना, इतर वाहने सहजासहजी धावतात़ त्यामुळे विद्यार्थी, वृद्ध, रूग्ण यांना त्रास सहन करावा लागत आहे़ तसेच नित्य ये-जा करणाऱ्या वाहनधारकांनाही दणक्यात प्रवास करावा लागत आहे.

वारंवार पाठपुरावा करूनही गावच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने सौंदना (अंबा) व वाकडी (ई) येथील ग्रामस्थांनी आगामी होणाऱ्या लोकसभा, विधानसभेसह इतर सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त सौंदना अंबा येथे सरपंच डी.बी. देवकते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत हा ठराव घेण्यात आला़ रमेश पालकर यांनी हा ठराव मांडला तर रमेश गायकवाड यांनी अनुमोदन दिले़ तसेच वाकडी (ई) येथे संजय महानवर सुचक असलेला ठराव संमत करण्यात आला. ऐन निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन गावातील नागरिकांनी मतदानवरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याने लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे़

वारंवार मागणी करूनही दुर्लक्षगावाला जोडणाऱ्या प्रमुख रस्त्याची दुरूस्ती करावी, यासाठी संबंधित विभागाकडे गत अनेक वर्षांपासून पाठपुरावा करीत आहोत. यासंबधी निवेदन, तक्र ही देण्यात आली़ परंतु, कोणताही लोकप्रतिनिधी अथवा प्रशासकीय अधिकारी या समस्याकडे लक्ष देत नाही़ त्यामुळे दोन्ही गावातील ग्रामस्थांनी आगामी निवडणुकावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीच्या ठरावाची प्रत व निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार असल्याचे सौंदना अंबा येथील सामाजीक कार्यकर्ते कुलदीप गायकवाड यांनी सांगितले.

टॅग्स :Electionनिवडणूकroad safetyरस्ते सुरक्षाOsmanabadउस्मानाबाद