शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

शिवजयंती संदर्भात घेतलेला निर्णय मागे घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:32 IST

उस्मानाबाद : छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती मर्यादित संख्येने साजरी करावी, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. घेतलेला तो ...

उस्मानाबाद : छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती मर्यादित संख्येने साजरी करावी, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. घेतलेला तो निर्णय तत्काळ मागे घेण्यात यावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्याकडे केली आहे.

राज्यातील आघाडी सरकारने शिवजयंती साजरी करताना मिरवणूक न काढणे, जाहीर प्रबोधनात्मक कार्यक्रम न घेणे अशा जाचक अटींचे निर्णय घेतल्यामुळे राज्यातील तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावलेल्या आहेत. कोरोनाच्या संकटामुळे आपल्या आवाहनास जनतेने मनापासून प्रतिसाद दिला, परंतु २०२१ साल हे जगातील लोकांसाठी आशादायी किरणाने उजळले आहे. नव्हे, तर कोरोनासारख्या जागतिक महामारीला हरवू शकतो, असा आत्मविश्‍वास देणारे ठरले आहे. सद्यपरिस्थितीत राज्यात सर्व व्यवहार, व्यापार, लग्न, धार्मिक कार्य, मंत्र्यांचे दौरे, राजकीय सभा अगदी मुक्तपणे सुरळीत सुरू केले आहेत, तसेच राज्यातील मंत्री, नेते, मोठमोठ्या सभा घेत, आपले कार्यक्रम व्यवस्थित पार पाडीत आहेत. त्यावेळी सरकारला कोरोनाच्या प्रसाराची भीती वाटत नाही, परंतु नेमकी महाराष्ट्राची अस्मिता असणाऱ्या शिवरायांच्या जयंतीच्या उत्सवातच कोरोनाच्या प्रसाराची आपल्याला भीती वाटते, हे अनाकलनीय आहे. सरकारने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा तीव्र आंदाेलन करण्यात येईल, असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष ॲड.तानाजी चौधरी, जिल्हा सचिव आशिष पाटील, दत्तात्रय कवडे, अतुल गायकवाड, संदीप लाकाळ, आकाश मुंडे, बालाजी नाईकनवरे, रमेश चव्हाण, रामेश्वर बोबडे, आदित्य देशमुख, मनोज लोमटे-पाटील, ॲड.आकाश एडके, शिवदास पवार, रईस शेख, प्रशांत शेळके आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.