शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
3
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
4
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
5
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
6
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
7
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
8
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
9
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
10
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
11
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
12
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
13
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
14
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
15
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
16
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
17
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
18
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
19
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
Daily Top 2Weekly Top 5

रेशन धान्य देत नाही, दुकानदारच बदलून टाकला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:22 IST

उस्मानाबाद : सार्वजनिक वितरण योजनेंतर्गत धान्य पुरवठा करण्यात तांत्रिक अडचणी आल्याने राज्य शासनाने पोर्टेबिलिटीचा पर्याय खुला करून दिला आहे. ...

उस्मानाबाद : सार्वजनिक वितरण योजनेंतर्गत धान्य पुरवठा करण्यात तांत्रिक अडचणी आल्याने राज्य शासनाने पोर्टेबिलिटीचा पर्याय खुला करून दिला आहे. या पर्यायामुळे अनेकांना रेशन दुकानांचा पर्याय उपलब्ध झाला असल्याने एखादा रेशन दुकानदार रेशन देत नसल्यास किंवा त्याच्याशी पटत नसल्याने कार्डधारक दुकानदार बदलून इतर दुकानात धान्य घेत आहेत. जून महिन्यात जिल्ह्यातील ८ हजार ३८५ कार्डधारकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे.

सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत जिल्ह्यातील कार्डधारकांना अल्पदरामध्ये अन्नधान्याचा पुरवठा केला जातो. अन्न सुरक्षा योजना, दारिद्र्यरेेषेखालील लाभार्थी अशा गटात वर्गीकरण करून लाभार्थ्यांना धान्य वितरित केले जाते. आतापर्यंत गहू, तांदूळ, साखर आणि डाळ आदी खाद्यपदार्थांचा पुरवठा केला जातो. या प्रक्रियेमध्ये अनेकवेळा रेशन दुकानदारांसंदर्भात तक्रारी होतात. वेळेवर दुकान सुरू राहत नाही. संपूर्ण रेशन वितरित होत नाही. या तक्रारींबरोबरच काही ठिकाणी लाभार्थ्यांच्या अडचणी असतात. त्यामध्ये रेशन दुकान घरापासून दूर असणे, एकाच रेशन दुकानावर अनेक लाभार्थी जोडल्याने धान्य प्राप्त करण्यास विलंब लागणे यासह काही लाभार्थ्यांना इतर शहरामध्ये स्थलांतरित व्हावे लागते. अशावेळी या लाभार्थ्यांना रेशनचा पुरवठा व्हावा, या उद्देशाने पोर्टेबिलिटी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेअंतर्गत लाभार्थ्यांना त्यांच्या सोयीच्या केंद्रातून धान्य उपलब्ध करून घेण्यात येते. जून महिन्यात जिल्ह्यात ८ हजार ३८५ लाभार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे.

प्राधान्य कुटुंब २,१०,१२२

अंत्योदय कुटुंब ३८,७९७

केशरी २२,३९२

शहरात जास्त बदल

ग्रामीण भागातून शहरी भागात मोठ्या प्रमाणात कामानिमित्त स्थलांतर होत असते. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक शहरातील दुकानात धान्य घेतात. ग्रामीण भागात मोजकेच दुकाने असतात, तर काही ठिकाणी एकच दुकान असते. या गावातील नागरिकांना अन्य दुकानातून पाेर्टेबिलिटीद्वारे धान्य घेता येते. मजूर, कामगार, ऊसतोड मजूर हे मोठ्या प्रमाणात पोर्टेबिलिटीच्या साहाय्याने धान्य घेत आहेत.

नोव्हेंबरपर्यंत मिळणार मोफत धान्य

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षेअंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना मे, जून महिन्यात मोफत धान्य वितरित करण्यात आले. यात प्राधान्य कुटुंब अंत्योदय कार्डधारकांना या योजनेचा लाभ मिळत आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत धान्य वितरित करण्यात येणार आहे. प्राधान्य व अंत्योदय कार्डधारक कुटुंबातील प्रतिव्यक्ती २ किलो तांदूळ व २ किलो गहू वितरित केले जात आहेत.

कोणत्या तालुक्यात कितीजणांनी बदलला दुकानदार

भूम ३९०

कळंब १,०४०

लोहारा ७६७

उमरगा ८०४

उस्मानाबाद १,३७१

परंडा १,६७४

तुळजापूर १,७८६

वाशी ६१३