शहरं
Join us  
Trending Stories
1
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
2
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
3
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
4
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
5
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
6
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
7
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
8
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
9
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
10
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
11
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
12
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
13
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
14
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
15
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
16
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
17
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
18
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
19
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
20
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!

दोघा कर्मचाऱ्यांवर चालतोय निबंधक कार्यालयाचा कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:29 IST

भूम : शहरातील सहायक निबंधक कार्यालयात एकूण सहा पदे मंजूर असले तरी शिपायासह इतर दोन पदे रिक्त आहेत. ...

भूम : शहरातील सहायक निबंधक कार्यालयात एकूण सहा पदे मंजूर असले तरी शिपायासह इतर दोन पदे रिक्त आहेत. शिवाय, एक अधिकारी जिल्हा कार्यालयात वर्ग झाल्यामुळे सध्या दोघांवरच या कार्यालयाचा कारभार सुरू आहे. परिणामी अवैध सावकारकींच्या तक्रारींवरील कारवाईसह इतरही अनेक कामे खोळंबून राहत असल्याचे दिसत आहे.

शहारासह तालुक्यात २२४ संस्था, २७ सावकार व पतसंस्था आहेत. या सर्वांचा कारभार सांभाळण्यासोबतच पीक कर्जवाटप, पीककर्जावरील व्याज माफीचे महत्त्वाचे कामदेखील या कार्यालयामार्फत केले जाते. विशेषत: अवैध सावकारीला आळा घालण्याची जबाबदारी या कार्यालयावर आहे. परंतू, ही सर्व कामे करण्यासाठी आवश्यक कर्मचारी संख्या उपलब्ध नाही. कर्मचारी नसल्याने आजवर अवैध सावकारकीच्या १८ तक्रारी पेंडिंग आहेत. या कार्यालयात एकूण सहा पदे मंजूर आहेत. यापैकी जुलै २०२० पासून या कार्यालयातील शिपाईपद रिक्त आहे. यामुळे कार्यालय साफ सफाई होत नसल्याने कार्यालयात दुर्गंधी देखील पसरली आहे. पर्यायाने येथे काम करणाऱ्या व कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. या कार्यालयात सहायक सहकार हे २०१७ मध्ये रुजू झाले. परंतु, रुजू झाल्यापासून ते उस्मानाबाद येथील डीडीआर कार्यालयात सेवावर्ग झाले आहेत. त्यामुळे पगार या कार्यालयातून निघत असला तरी त्यांना सेवा मात्र उस्मानाबादला बजावावी लागत आहे. याशिवाय कनिष्ठ लिपिक, सहकार अधिकारी श्रेणी-१ ही दोन पदेदेखील रिक्त आहेत. याचा परिणाम कामावर होत असून, उपलब्ध दोघा कर्मचाऱ्यांनाच तारेवरची कसरत करीत कारभार हाकावा लागत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी होत आहे.

चौकट

अनेक कामे खोळंबली

शासनाच्या वतीने तालुक्यासह शहरातील नागरिकांचे संस्था नोंदणी प्रकरणे, सावकारी लायसन्स, सावकारी तक्रारी, शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्याबाबत मदत, शेतकऱ्यांची कर्ज माफी, शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जावर पंजाबराव देशमुख योजनेअंतर्गत व्याज व अनुदान सवलत ही सर्व कामे वेळेत व तातडीने मार्गी लागावीत याकरिता सहायक निबंधक कार्यालय सुरू करण्यात आले. परंतु, कर्मचारी अपुरी संख्या असल्याने शेतकऱ्यास अनेक कामे खोळंबली आहेत. सहायक निबंधक व मुख्य लिपिक हे दोनच कर्मचारी असल्याने या कार्यालयाचा पत्रव्यवहारदेखील यांनाच करावा लागत आहे.

पाच दिवस कार्यालय बंद

तालुक्यात नुकत्याच ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. यावेळी प्रशासनाने विविध भागातील कर्मचाऱ्यांसोबतच दोघांवर भार असलेल्या सहायक निबंधक कार्यालयातील दोघा कर्मचाऱ्यांनादेखील निवडणूक कर्तव्यावर घेतले. त्यामुळे या कालावधीत पाच दिवस हे कार्यालय चक्क बंद राहिले. या कालावधीत नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली.